शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

मुलांच्या दप्तराचे ओझे हलके होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:37 AM

शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या जड दप्तराबाबतच्या नियमावलीला शाळा व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तर वाढतच चालले आहे. हा महत्त्वाचा विषय शाळांचा शासकीय शिक्षण विभागाकडूनही गांभीर्याने घेतला जात नाही.

ठळक मुद्देपाठदुखी : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियमावलीला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या जड दप्तराबाबतच्या नियमावलीला शाळा व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तर वाढतच चालले आहे. हा महत्त्वाचा विषय शाळांचा शासकीय शिक्षण विभागाकडूनही गांभीर्याने घेतला जात नाही. याउलट जाब कोणाला विचारायचा म्हणून पालकांनी मौनव्रत स्वीकारले आहे.फुलपाखरासारखे बागडायचे वय असलेल्या शाळकरी मुलांचे दप्तर त्यांच्या वजनाइतके होत असल्याच्या मुद्द्यावर मागील अनेक वर्षांपासून देशभर तक्रारींचा पाऊस सुरू होता. याबाबत अनेक आंदोलनेही झाली. दप्तराच्या त्यामुळे मुलांना पाठीचे विकार होत असल्याचे समोर आले. शारीरिक वाढीत हे वजन अडसर ठरत असल्याच्या चर्चाही झडल्या. या सर्व बाजूंचा विचार करून अखेर केंद्र शासनाने निर्णायक भूमिका घेतली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत नियमावली तयार करून सर्व राज्यांना अंमलबजावणीचे आदेश दिल. शिक्षण संस्थांनी या नियमावलीचे पालन करावे, अशा सूचनाही जारी करण्यात आल्या. प्रत्यक्षात या आदेशाचे आणि नियमावलीचे खोबरे झाल्याचा प्रकार दिसत आहे.दप्तराचे ओझे कमी होण्याऐवजी वाढतच आहे. लहान वयात मुलांची बौद्धिक व शारीरिक अशी परिपूर्ण वाढ योग्य गतीने होणे अपेक्षित असते. त्यामुळे त्यांच्या कोवळ्या पाठीवर अवजड वस्तूंप्रमाणेच दप्तर देणेही घातक आहे. सरकारी शाळांपासून ते अव्वाच्या सव्वा फी आकारणाऱ्या बहुतांश शाळा गुण वाढवण्याच्या स्पर्धने ईरेला पेटल्या आहेत. या स्पर्धेचा परिणाम म्हणजे, सर्व विषयांची पुस्तके आणि वह्या, वॉटर बॅग, नॅपकिन आदी साहित्य तसेच कंपास आणि स्पोर्ट्सचा तास असल्यास तो ड्रेस आणि वेगळा शूज अशी अतिरिक्त वजने विद्यार्थ्यांवर लादली आहेत. याचा परिणाम मात्र विद्यार्थ्यांवर होतो. विद्यार्थ्यांचे अशा दप्तर यामुळे पाठीबरोबरच पायावर भार पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या दुखण्यावर वाढ झाली आहे

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी