शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

होम आयसोलेटेड कोरोना रुग्णांवर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST

मोर्शी : कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे निधन झालेल्यांची नावे प्रशासनाने जाहीर करणे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गरजेचे ठरत आहे. प्रशासनाने ...

मोर्शी : कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे निधन झालेल्यांची नावे प्रशासनाने जाहीर करणे आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गरजेचे ठरत आहे. प्रशासनाने या बाबीचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. ज्यांना फारशी लक्षणे नाहीत, त्या संक्रमित व्यक्ती होम आयसोलेटेड अर्थात गृह विलगीकरणात राहतात. मात्र, त्यापैकी अनेक जण बरे होण्याआधीच घराबाहेर मुक्तपणे वावरतात. त्यामुळे अशांवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

गतवर्षी कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये धास्ती होती. संसर्गाचा धोका आणि त्याची भीती ओळखून कोरोना रुग्णाचे निदान झाल्यावर त्याचे नाव प्रशासनातर्फे लपविले जात होते. संबंधित रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागू नये, या कारणाने निधन झालेल्या रुग्णाचे नाव याच कारणामुळे प्रकाशित केले जात नव्हते. ही परिस्थिती सध्याही आहे.

गतवर्षी कोरोना संक्रमित रुग्णांस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात होते. रुग्णाच्या निवासस्थानाचा परिसर सील केल्या जात असे. त्यामुळे सामान्य नागरिक त्या परिसरापासून अलिप्त राहत असे. तथापि, यावर्षी कोरोना रुग्ण आढळल्यास त्यास गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. तथापि, परिसर सील केला जात नाही. अशा रुग्णाच्या घराच्या दारावर नगरपालिकातर्फे स्लिप लावली जाते. संबंधित स्लिप घरावर राहील, याची शाश्वती राहत नाही. गृह विलगीकरणातील रुग्ण घरीच राहील, असेही नाही. अनेक रुग्ण सरसकट बाहेर फिरताना आणि लोकांमध्ये मिसळताना, दुकानातून औषध आणताना आढळून येतात. हीच परिस्थिती मृतासंदर्भात पाहावयास मिळते.

कुटुंबातील कोणी व्यक्ती मरण पावली, तर नातेवाईक, निधनाचे कारण न्यूमोनिया, श्वास कमी पडून अटॅक असे सांगितले जाते. बरीच मंडळी कोरोनामुळे निधन झाल्याचे सांगत नाहीत. या दोन्ही कारणांमुळे रुग्णाच्या वा मृताच्या घरी येणारी मंडळी अनभिज्ञ राहत असल्यामुळे सहानुभूती दर्शविण्याकरिता जातात आणि पर्यायाने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक वर्षाच्या सरावाने कोरोना आजार आता सामान्य झाला असून, रुग्णाला वा कुटुंबाला वाळीत टाकले जाण्याची भीती निरर्थक आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हवे

आज प्रत्येक गावात, जवळपास सर्वच मोहल्ल्यात कोरोना रुग्ण निघाल्याच्या किंवा कोरोनाने निधन झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्या गावावात जाऊन तो परिसर सील करण्याची, लोकांना सतर्क करण्याची मागणी नगरसेवक नितीन उमाळे यांनी केली. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना तपासणी झाल्यास अन्य लोकांना माहिती कळू शकणार आहे.