शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पांढऱ्या सोन्यातून ‘व्हाईट मनी’ !

By admin | Updated: November 15, 2016 00:07 IST

शासनाने कपाशीसाठी प्रतिक्विंटल ४१६० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. परंतु जादा रकमेच्या आशेने शेतकरी व्यापाऱ्यांना कपाशीची विक्री करतात.

व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांना आमिष : साडेपाच हजार भावाने खरेदीसंदीप मानकर अमरावतीशासनाने कपाशीसाठी प्रतिक्विंटल ४१६० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. परंतु जादा रकमेच्या आशेने शेतकरी व्यापाऱ्यांना कपाशीची विक्री करतात. व्यापारी शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला प्रतीक्विंटल साडेपाच हजार ते सहा हजार रूपये दराचे आमिष देऊन जुन्या चलनाद्वारे व्यवहार करीत आहेत. व्यापाऱ्यांनी ‘ब्लॅक मनी’ ‘व्हाईट’ करण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. जादा दराच्या लालसेने काही शेतकरी देखील जुन्या नोटा स्वीकारून या व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार व पाचशे रूपयांच्या नोटा हद्दपार केल्यात. त्यामुळे सगळीकडे नोटांची अदलाबदल करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, धनदांडग्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ३० डिसेंबरपर्यंत हा ब्लॅकमनी व्हाईट करण्याकरिता नवनवीन क्लृप्ती लढविल्या जात आहेत. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कपाशीची विक्री करण्याकरिता व्यापारी शेतकऱ्यांना भरीस घालत आहेत. त्यासाठी त्यांना जादा दराचे आमिषही दिले जात आहे. परंतु हा व्यवहार जुन्या चलनात करण्याची अट घातली जात आहे. शेतकरी देखील जादा दराच्या लालसेने ही अट मान्य करताना दिसत आहेत. हे जुने चलन स्वत:च्या खात्यात टाकून शेतकरी ते बदलवून घेऊ शकतात. यातून व्यापाऱ्यांचा काळा पैसाही मार्गी लागणार आहे, हे विशेष. सद्यस्थितीत बँकांचे सर्व मोठे व्यवहार ठप्प असताना मोठ्या प्रमाणात कपाशीची खरेदी कशी काय होते, हा प्रश्नही निर्माण झाला असताना नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका शेतकऱ्याने हा प्रकार लोकमतला सांगितला. एकीकडे शेतकऱ्यांकडे शंभरच्या नोटा नाहीत तर दुसरीकडे शासनाने बाद ठरविलेल्या पाचशे व हजारांच्या नोटांचा ग्रामीण भागात मात्र महापूर आला आहे. अनेक जिनिंग-प्रेसिंगमध्ये हजारो क्विंटल कापूस दाखल होत आहे! बँकेतून दरदिवसाला अल्प रक्कम काढता येते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडेही अद्याप नवीन चलन पोहोचलेले नाहीत. मग, जिल्ह्यात हजारो क्विंटल कपाशीची खरेदी होते कशी, हा प्रश्न उदभवत आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी आणि काळ्या पैशाची गुंतवणूक करणाऱ्यांवर अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे-तर मग पोलिसांनी ‘चेकपोस्ट’ लावावेशेतकऱ्यांची अडवणूक करुन, त्यांना विविध प्रकारची आमिषे दाखवून हमीभावापेक्षा दामदुप्पट दर देऊन जुन्या चलनातून कपाशीची खरेदी करण्याचा गोरखधंदा व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. ‘ब्लॅक मनी व्हाईट’ करण्याचा हा नवीन फंडा असून याकरीता शेतकऱ्यांना साडेपाच ते सहा हजार रूपये प्रतीक्विंटल दर दिला जात आहे. हमीभावापेक्षा तब्बल दीड हजार रुपये अधिक मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्याला कापूस विकत आहेत. यामाध्यमातून कोट्यावधींचा काळा पैसा पांढरा केला जात आहे. मात्र, पोलिसांनी ग्रामीण भागात हा पैसा पोहोचण्यापूर्वीच ‘चेकपोस्ट’लाऊन कारवाई करावी, अशी जागरूक नागरिकांची मागणी आहे. व्यापाऱ्याला बिल मागावे शेतकऱ्यांची दिशाभूल करुन त्यांना व्यापारी जुने चलन घेण्याची गळ घालीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकताना एक तर नवीन चलनाच स्वीकारावे किंवा व्यवहार झाल्यानंतर व्यापाऱ्यांना पावती मागावी, असे मत काही प्रगतीशिल शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. यादिशेने विचार व्हावा. राज्यातील बोटांवर मोजण्याइतक्या बाजार समिती वगळता इतर बाजार समितींच्या माध्यमातून शेतकरी कापूस विकत नाहीत. पण, यावर्षी बाजार समितीत कापसाची हमीभावाने खरेदी सुरु करण्याचा प्रयत्न राहणार आहे. - सुनील वऱ्हाडे, सभापती, बाजार समिती अमरावती.