शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
4
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
5
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
6
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
7
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
8
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
9
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
10
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
11
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
12
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
13
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
14
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
15
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
16
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
17
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
18
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
19
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
20
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सुटणार तरी कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षांचे नियोजन केले होते. ३ नोव्हेंबरपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बहुतांश सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या परीक्षांचे गुणपत्रिका अप्राप्त असल्याने अशा विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देपरीक्षा विभागात हजारो विद्यार्थ्यांची गर्दी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्तापीठाने अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात (विथहेल्ड) आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पालकांसह जुन्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. गत आठवड्यापासून विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. परीक्षा विभागात होणाऱ्या गर्दीमुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती बळावली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षांचे नियोजन केले होते. ३ नोव्हेंबरपासून निकाल जाहीर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बहुतांश सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे अंतिम सत्र वगळता अन्य सत्राच्या परीक्षांचे गुणपत्रिका अप्राप्त असल्याने अशा विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहे. अशातच अनेक महाविद्यालये, विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी ४ डिसेंबर ही तारीख अंतिम निश्चित केल्यामुळे आणखीच गोंधळ उडाला. दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने पदवी,पदव्युत्तर प्रवेशासाठी ३० डिसेंबर ही अखेरची मुदतवाढ दिली आहे. मात्र, गुणपत्रिका महाविद्यालयातून अप्राप्त असल्याने विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यास विलंब लावत आहे. त्यामुळे बीएस्सी सत्र ६, सत्र ३ चे गुणपत्रिका जमा नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे निकाल सर्वाधिक रोखण्यात आल्याची माहिती आहे. फार्मसी, कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाही ‘विथहेल्ड’ निकाल समस्येचा सामना करावा लागत आहे.

विद्यापीठ, कॉलेजमध्ये समन्वयाचा अभावपरीक्षा विभागातील खिडक्यांवर सकाळपासून सायंकाळपर्यंत विद्यार्थी जुने सत्राच्या गुणपत्रिका जमा करीत आहे. यापूर्वी कॉलेजमध्ये गुणपत्रिका जमा केल्या असताना त्या गायब झाल्याची ओरड आहे. एकुणच निकाल रोखल्याने विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘टाईमबॉन्ड’ अंतिम सत्राचे निकाल जाहीर करणे आवश्यक होते. त्यानुसार परीक्षा विभागाने जबाबदारी पार पाडली आहे. आता जुने सत्राच्या गुणपत्रिका प्राप्त होताच सदर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर  करून गुणपत्रिका दिली जात आहे. महाविद्यालयाने वेळेपूर्वी गुणपत्रिका जमा केल्या नाहीत.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.

यापूर्वी महाविद्यालयात गुणपत्रिका जमा केल्या आहेत.  तरीही निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात येत असल्याचे आश्चर्य आहे. आता आम्हाला विद्यापीठात अंतिम वर्षाची गुणपत्रिका मिळविण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा यात काहीही दोष नाही.- श्रेयस शिरभाते, विद्यार्थी, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी