शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनुसूचित क्षेत्रातील 'नगरपंचायतीसाठी' विधेयक केव्हा आणणार? ट्रायबल फोरमचा सवाल

By गणेश वासनिक | Updated: September 14, 2023 17:53 IST

पंतप्रधानांना पत्र : संसदेचे विशेष अधिवेशन १८ पासून

अमरावती : अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या नगरपंचायती व नगरपरिषदेच्या कारभाराबाबत अद्यापपर्यंत संसदेने कायदा केलेला नाही. आता संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर या दरम्यान होत असून या अधिवेशनात नगरपंचायती व नगरपरिषद संबंधी विधेयक आणणार का? असा प्रश्न उपस्थित करीत संसदेने अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायतीसाठी कायदा करावा, अशी मागणी 'ट्रायबल फोरम' या संघटनेने केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्यात आले आहे. 

संसदेने अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायतीसाठी कायदा केलेला नसतानाही महाराष्ट्र सरकारने घटनेतील तरतुदींचे उल्लंघन करुन अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती व नगरपरिषदा स्थापन केल्या आहेत. राज्यात गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिल्याचे पत्रात नमूद आहे. आदिवासीबहुल लोकसंख्या असलेले अनुसूचित क्षेत्र, पेसा क्षेत्र म्हणून ओळखले जातात. या क्षेत्रासाठी राज्य घटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ ‘य’ ‘ग’ नुसार नगरपरिषद संबंधी राज्यघटनेच्या भाग नऊ- क मधील अनुच्छेद २४३ ‘थ’ ते अनुच्छेद २४३ ‘य’ ‘ख’ मधील तरतुदी पाचव्या अनुसूचित येणाऱ्या अनुसूचित क्षेत्रांना लागू होत नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या नगरपंचायती बेकायदेशीर आहे. 

अनुसूचित क्षेत्रातील नगरपरिषद संबंधी २००१ साली तयार केलेल्या कायद्याचा मसूदा २२ वर्षे होऊनही संसदेने पारित केलेला नाही. असे असताना राज्यसरकारने अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती गठीत केलेल्या आहेत. तेथे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेऊन बेकायदेशीर कारभार सुरु केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पेसातील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष गैरआदिवासी 

नगरपंचायती        नगराध्यक्ष१) वाडा -     खुला प्रवर्ग महिला२) एटापल्ली -    खुला प्रवर्ग महिला३) सिरोंचा -    खुला प्रवर्ग महिला४) कोरची -    खुला प्रवर्ग महिला५) धारणी -    खुला प्रवर्ग महिला६) कुरखेडा -   खुला प्रवर्ग महिला७) पेठ -       खुला प्रवर्ग(सर्वसाधारण)८) भामरागड-   खुला प्रवर्ग(सर्वसाधारण)९)सुरगाणा-     खुला प्रवर्ग(सर्वसाधारण)१०)धडगाव-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)११)तलासरी-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)१२)मोखाडा-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)१३)विक्रमगड-   खुला प्रवर्ग( सर्वसाधारण)

आदिवासी खासदारांचे घटनात्मक असलेल्या अनुसूचित क्षेत्रांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. आता तरी केंद्र सरकारने अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती व नगरपरिषदासाठी कायदा करावा आणि आदिवासी समाजाला त्यांचे घटनात्मक अधिकार प्रदान करावे.

- सुंदरलाल उईके, अध्यक्ष ट्रायबल फोरम, अमरावती

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावतीGovernmentसरकार