शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

कोण जिंकले, कोण हरले ?

By admin | Updated: May 18, 2016 00:09 IST

चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झाली. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या सर्वत्र वारंवार अनुभवल्या गेलेल्या म्हणीची पुन्हा एकदा सिद्धता झाली.

लोकमत प्रासंगिक

चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झाली. 'सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या सर्वत्र वारंवार अनुभवल्या गेलेल्या म्हणीची पुन्हा एकदा सिद्धता झाली. दिल्लीला जातानाच पदभार हस्तांतरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करून ठेवल्यामुळे गुडेवारांना अमरावतीत न येताच पदमुक्तही होता आले. मॅटमध्ये अपिल करणे, मुख्यमंत्र्यांना विनंती करणे, असे पर्याय उपलब्ध असताना पदाचा जराही मोह न बाळगणारा, तत्क्षण पदमुक्त होणारा हा अधिकारी जातानाही आगळा भासला.'टॉक आॅफ दी टाऊन' ठरण्याची योग्यता अत्यल्प अधिकाऱ्यांत अनुभवता आली आहे. गुडेवारांमध्ये ती होती. प्रसिद्धी माध्यमांत त्यांना मिळणारी जागा बघून राजकीय मंडळींसह उच्चश्रेणी अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावत असे. 'न्यूज व्हॅल्यू' (बातमीमुल्य) असलेल्या अनेक बाबी गुडेवारांच्या दैनंदिन कार्यप्रणालीत अलगद घडत होत्या. गुडेवार त्यामुळेच अमरावतीत सर्वाधिक प्रसिद्धी मिळू शकलेले अधिकारी ठरले. गुडेवारांना मिळणारी प्रसिद्धी केवळ श्वेत होती, असे नाहीच मुळी. ते कायम दुअर्थी चर्चेत राहिलेत. पटले त्यांनी स्तुती केली, खटकले त्यांनी आरोप केलेत. कुणाला त्यांच्यात उपयोगिता मूल्य जाणवले तर कुणाला उपद्रव मूल्य. गुडेवारांच्या एकाच कार्यपद्धतीचे असे दोन भिन्न परिणाम अमरावतीतील लोक, राजकारणी, समाजकारणी आणि कर्मचारी अनुभवत होते. तीन दशकांपूर्वी रजनीश ओशो नावाच्या आध्यात्मिक गुरुच्या वक्तव्यांमुळे, तत्त्वज्ञानामुळे देशात उठलेले वादळ असेच मिश्र चर्चांचे होते. गुडेवारांच्या आगमनाने, वास्तव्याने आणि जाण्याने जे वादळ अमरावतीत घोंगावत राहिले ते अनुभवताना रजनिशांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण चमकून जाते. का झाली बदली?गुडेवारांच्या बदलीच्या फाईलीवर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची वार्ता अमरावतीत गुरुवारी धडकली. जनसामान्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शासनाने त्याचा कानोसा घेतल्यानंतर गुडेवारांच्या बदलीचे आदेश येण्याचे थांबले. शुक्रवारी लोकांदोलनाचा रेटा बघून बदली प्रक्रिया निद्रावस्थेतच राहिली. बदली रद्द होणार असल्याची ती प्रथम पायरी होती. शनिवारी 'शहर बंद' पुकारले गेले. त्या बंदमध्ये सहभागी होऊन कुठल्याशा 'टिपू सुल्तान ग्रुप'ने शहरातील अनेक बाजारपेठांत हिंसक धडक दिली. काही महिन्यांपूर्र्वी जेथे खून झाला त्या मराठा सावजी हॉटेलवर त्यांनी बदल्याच्या भावनेतून हल्ला केला. हा विध्वंसक ग्रुप शहरभर तोडफोड, मारामारी, फेकाफेकी करीत दहशत निर्माण करीत सुटला होता. राजकमल चौकातील आंदोलनाच्या मंचावरून समर्थन घोषित करणारा हा ग्रुप जे काही करीत होता त्याची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी अर्थात्च आयोजकांच्या शिरावर आली. आयोजकांनी उभारलेले आंदोलन पोलीस परवानगी घेऊन उभारलेले नव्हते. त्यामुळे कायदेशीररीत्या मूळत: ते अवैध होतेच; पण पोलिसांनी त्याचा बाऊ केला नव्हता. 'टिपू सुल्तान ग्रुप'ने धुडगूस घातल्यानंतर पोलीस जागे झाले. त्या ग्रुपचा उच्छाद 'सोशल मीडिया'वर व्हायरल झाला. मुद्दा कधीही, कुठेही उपस्थित होऊ शकणार होता. पोलीस गोत्यात येऊ शकणार होते. पोलिसांनी तमाम आंदोलकांविरुद्ध दंगल माजविण्याचे गुन्हे नोंदविले. गुडेवार समर्थकांसाठी हे सारे अनपेक्षित आणि आकसपूर्ण वाटणारे होते. शिरस्त्यानुसार शानाला आंदोलनाचा जो अहवाल पाठविला गेला त्यात या साऱ्या उच्छादाची चर्चा होती. बंद स्वयंस्फूर्त नव्हता, तो दहशतीच्या सावटाखाली घडवून आणला गेला, ही प्रतिमा निर्माण झाली. त्याचा परिणाम अवरुद्ध झालेल्या बदली आदेशावर झाला. गुडेवारांच्या बदलीचे आदेश जारी झाले.