शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

कर्जमाफीच्या नावे योजनांचे कपात, 30 टक्के निधी गेला कुठे? - शेतक-यांचा राज्यपालांना सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 18:16 IST

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी विविध योजनांचे ३० टक्के निधी कपात करण्याचा निर्णय घेतला.

गणेश वासनिक/अमरावती : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी विविध योजनांचे ३० टक्के निधी कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाच महिन्यांच्या कालावधी लोटूनही शेतकरी कर्जमाफी झाली नाही, त्यामुळे कपात केलेला निधी गेला कुठे, असा सवाल संतप्त शेतक-यांनी थेट राज्यपालांना पाठविलेल्या पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

नैसर्गिक संकट, सततचा दुष्काळ, अवेळी पावसाने होणा-या नुकसान भरपाईने हतबल झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना लागू केली. शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी तिजोरीत ठणठणाट असल्याने शासनाने सर्वच विभागाच्या योजनांवरील निधीवर ३० टक्के कात्री लावण्याचा निर्णय वित्त विभागाने ३० जून २०१७ रोजी घेतला. योजनांच्या ३० टक्के निधी वितरीत करताना ही प्रक्रिया नियमाकूल सुरू झाली. परंतु शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या नावे कपात झालेली रक्कम कुठे गेले? याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी शेतक-यांची आहे. 

शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ३४ हजार कोटींची आवश्यकता असल्याने हा पैसा विविध योजनांच्या निधीवर कात्री लावून उभारण्यात आला.कपात निधीचा लाभ शेतक-यांना कर्जमाफीने मिळाला नाही. एकिकडे योजनांच्या निधीत कपात तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी नाही? त्यामुळे  कपात निधीचे काय झाले? असे आता शेतकरी जाहीरपणे बोलू लागले आहेत.

''सतत चार ते पाच वर्षांपासून दुष्काळ, नापिकीचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून दिलासा मिळेल, असे शेतकºयांना अपेक्षित होते. मात्र, कर्जमाफी हे दिवास्वप्न ठरू लागले आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्र पाठविले आहे''. - सुरेश मोलके शेतकरी, डवरगाव

या विभागाला बसला निधी कपातचा फटकाराज्य सरकारने चालू वित्तीय वर्षाच्या निधी वितरणात बदल केला असून यात महसुली लेख्यातील ७० टक्के तर भांडवली लेख्यातील ८० टक्के इतका मर्यादेत निधी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. निधी कपातीचा फटका प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण,आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, उर्जा विभाग, महसूल व वन विभाग, जलसंपदा, महापालिका, जिल्हा परिषद आदींना बसला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी