शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

बडनेऱ्यात जागोजागी मृत्यूचे सापळे

By admin | Updated: December 8, 2015 00:17 IST

राष्ट्रीय महामार्गासह बडनेरा शहरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून राजरोसपणे धोकादायक वाहतूक अधिक प्रमाणात होत आहे.

कोण घालणार आवर ? : प्रादेशिक परिवहन, पोलीस यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्षबडनेरा : राष्ट्रीय महामार्गासह बडनेरा शहरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून राजरोसपणे धोकादायक वाहतूक अधिक प्रमाणात होत आहे. वाहनांच्या बाहेर आलेल्या पोल्स, लोखंडी सळाखा नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरत आहेत. नियमबाह्य वाहतुकीमुळे अनेकांचा बळी जात आहे. या धोकादायक वाहतुकीचा फटका अनेकांना बसला असून हातापायांनी पंगू होण्याची वेळ शेकडोंवर आलेली आहे. पोलीस, महामार्ग पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे दर दिवसाला धोकादायक वाहतूक होत आहे. यामुळे दरदिवसात लहान मोठ्या अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बडनेरा शहरात तसेच येथून जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वीज वितरण कंपनीच्या कामातील कंत्राटदाराकडून नियमबाह्य लोखंडी पोल्स, सिमेंटचे पोल्स ट्रॅक्टर किंवा इर मालवाहू गाड्यांमधून नेल्या जात आहे. असे करताना वाहतुकीचे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. ३० फुटांपर्यंत पोल्स मालवाहू गाड्या किंवा ट्रॅक्टरमधून नेले जातात. मागील व समोरच्या भागात बऱ्याच प्रमाणात हे पोल्स बाहेर येतात. त्याला लाल कपडादेखील बांधलेला नसतो. एकतर अशी वाहतूक करणेच नियमबाह्य आहे. यामुळेच अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. बडनेरा शहरात अशा वाहतुकीला उधाण आले आहे. सुरळीत वाहतुकीला यामुळे मोठा अडसर निर्माण होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणाऱ्या लोखंडी सळाखा, क्षमतेपेक्षा अधिक माल घेऊन जाणारे ट्रक्स बडनेरा शहरातूनच महामार्गाकडे किंवा शहरात जात आहे. ही बाब अत्यंत धोक्याची ठरत आहे. नियमबाह्य व धोकादायक अशा वाहतूकदाराला कुणाचाच धाक वाटत नसल्यामुळे बिनदिक्कत अशी वाहतूक होत आहे. याला कोण लगाम घालणार, असा प्रश्न शहरवासीयांनी केला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बडनेरा शहरात वाहतूक प्रचंड वाढली आहे. अशात ही धोकादायक वाहतूक नाहक जिवितास धोक्याची ठरू शकते, हे नाकारता येणार नाही. शहरातील अनियंत्रित वाहतुकीने आजपर्यंत अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने भर पडत आहे. अनेक जणांचे जीव गेले असून काहींना अपंगत्व आले आहे. परंतु याप्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. अनियंत्रित वाहतूक आणखी कुणाच्या जीवावर बेतणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.