शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाने काेरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरू केली आहे. यात लालपरी, विठाई, शिवशाही, ...

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाने काेरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक सुरू केली आहे. यात लालपरी, विठाई, शिवशाही, रातराणी, आदी लांब, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही एसटी बसेस दर्शन दुर्लभ आहे. ग्रामीण भागातील एसटी बसेस बंद असल्याने अनेक प्रवाशांना ऑटोरिक्षा किंवा अन्य खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्यात एसटीची प्रवासी सेवा सुरू झाली असली, तरी अनेक बस गाड्या आगारातच उभ्या आहेत. ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही फेऱ्या बंद असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे एसटी बसेस बंद असल्याने प्रवासी मात्र खासगी बसने प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बॉक्स

खेडेगावात जाण्यासाठी ऑटोरिक्षाचा आधार

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे आठ आगार आहेत. यामध्ये परतवाडा, दर्यापूर, चांदुर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, अमरावती आणि बडनेरा या आगारांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागात वाहतूक करणाऱ्या अनेक आगारांनी प्रवासी वाहतुकीसाठी दिवसा साेडल्या जाणाऱ्या फेऱ्या व रात्री मुक्कामी बसेस अद्याप सुरू केलेल्या नाहीत.

जिल्ह्यात आठही आगारांमधून बहूतांश बसेस या शहरी भागातच सोडल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना मात्र बसेस बंद असल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

बॉक्स

६७ हजार किलोमीटरचा प्रवास

एसटी महामंडळाकडून सोडल्या जात असलेल्या गाड्यांचा गत अडीच महिन्यांतील प्रवास दरदिवसाला ६७ हजार किलोमीटर होत आहे. मात्र, यातील बहूतांश वाहतूक ही शहरी भागातच होत आहे. काेरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महामंडळाला ८ कोटी २० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

बॉक़्स

आगारातील एकूण बसेस - ३७९

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १६९०

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ९५०

कोट

ग्रामीण भागातून सुरुवातीला एसटी बसेसला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, आता टप्प्याटप्प्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी बसेसची वाहतूक सुरू केली जाईल.

श्रीकांत गभणे

विभाग नियंत्रक

बॉक्स

खेडेगावांवरच अन्याय का?

कोट

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शहरानंतर ग्रामीण भागातही एसटी बसेस सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप बसेस सुरू नसल्याने नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

सहदेव मानकर

प्रवासी

कोट

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच ग्रामीण भागात शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त आहे. अशातच महत्त्वाच्या कामासाठी शहरात जावे लागते. परंतु, बसेस बंद असल्याने जादा पैसे देऊन ऑटोरिक्षाने प्रवास करावा लागत आहे.

रवींद्र बागडे, प्रवासी