शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

अपघातास जबाबदार कोण?

By admin | Updated: April 23, 2016 00:04 IST

एक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण?

रक्तरंजित होळी थांबणार केव्हा ? : बापलेकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कारनरेंद्र जावरे परतवाडाएक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण? अशा अपघातानंतर काही तास चालणाऱ्या चर्चेनंतर प्रशासनाचा नाकर्तेपणा नागरिकांना हिंसक वळण घेण्यासह कायदा हातात घेण्यास बाध्य करणारा ठरला. त्यामुळे संतापजनक चित्र जुळ्या शहरात पहावयास मिळाले. परतवाड्यात अंजनगाव स्टॉप ते जयस्तंभ चौकापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. पुढे जयस्तंभ चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर अंतिम टप्प्यात आहे. चौपदरीकरणात तयार करण्यात आलेल्या फुटपाटावर लहाण व्यवसायिकंनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना रस्यांवरून चालावे लागत आहे. त्याच रस्त्याच्या कडेला दुचाकी, चारचाकी वाहणे उभी राहत असल्याने चौपदरीकरणाचा रस्ता एकेरी वाहतूक करणारा ठरला आहे.वाहतूक विभाग हतबलशहरात अपघाताची मालिका सुरूच आहे. परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीन पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. मग अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर पालिकेला पत्र देऊनसुध्दा कुठलीच कार्यवाही होत नाही. वाहक पोलीस विभागात एकूण ३७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मान्य असून केवळ १७ कर्मचारी तैनात आहेत. २० जागा रिक्त आहेत. परतवाडा शहरात मुख्य अपघात स्थळ असलेल्या चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, मिल कॉलनी स्टॉप, बसस्थानक, जयस्तंभ चौक, लालपूल, अंजनगाव स्टॉप, चिखलदरा स्टॉप, बैतुल स्टॉप, दुर्राणी चौक, गुजरी बाजार आदि ठिकाणीसुध्दा कर्मचारी नसल्याने वाहतूक विभागावर नामुस्की ओढवली आहे.जुळया शहरात अंदाजे तीन चाकी आॅटोंची संख्या दोन हजारांवर आहे. शहरातील महामार्गावर वाट्टेल तिथे थांबण्यासह, मधात उभे करणे, चालताना मागून वाहन येत असल्याची पर्वा न करता आॅटो पलटविण्याचा पराक्रम सुरू आहे.गतिरोधक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबितरस्ता चौपदरीकरणानंतर वाढते अपघात पाहता, वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जयस्तंभ चौक, अंजनगाव, चिखलदरा, बैतूल स्टॉप, आठवडी बाजार, बसस्थानक आदि महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याचे पत्र दिले. तर नियमानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे ते पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांना समितीतर्फे मान्यता दिल्यावर गतीरोधक तयार करण्यात येतील. भाग तो पर्यत किती जणांचा नाहक बळी जाईल हे सांगणे कठीण आहे.अतिक्रमणाविषयी पालिका उदासीनशहरात अपघाताची मालीका सुरु असतांना अचलपूर नगर पालीका भाग हा रक्तरंजीत खेळ, तमाशा म्हणून बघीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झालेले अतीक्रमण काढण्याचे पत्र, त्यामुळे वाहतूकीची कोंडी होवून अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाने लेखी कळविले आहे. परंतु पालिकेत मुख्याधिकारी चार दिवसांपासून विनापरवानगी कुठे गेले याचा शोध नगराध्यक्षांना घ्यावा लागत आहे. सदर पत्राबाबत नगराध्यक्ष रंगालाल नंदवंशी यांच्याशी विचारणी केली असता त्यांनी हा खुलासा केला. मुख्याधिकारी धनंजय जावळीकरांच्या दुर्लक्षामुळे विकसकामे रखडल्याचा आरोप होत आहे.रिंंगरोड आवश्यकपरतवाडा शहराबाहेरुन जड वाहनांसाठी मंजूर असलेला प्रस्तावित रिंंंगरोड अपघात टाळण्यासाठी आवश्यक झाले आहे. चांदूर बाजार नाका ते कविठा माग्र्ेि बैतूल, धारणी मार्गाला हा रिंंगरोड जोडण्याचा जुना प्रस्ताव आहे. परतवाडा शहरातून इंदूर, अकोला, बैतूल, राज्य व आंतराज्यीय वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.बापलेकांवर अंत्यसंस्कारगुरुवारी मृत दादाराव पंधरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ब्राम्हणवाडा गोविंदपूर येथे दुपारी १.२० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्शनचे शवविच्छेदन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार केल्यावर त्याचा मृतदेह परिजनांना १०.३० वाजता देण्यात आला. दादाराव पंधरे यांचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले.आज वाहतुकीवर बैठकशहरातील वाढते अपघात, अनियंत्रित वाहतूक, अतिक्रमण आणि सर्व विषयावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस स्टेशनला महत्त्वाची बैठक घेण्यात आली. व्यवसायी, अधिकारी, पत्रकार व संबंधित विभागाला बोलविण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले.