शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या शेतकऱ्या'ला ४०३ कोटींची शासकीय मदत मिळणार तरी केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:50 IST

पश्चिम विदर्भाची स्थिती : ऑगस्ट महिन्यात सततचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पश्चिम विदर्भात यावर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे खरीप पिके, फळपिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय घरांची पडझडही झालेली आहे. यासाठी चार प्रस्तावांद्वारे विभागीय आयुक्तांनी ४०२.९३ कोटींची मागणी शासनाकडे केलेली आहे. अद्याप शासन अनुदान अप्राप्त आहे. आता कोणत्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडका शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागात यंदा पावसाची सरासरी पार झालेली आहे. यादरम्यान जुलै महिन्यापासून ५३ तालुक्यातील २४९ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतात पाणी साचल्यानेही काही भागांत पिके पिवळी पडली, सडली आहे. 

पुरामुळे शेतात गाळ साचला, शिवाय या आपत्तीमध्ये चार हजारांवर घरांची पडझड झालेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बाधित पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले व शासनाकडे अनुदान मागणीचे चार प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी शासनाला पाठविले आहेत. 

ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील बाधित पिकांसाठी व घरांची पडझड, दुकानांचे नुकसान यासाठी ४०३ कोटींची मागणी प्रशासनाद्वारा केली असताना शासनाद्वारा अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 

...अशी आहे प्रस्तावांद्वारे अनुदानाची मागणी (लाखात) 

  • जानेवारी ते मेदरम्यान आपत्तीमुळे घरांची पडझड - १०४०.३८
  • जून ते जुलैदरम्यान खरडून गेलेली जमीन - ४३४.३३
  • आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दुकानांचे नुकसान - १९२.६६
  • ऑगस्ट महिन्यात शेती व फळपिकांचे नुकसान - ३८,६२३.४८
टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरीfarmingशेती