शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

१०९ कोटींची मदत केव्हा ?

By admin | Updated: July 27, 2016 00:08 IST

गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ...

२ लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदतगजानन मोहोड अमरावती गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात विशेष मदत देण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला होता. या निकषात जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांची मदत अपेक्षित असताना शासनाने अद्याप छदामही दिलेला नाही.गतवर्शी जिल्ह्याची पैसेवार ५० पैशांच्या आत ४३ पैसे असल्याने व याविषयी उच्च न्यायालयाची फटकार असल्याने शासनाने जिल्ह्यासह विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र केंद्राच्या एनडिआरएफच्या नवीन निकषाप्रमाणे मदत दिली नाही. मात्र, कपाशी व सोयाबीन पीकासाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नाही, अशांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर रकमेच्या ५० टक्के प्रमाणात मदत करण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतण्यात आला. तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती शासनाने २२ रोजी मागविली व याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ एप्रिल रोजी सर्व तहसीलदारांना सूचना देऊन निकषप्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या मात्र विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकानी उशीरा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाला अहवाल मागील आठवड्यात तयार झाला.या अन्वये जिल्ह्यातील १९६ महसूली गावांमध्ये कपाशीसाठी दर्यापूर तालुक्यात १७११ शेतकऱ्यांनी ५९९७ हेक्टरच्या विमा काढलेला नाही तर सोयाबीनसाठी १ लाख ९५ हजार ८६१ शेतकऱ्यांनी २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढलला नाही, असे एकूण १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा जाहीर झालेल्या ५० टक्के प्रमाणात म्हणजेच १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली असली तर शासनाने अद्यापपर्यत विशेष मदत दिलेली नाही.असा आहे विशेष मदतीचा शासनादेशअमरावती, नागपूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील कापूस पीक तसेच अमरावती, नागपूर विभागातील सोयाबीन पिकांसाठी पिके विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात रक्कम शासन शेतकऱ्यांना देईल.कपाशीसाठी ३९ लाखांची मागणी दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात कपाशीसाठी पीक विमा विशेष मदत देण्यात येणार आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील १ हजार ७११ शेतक्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यातील १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपयांची अशी एकूण १ हजार ८४८ शेतकऱ्यांना ३९ लाख ४४ हजार १८१ रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. ९० हजार शेतकऱ्यांना पीक विमाजिल्ह्यात खरीप २०१५ या हंगामासाठी कपाशी व सोयाबीनसाठी ९१ हजार १४३ शेतकऱ्यांना ८२ कोटी २९ लाख ५ हजार ७९२ रुपयांचा पीक विमा जाहीर झाला आहे. यामध्ये कपाशीसाठी ४८२ शेतकऱ्यांना ५३८ हेक्टरसाठी ५ लाख ९२ हजार ७४७ रुपयेतर सोयाबीनसाठी ८० हजार १८६ शेतकऱ्यांना ९० हजार ६९५ हेक्टरसाठी ८२ कोटी २३ लाख १३ हजार ४५ रुपंयाचा विमा जाहीर करण्यात आलेला आहे.