शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या धर्तीवर राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:10 IST

Amravati : समस्यांचा डोंगर, दाद कोणाकडे मागावी ?

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास जनजाती सल्लागार परिषदेने ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या ५१ व्या बैठकीत मंजुरी दिली. दीड वर्षे लोटून गेली तरी अद्यापही राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी तशी घोषणा करूनही शासनाने त्या दिशेने पाऊल उचलले नाही, असे चित्र आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ नुसार केंद्रात पूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग होता. ८९ व्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती व जमातीसाठी असे दोन स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात आले. याच धर्तीवर राज्यातही अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या 'ट्रायबल फोरम' या संघटनेने तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना वारंवार पत्रव्यवहार करून केली होती.

या मागणीची दखल घेऊन केळापूर-आर्णीचे तत्कालीन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या जनजाती सल्लागार परिषदेच्या ५१ व्या बैठकीत प्रस्ताव मांडून ही मागणी मंजूर करून घेतली होती. तब्बल दीड वर्षे लोटून गेले तरी अद्यापही राज्यात अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आलेला नाही.

समस्यांचा डोंगर, दाद कोणाकडे मागावी ?

  • आदिवासी समाज अद्यापही मूलभूत सोयी सुविधापासून वंचित आहे. शासनाचे आदिवासींच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास योजना व कार्यक्रम अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.
  • शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती, वसतिगृह सेवा-सुविधा, आश्रमशाळातील प्रश्न, घरकुल योजना, वर्षानुवर्षे कायम असलेला पदभरतीचा अनुशेष, बिगर आदिवासींनी बळकावलेल्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागांची विशेष पदभरती, आदिवासींचा अखर्चिक निधी, रखडलेले वनहक्क अशा विविध समस्या सुटत नसेल तर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न समाजबांधवांपुढे उभा आहे.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार आहे. त्याअनुषंगाने प्रक्रिया सुरू झाली असून विधि विभागाची मान्यता मिळाल्यानंतर या विषयावर कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय होईल. मुख्यमंत्री आदिवासी हितासाठी अग्रणी आहेत."- प्रा. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री.

टॅग्स :Amravatiअमरावती