शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाने काेरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरू केली आहे. यात लालपरी, विठाई, शिवशाही, ...

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाने काेरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरू केली आहे. यात लालपरी, विठाई, शिवशाही, रातराणी, आदी लांब, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही एसटी बसेस दर्शन दुर्लभ आहे. ग्रामीण भागातील एसटी बसेस बंद असल्याने अनेक प्रवाशांना ऑटोरिक्षा किंवा अन्य खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्यात एसटीची प्रवासी सेवा सुरू झाली असली, तरी अनेक बस गाड्या आगारातच उभ्या आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही फेऱ्या बंद असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने प्रवासी मात्र खासगी बसने प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉक्स

खेडेगावात जाण्यासाठी ऑटोरिक्षाचा आधार

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे आठ आगार आहेत. यामध्ये परतवाडा, दर्यापूर, चांदुर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, अमरावती आणि बडनेरा या आगारांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागात वाहतूक करणाऱ्या अनेक आगारांनी प्रवासी वाहतुकीसाठी दिवसा साेडल्या जाणाऱ्या फेऱ्या व रात्री मुक्कामी बसेस अद्याप सुरू केलेल्या नाहीत.

जिल्ह्यात आठही आगारांमधून बहूतांश बसेस या शहरी भागातच सोडल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना मात्र बसेस बंद असल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

बॉक्स

६७ हजार किलोमीटरचा प्रवास

एसटी महामंडळाकडून सोडल्या जात असलेल्या गाड्यांचा गत अडीच महिन्यांतील प्रवास दरदिवसाला ६७ हजार किलोमीटर होत आहे. मात्र, यातील बहूतांश वाहतूक ही शहरी भागातच होत आहे. काेरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महामंडळाला ८ कोटी २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

बॉक़्स

आगारातील एकूण बसेस - ३७९

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १६९०

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ९५०

कोट

ग्रामीण भागातून सुरुवातीला एसटी बसेसला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, आता टप्प्याटप्प्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी बसेसची वाहतूक सुरू केली जाईल.

श्रीकांत गभणे

विभाग नियंत्रक

बॉक्स

खेडेगावांवरच अन्याय का?

कोट

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरानंतर ग्रामीण भागातही एसटी बसेस सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप बसेस सुरू नसल्याने नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

सहदेव मानकर

प्रवासी

कोट

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच ग्रामीण भागात शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त आहे. अशातच महत्त्वाच्या कामासाठी शहरात जावे लागते. परंतु, बसेस बंद असल्याने जादा पैसे देऊन ऑटोरिक्षाने प्रवास करावा लागत आहे.

रवींद्र बागडे, प्रवासी