शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

कोण जिंकले, कोण हरले ?

By admin | Updated: May 18, 2016 00:09 IST

चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झाली. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या सर्वत्र वारंवार अनुभवल्या गेलेल्या म्हणीची पुन्हा एकदा सिद्धता झाली.

लोकमत प्रासंगिक

चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झाली. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या सर्वत्र वारंवार अनुभवल्या गेलेल्या म्हणीची पुन्हा एकदा सिद्धता झाली. दिल्लीला जातानाच पदभार हस्तांतरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करून ठेवल्यामुळे गुडेवारांना अमरावतीत न येताच पदमुक्तही होता आले. मॅटमध्ये अपिल करणे, मुख्यमंत्र्यांना विनंती करणे, असे पर्याय उपलब्ध असताना पदाचा जराही मोह न बाळगणारा, तत्क्षण पदमुक्त होणारा हा अधिकारी जातानाही आगळा भासला.'टॉक आॅफ दी टाऊन' ठरण्याची योग्यता अत्यल्प अधिकाऱ्यांत अनुभवता आली आहे. गुडेवारांमध्ये ती होती. प्रसिद्धी माध्यमांत त्यांना मिळणारी जागा बघून राजकीय मंडळींसह उच्चश्रेणी अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावत असे. 'न्यूज व्हॅल्यू' (बातमीमुल्य) असलेल्या अनेक बाबी गुडेवारांच्या दैनंदिन कार्यप्रणालीत अलगद घडत होत्या. गुडेवार त्यामुळेच अमरावतीत सर्वाधिक प्रसिद्धी मिळू शकलेले अधिकारी ठरले. गुडेवारांना मिळणारी प्रसिद्धी केवळ श्वेत होती, असे नाहीच मुळी. ते कायम दुअर्थी चर्चेत राहिलेत. पटले त्यांनी स्तुती केली, खटकले त्यांनी आरोप केलेत. कुणाला त्यांच्यात उपयोगिता मूल्य जाणवले तर कुणाला उपद्रव मूल्य. गुडेवारांच्या एकाच कार्यपद्धतीचे असे दोन भिन्न परिणाम अमरावतीतील लोक, राजकारणी, समाजकारणी आणि कर्मचारी अनुभवत होते. तीन दशकांपूर्वी रजनीश ओशो नावाच्या आध्यात्मिक गुरुच्या वक्तव्यांमुळे, तत्त्वज्ञानामुळे देशात उठलेले वादळ असेच मिश्र चर्चांचे होते. गुडेवारांच्या आगमनाने, वास्तव्याने आणि जाण्याने जे वादळ अमरावतीत घोंगावत राहिले ते अनुभवताना रजनिशांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण चमकून जाते. का झाली बदली?गुडेवारांच्या बदलीच्या फाईलीवर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची वार्ता अमरावतीत गुरुवारी धडकली. जनसामान्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शासनाने त्याचा कानोसा घेतल्यानंतर गुडेवारांच्या बदलीचे आदेश येण्याचे थांबले. शुक्रवारी लोकांदोलनाचा रेटा बघून बदली प्रक्रिया निद्रावस्थेतच राहिली. बदली रद्द होणार असल्याची ती प्रथम पायरी होती. शनिवारी 'शहर बंद' पुकारले गेले. त्या बंदमध्ये सहभागी होऊन कुठल्याशा 'टिपू सुल्तान ग्रुप'ने शहरातील अनेक बाजारपेठांत हिंसक धडक दिली. काही महिन्यांपूर्र्वी जेथे खून झाला त्या मराठा सावजी हॉटेलवर त्यांनी बदल्याच्या भावनेतून हल्ला केला. हा विध्वंसक ग्रुप शहरभर तोडफोड, मारामारी, फेकाफेकी करीत दहशत निर्माण करीत सुटला होता. राजकमल चौकातील आंदोलनाच्या मंचावरून समर्थन घोषित करणारा हा ग्रुप जे काही करीत होता त्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी अर्थात्च आयोजकांच्या शिरावर आली. आयोजकांनी उभारलेले आंदोलन पोलीस परवानगी घेऊन उभारलेले नव्हते. त्यामुळे कायदेशीररीत्या मूळत: ते अवैध होतेच; पण पोलिसांनी त्याचा बाऊ केला नव्हता. 'टिपू सुल्तान ग्रुप'ने धुडगूस घातल्यानंतर पोलीस जागे झाले. त्या ग्रुपचा उच्छाद 'सोशल मीडिया'वर व्हायरल झाला. मुद्दा कधीही, कुठेही उपस्थित होऊ शकणार होता. पोलीस गोत्यात येऊ शकणार होते. पोलिसांनी तमाम आंदोलकांविरुद्ध दंगल माजविण्याचे गुन्हे नोंदविले. गुडेवार समर्थकांसाठी हे सारे अनपेक्षित आणि आकसपूर्ण वाटणारे होते. शिरस्त्यानुसार शानाला आंदोलनाचा जो अहवाल पाठविला गेला त्यात या साऱ्या उच्छादाची चर्चा होती. बंद स्वयंस्फूर्त नव्हता, तो दहशतीच्या सावटाखाली घडवून आणला गेला, ही प्रतिमा निर्माण झाली. त्याचा परिणाम अवरुद्ध झालेल्या बदली आदेशावर झाला. गुडेवारांच्या बदलीचे आदेश जारी झाले.