शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

अपघातास जबाबदार कोण?

By admin | Updated: April 23, 2016 00:04 IST

एक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण?

रक्तरंजित होळी थांबणार केव्हा ? : बापलेकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कारनरेंद्र जावरे परतवाडाएक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण? अशा अपघातानंतर काही तास चालणाऱ्या चर्चेनंतर प्रशासनाचा नाकर्तेपणा नागरिकांना हिंसक वळण घेण्यासह कायदा हातात घेण्यास बाध्य करणारा ठरला. त्यामुळे संतापजनक चित्र जुळ्या शहरात पहावयास मिळाले. परतवाड्यात अंजनगाव स्टॉप ते जयस्तंभ चौकापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. पुढे जयस्तंभ चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर अंतिम टप्प्यात आहे. चौपदरीकरणात तयार करण्यात आलेल्या फुटपाटावर लहाण व्यवसायिकंनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना रस्यांवरून चालावे लागत आहे. त्याच रस्त्याच्या कडेला दुचाकी, चारचाकी वाहणे उभी राहत असल्याने चौपदरीकरणाचा रस्ता एकेरी वाहतूक करणारा ठरला आहे.वाहतूक विभाग हतबलशहरात अपघाताची मालिका सुरूच आहे. परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीन पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. मग अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर पालिकेला पत्र देऊनसुध्दा कुठलीच कार्यवाही होत नाही. वाहक पोलीस विभागात एकूण ३७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मान्य असून केवळ १७ कर्मचारी तैनात आहेत. २० जागा रिक्त आहेत. परतवाडा शहरात मुख्य अपघात स्थळ असलेल्या चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, मिल कॉलनी स्टॉप, बसस्थानक, जयस्तंभ चौक, लालपूल, अंजनगाव स्टॉप, चिखलदरा स्टॉप, बैतुल स्टॉप, दुर्राणी चौक, गुजरी बाजार आदि ठिकाणीसुध्दा कर्मचारी नसल्याने वाहतूक विभागावर नामुस्की ओढवली आहे.जुळया शहरात अंदाजे तीन चाकी आॅटोंची संख्या दोन हजारांवर आहे. शहरातील महामार्गावर वाट्टेल तिथे थांबण्यासह, मधात उभे करणे, चालताना मागून वाहन येत असल्याची पर्वा न करता आॅटो पलटविण्याचा पराक्रम सुरू आहे.गतिरोधक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबितरस्ता चौपदरीकरणानंतर वाढते अपघात पाहता, वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जयस्तंभ चौक, अंजनगाव, चिखलदरा, बैतूल स्टॉप, आठवडी बाजार, बसस्थानक आदि महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याचे पत्र दिले. तर नियमानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे ते पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांना समितीतर्फे मान्यता दिल्यावर गतीरोधक तयार करण्यात येतील. भाग तो पर्यत किती जणांचा नाहक बळी जाईल हे सांगणे कठीण आहे.अतिक्रमणाविषयी पालिका उदासीनशहरात अपघाताची मालीका सुरु असतांना अचलपूर नगर पालीका भाग हा रक्तरंजीत खेळ, तमाशा म्हणून बघीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झालेले अतीक्रमण काढण्याचे पत्र, त्यामुळे वाहतूकीची कोंडी होवून अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाने लेखी कळविले आहे. परंतु पालिकेत मुख्याधिकारी चार दिवसांपासून विनापरवानगी कुठे गेले याचा शोध नगराध्यक्षांना घ्यावा लागत आहे. सदर पत्राबाबत नगराध्यक्ष रंगालाल नंदवंशी यांच्याशी विचारणी केली असता त्यांनी हा खुलासा केला. मुख्याधिकारी धनंजय जावळीकरांच्या दुर्लक्षामुळे विकसकामे रखडल्याचा आरोप होत आहे.रिंंगरोड आवश्यकपरतवाडा शहराबाहेरुन जड वाहनांसाठी मंजूर असलेला प्रस्तावित रिंंंगरोड अपघात टाळण्यासाठी आवश्यक झाले आहे. चांदूर बाजार नाका ते कविठा माग्र्ेि बैतूल, धारणी मार्गाला हा रिंंगरोड जोडण्याचा जुना प्रस्ताव आहे. परतवाडा शहरातून इंदूर, अकोला, बैतूल, राज्य व आंतराज्यीय वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.बापलेकांवर अंत्यसंस्कारगुरुवारी मृत दादाराव पंधरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ब्राम्हणवाडा गोविंदपूर येथे दुपारी १.२० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्शनचे शवविच्छेदन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार केल्यावर त्याचा मृतदेह परिजनांना १०.३० वाजता देण्यात आला. दादाराव पंधरे यांचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले.आज वाहतुकीवर बैठकशहरातील वाढते अपघात, अनियंत्रित वाहतूक, अतिक्रमण आणि सर्व विषयावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस स्टेशनला महत्त्वाची बैठक घेण्यात आली. व्यवसायी, अधिकारी, पत्रकार व संबंधित विभागाला बोलविण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले.