शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या नावे योजनांचे कपात, 30 टक्के निधी गेला कुठे? - शेतक-यांचा राज्यपालांना सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 18:16 IST

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी विविध योजनांचे ३० टक्के निधी कपात करण्याचा निर्णय घेतला.

गणेश वासनिक/अमरावती : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी विविध योजनांचे ३० टक्के निधी कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाच महिन्यांच्या कालावधी लोटूनही शेतकरी कर्जमाफी झाली नाही, त्यामुळे कपात केलेला निधी गेला कुठे, असा सवाल संतप्त शेतक-यांनी थेट राज्यपालांना पाठविलेल्या पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

नैसर्गिक संकट, सततचा दुष्काळ, अवेळी पावसाने होणा-या नुकसान भरपाईने हतबल झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना लागू केली. शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी तिजोरीत ठणठणाट असल्याने शासनाने सर्वच विभागाच्या योजनांवरील निधीवर ३० टक्के कात्री लावण्याचा निर्णय वित्त विभागाने ३० जून २०१७ रोजी घेतला. योजनांच्या ३० टक्के निधी वितरीत करताना ही प्रक्रिया नियमाकूल सुरू झाली. परंतु शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या नावे कपात झालेली रक्कम कुठे गेले? याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी शेतक-यांची आहे. 

शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ३४ हजार कोटींची आवश्यकता असल्याने हा पैसा विविध योजनांच्या निधीवर कात्री लावून उभारण्यात आला.कपात निधीचा लाभ शेतक-यांना कर्जमाफीने मिळाला नाही. एकिकडे योजनांच्या निधीत कपात तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी नाही? त्यामुळे  कपात निधीचे काय झाले? असे आता शेतकरी जाहीरपणे बोलू लागले आहेत.

''सतत चार ते पाच वर्षांपासून दुष्काळ, नापिकीचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून दिलासा मिळेल, असे शेतकºयांना अपेक्षित होते. मात्र, कर्जमाफी हे दिवास्वप्न ठरू लागले आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्र पाठविले आहे''. - सुरेश मोलके शेतकरी, डवरगाव

या विभागाला बसला निधी कपातचा फटकाराज्य सरकारने चालू वित्तीय वर्षाच्या निधी वितरणात बदल केला असून यात महसुली लेख्यातील ७० टक्के तर भांडवली लेख्यातील ८० टक्के इतका मर्यादेत निधी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. निधी कपातीचा फटका प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण,आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, उर्जा विभाग, महसूल व वन विभाग, जलसंपदा, महापालिका, जिल्हा परिषद आदींना बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी