शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

१.९० लाख शेतकऱ्यांना १८१ कोटींची मदत केव्हा? वाढीव निकषाने शासन मदत मिळालीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:28 IST

Amravati : अतिवृष्टी व उद्भवलेली पूरपरिस्थिती यामुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना वाढीव निकषाने मदत देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. यासाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव निकषाने मदत जाहीर केली. प्रत्यक्षात प्रचलित निकषानेच शासन मदत दिली. त्यामुळे १.९० लाख शेतकऱ्यांना १८१ कोटींची मदत केव्हा मिळणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

अतिवृष्टी व उद्भवलेली पूरपरिस्थिती यामुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना वाढीव निकषाने मदत देण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. प्रत्यक्षात २३ सप्टेंबरच्या शासन आदेशानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीने बाधित २,१२,९६२ शेतकऱ्यांना १४४.४९ कोटींची शासकीय मदत मंजूर केली व त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील नुकसानासाठी दोन टप्प्यांत निधी मंजूर केला. ही मदत दोन हेक्टर मर्यादेत व 'एनडीआरएफ'च्या निकषानुसार उपलब्ध करण्यात आली.

त्यापूर्वी १० ऑक्टोबरच्या शासन आदेशानुसार, तीन हेक्टर मर्यादेत वाढीव मदत देण्याचे शासनाने जाहीर केले. प्रत्यक्षात वाढीव मदत न देता शासनाने प्रचलित निकषानेच मदत दिल्याने दोन ते तीन हेक्टर या निकषातील सुमारे १.९१ लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच राहिले आहेत. 

वाढीव निकषाचा अहवाल शासनाला

विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारा वाढीव निकषाने म्हणजेच दोन ते तीन हेक्टर दरम्यान किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आलेला आहे. यामध्ये १,९०,०४५ शेतकऱ्यांच्या १,९५,९३७ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यासाठी १८०.९४ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप हा निधी मिळालेला नाही.

रब्बीसाठी १० हजारांची मदत केव्हा ?

शासनाने १० ऑक्टोबरच्या शासन आदेशात रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजारांची मदत एसडीआरएफ अंतर्गत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र, रब्बी हंगाम सुरू झाला असताना या मदतीचा विसर पडला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असताना रब्बीच्या तयारीसाठी व्यापाऱ्यांना सोयाबीन बेभाव विकावे लागत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 1.9 Lakh Farmers Await ₹181 Crore Aid After Increased Criteria

Web Summary : Despite promises, 1.9 lakh farmers in Vidarbha haven't received ₹181 crore in aid for crop losses due to heavy rains. The government provided assistance based on old criteria, excluding many farmers who expected aid under the increased limit of three hectares for crop damage.
टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाAmravatiअमरावतीfarmingशेती