शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

फिरत्या चाकावर पोट; कधी मिळणार मातीकला बोर्डाच्या योजनेचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:50 IST

Amravati : पाच वर्षांत नाही एक रुपयाचाही निधी, तांत्रिक युगात ३० लक्ष कुंभार बांधवांची उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या घडवून आपल्या संसाराचा गाडा चालविणाऱ्या विदर्भातील ३० लक्ष कुंभार बांधव तंत्रज्ञानाच्या युगात मागास राहण्याचा अभिशाप भोगत आहेत. राज्य शासनाने स्थापन केलेल्या मातीकला बोर्डाला पाच वर्षात एक रुपया दिला नाही. परिणामी त्यांच्या योजनाच कार्यान्वित न झाल्याने या समाजबांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे.

कुंभार समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक. अलीकडे संत गोरा कुंभार यांची परंपरा ते सांगतात. तथापि, वंशपरंपरागत असलेल्या त्यांच्या कुंभारकलेला आधुनिक तंत्रज्ञान व चिनी वस्तूंमुळे उतरती कळा आली आहे. त्यामुळे आजघडीला त्यांच्या कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आला आहे.

विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, गोंदिया या जिल्ह्यात कुंभार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी थाटलेला वंशपरापंरागत व्यवसाय गावोगावी पाहावयास मिळतो. मात्र, त्यांनी मातीपासून तयार केलेल्या भांड्यांना कोणत्याच जिल्ह्यात स्थायी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे गावखेड्यात भटकंती करून ही मातीची भांडी विकावी लागत आहेत. वाढत्या महागाई व दुष्काळात कसे तग धरून राहायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याची व्यथा वर्धा नदीकाठी असलेल्या ओमेश वझे यांनी मांडली.

दोन वेळेची भागत नाही सांजसतत तीन महिने तयार केलेली मातीची भांडी घेऊन बाजारात विक्रीसाठी गेल्यानंतर ग्राहकही कमी किमतीत मागतात. एकीकडे मातीपासून तर इंधनापर्यंत सर्वच विकत आणावे लागते. व्यवसायासाठी लागणारा खर्च व यातून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे केल्यानंतर दोन वेळेची सांजही भागत नाही.

मातीच्या भांड्यांची जागा घेतली प्लास्टिकने३० वर्षांपूर्वी मातीच्या भांड्यांना मोठी मागणी होती. घराघरात स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, अंघोळीसाठी मातीपासून तयार झालेल्या भांड्यांचा वापर व्हायचा. मात्र, आजघडीला मातीच्या भांड्यांची जागा स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे.

मातीकला बोर्ड केवळ नावालाचराज्य शासनाने कुंभार बांधवांच्या उन्नतीसाठी राज्यात मातीकला बोर्ड स्थापन केले. खादी ग्रामोद्योग अंतर्गत दहा कोटींचे अनुदान तसेच मातीपासून दिवा, गंगाळ, घागर अशा वेगवेगळ्या वस्तू बनवून प्रदर्शनात विकण्याकरिता देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.

विदर्भात ३० लाखांच्या घरात कुंभार समाज आहे. हा समाज ओबीसी प्रवर्गात मोडतो. तथापि, स्वतःचे शिक्षण विद्यार्थ्यांना स्वतः करावे लागते. कोणत्याही सवलतीचा लाभ मिळत नाही. शासन समाजाच्या विकासासंदर्भात योजना आखतात. मात्र, त्या कागदावरच आहेत. आता तरी सकारात्मक दृष्टिकोनाने कुंभार समाजाकरिता योजना राबवाव्यात.- डॉ. श्रीराम कोल्हे, अध्यक्ष, संत गोरोबाकाका समाज संस्था

टॅग्स :artकलाUnemploymentबेरोजगारी