शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

लाडक्या शेतकऱ्या'ला ४०३ कोटींची शासकीय मदत मिळणार तरी केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:50 IST

पश्चिम विदर्भाची स्थिती : ऑगस्ट महिन्यात सततचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पश्चिम विदर्भात यावर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे खरीप पिके, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय घरांची पडझडही झालेली आहे. यासाठी चार प्रस्तावांद्वारे विभागीय आयुक्तांनी ४०२.९३ कोटींची मागणी शासनाकडे केलेली आहे. अद्याप शासन अनुदान अप्राप्त आहे. आता कोणत्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडका शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागात यंदा पावसाची सरासरी पार झालेली आहे. यादरम्यान जुलै महिन्यापासून ५३ तालुक्यातील २४९ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतात पाणी साचल्यानेही काही भागांत पिके पिवळी पडली, सडली आहे. 

पुरामुळे शेतात गाळ साचला, शिवाय या आपत्तीमध्ये चार हजारांवर घरांची पडझड झालेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बाधित पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले व शासनाकडे अनुदान मागणीचे चार प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी शासनाला पाठविले आहेत. 

ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील बाधित पिकांसाठी व घरांची पडझड, दुकानांचे नुकसान यासाठी ४०३ कोटींची मागणी प्रशासनाद्वारा केली असताना शासनाद्वारा अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

...अशी आहे प्रस्तावांद्वारे अनुदानाची मागणी (लाखात) 

  • जानेवारी ते मेदरम्यान आपत्तीमुळे घरांची पडझड - १०४०.३८
  • जून ते जुलैदरम्यान खरडून गेलेली जमीन - ४३४.३३
  • आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दुकानांचे नुकसान - १९२.६६
  • ऑगस्ट महिन्यात शेती व फळपिकांचे नुकसान - ३८,६२३.४८
टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीfarmingशेती