शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

केंद्राच्या धर्तीवर राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:10 IST

Amravati : समस्यांचा डोंगर, दाद कोणाकडे मागावी ?

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास जनजाती सल्लागार परिषदेने ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या ५१ व्या बैठकीत मंजुरी दिली. दीड वर्षे लोटून गेली तरी अद्यापही राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी तशी घोषणा करूनही शासनाने त्या दिशेने पाऊल उचलले नाही, असे चित्र आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ नुसार केंद्रात पूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग होता. ८९ व्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती व जमातीसाठी असे दोन स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात आले. याच धर्तीवर राज्यातही अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या 'ट्रायबल फोरम' या संघटनेने तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना वारंवार पत्रव्यवहार करून केली होती.

या मागणीची दखल घेऊन केळापूर-आर्णीचे तत्कालीन आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडलेल्या जनजाती सल्लागार परिषदेच्या ५१ व्या बैठकीत प्रस्ताव मांडून ही मागणी मंजूर करून घेतली होती. तब्बल दीड वर्षे लोटून गेले तरी अद्यापही राज्यात अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आलेला नाही.

समस्यांचा डोंगर, दाद कोणाकडे मागावी ?

  • आदिवासी समाज अद्यापही मूलभूत सोयी सुविधापासून वंचित आहे. शासनाचे आदिवासींच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास योजना व कार्यक्रम अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे.
  • शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती, वसतिगृह सेवा-सुविधा, आश्रमशाळातील प्रश्न, घरकुल योजना, वर्षानुवर्षे कायम असलेला पदभरतीचा अनुशेष, बिगर आदिवासींनी बळकावलेल्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागांची विशेष पदभरती, आदिवासींचा अखर्चिक निधी, रखडलेले वनहक्क अशा विविध समस्या सुटत नसेल तर दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न समाजबांधवांपुढे उभा आहे.

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार आहे. त्याअनुषंगाने प्रक्रिया सुरू झाली असून विधि विभागाची मान्यता मिळाल्यानंतर या विषयावर कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय होईल. मुख्यमंत्री आदिवासी हितासाठी अग्रणी आहेत."- प्रा. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री.

टॅग्स :Amravatiअमरावती