शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

कोण जिंकले, कोण हरले ?

By admin | Updated: May 18, 2016 00:09 IST

चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झाली. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या सर्वत्र वारंवार अनुभवल्या गेलेल्या म्हणीची पुन्हा एकदा सिद्धता झाली.

लोकमत प्रासंगिक

चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झाली. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या सर्वत्र वारंवार अनुभवल्या गेलेल्या म्हणीची पुन्हा एकदा सिद्धता झाली. दिल्लीला जातानाच पदभार हस्तांतरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करून ठेवल्यामुळे गुडेवारांना अमरावतीत न येताच पदमुक्तही होता आले. मॅटमध्ये अपिल करणे, मुख्यमंत्र्यांना विनंती करणे, असे पर्याय उपलब्ध असताना पदाचा जराही मोह न बाळगणारा, तत्क्षण पदमुक्त होणारा हा अधिकारी जातानाही आगळा भासला.'टॉक आॅफ दी टाऊन' ठरण्याची योग्यता अत्यल्प अधिकाऱ्यांत अनुभवता आली आहे. गुडेवारांमध्ये ती होती. प्रसिद्धी माध्यमांत त्यांना मिळणारी जागा बघून राजकीय मंडळींसह उच्चश्रेणी अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावत असे. 'न्यूज व्हॅल्यू' (बातमीमुल्य) असलेल्या अनेक बाबी गुडेवारांच्या दैनंदिन कार्यप्रणालीत अलगद घडत होत्या. गुडेवार त्यामुळेच अमरावतीत सर्वाधिक प्रसिद्धी मिळू शकलेले अधिकारी ठरले. गुडेवारांना मिळणारी प्रसिद्धी केवळ श्वेत होती, असे नाहीच मुळी. ते कायम दुअर्थी चर्चेत राहिलेत. पटले त्यांनी स्तुती केली, खटकले त्यांनी आरोप केलेत. कुणाला त्यांच्यात उपयोगिता मूल्य जाणवले तर कुणाला उपद्रव मूल्य. गुडेवारांच्या एकाच कार्यपद्धतीचे असे दोन भिन्न परिणाम अमरावतीतील लोक, राजकारणी, समाजकारणी आणि कर्मचारी अनुभवत होते. तीन दशकांपूर्वी रजनीश ओशो नावाच्या आध्यात्मिक गुरुच्या वक्तव्यांमुळे, तत्त्वज्ञानामुळे देशात उठलेले वादळ असेच मिश्र चर्चांचे होते. गुडेवारांच्या आगमनाने, वास्तव्याने आणि जाण्याने जे वादळ अमरावतीत घोंगावत राहिले ते अनुभवताना रजनिशांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण चमकून जाते. का झाली बदली?गुडेवारांच्या बदलीच्या फाईलीवर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची वार्ता अमरावतीत गुरुवारी धडकली. जनसामान्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शासनाने त्याचा कानोसा घेतल्यानंतर गुडेवारांच्या बदलीचे आदेश येण्याचे थांबले. शुक्रवारी लोकांदोलनाचा रेटा बघून बदली प्रक्रिया निद्रावस्थेतच राहिली. बदली रद्द होणार असल्याची ती प्रथम पायरी होती. शनिवारी 'शहर बंद' पुकारले गेले. त्या बंदमध्ये सहभागी होऊन कुठल्याशा 'टिपू सुल्तान ग्रुप'ने शहरातील अनेक बाजारपेठांत हिंसक धडक दिली. काही महिन्यांपूर्र्वी जेथे खून झाला त्या मराठा सावजी हॉटेलवर त्यांनी बदल्याच्या भावनेतून हल्ला केला. हा विध्वंसक ग्रुप शहरभर तोडफोड, मारामारी, फेकाफेकी करीत दहशत निर्माण करीत सुटला होता. राजकमल चौकातील आंदोलनाच्या मंचावरून समर्थन घोषित करणारा हा ग्रुप जे काही करीत होता त्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी अर्थात्च आयोजकांच्या शिरावर आली. आयोजकांनी उभारलेले आंदोलन पोलीस परवानगी घेऊन उभारलेले नव्हते. त्यामुळे कायदेशीररीत्या मूळत: ते अवैध होतेच; पण पोलिसांनी त्याचा बाऊ केला नव्हता. 'टिपू सुल्तान ग्रुप'ने धुडगूस घातल्यानंतर पोलीस जागे झाले. त्या ग्रुपचा उच्छाद 'सोशल मीडिया'वर व्हायरल झाला. मुद्दा कधीही, कुठेही उपस्थित होऊ शकणार होता. पोलीस गोत्यात येऊ शकणार होते. पोलिसांनी तमाम आंदोलकांविरुद्ध दंगल माजविण्याचे गुन्हे नोंदविले. गुडेवार समर्थकांसाठी हे सारे अनपेक्षित आणि आकसपूर्ण वाटणारे होते. शिरस्त्यानुसार शानाला आंदोलनाचा जो अहवाल पाठविला गेला त्यात या साऱ्या उच्छादाची चर्चा होती. बंद स्वयंस्फूर्त नव्हता, तो दहशतीच्या सावटाखाली घडवून आणला गेला, ही प्रतिमा निर्माण झाली. त्याचा परिणाम अवरुद्ध झालेल्या बदली आदेशावर झाला. गुडेवारांच्या बदलीचे आदेश जारी झाले.