शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१०९ कोटींची मदत केव्हा ?

By admin | Updated: July 27, 2016 00:08 IST

गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ...

२ लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदतगजानन मोहोड अमरावती गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात विशेष मदत देण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला होता. या निकषात जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांची मदत अपेक्षित असताना शासनाने अद्याप छदामही दिलेला नाही.गतवर्शी जिल्ह्याची पैसेवार ५० पैशांच्या आत ४३ पैसे असल्याने व याविषयी उच्च न्यायालयाची फटकार असल्याने शासनाने जिल्ह्यासह विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र केंद्राच्या एनडिआरएफच्या नवीन निकषाप्रमाणे मदत दिली नाही. मात्र, कपाशी व सोयाबीन पीकासाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नाही, अशांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर रकमेच्या ५० टक्के प्रमाणात मदत करण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतण्यात आला. तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती शासनाने २२ रोजी मागविली व याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ एप्रिल रोजी सर्व तहसीलदारांना सूचना देऊन निकषप्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या मात्र विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकानी उशीरा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाला अहवाल मागील आठवड्यात तयार झाला.या अन्वये जिल्ह्यातील १९६ महसूली गावांमध्ये कपाशीसाठी दर्यापूर तालुक्यात १७११ शेतकऱ्यांनी ५९९७ हेक्टरच्या विमा काढलेला नाही तर सोयाबीनसाठी १ लाख ९५ हजार ८६१ शेतकऱ्यांनी २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढलला नाही, असे एकूण १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा जाहीर झालेल्या ५० टक्के प्रमाणात म्हणजेच १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली असली तर शासनाने अद्यापपर्यत विशेष मदत दिलेली नाही.असा आहे विशेष मदतीचा शासनादेशअमरावती, नागपूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील कापूस पीक तसेच अमरावती, नागपूर विभागातील सोयाबीन पिकांसाठी पिके विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात रक्कम शासन शेतकऱ्यांना देईल.कपाशीसाठी ३९ लाखांची मागणी दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात कपाशीसाठी पीक विमा विशेष मदत देण्यात येणार आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील १ हजार ७११ शेतक्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यातील १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपयांची अशी एकूण १ हजार ८४८ शेतकऱ्यांना ३९ लाख ४४ हजार १८१ रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. ९० हजार शेतकऱ्यांना पीक विमाजिल्ह्यात खरीप २०१५ या हंगामासाठी कपाशी व सोयाबीनसाठी ९१ हजार १४३ शेतकऱ्यांना ८२ कोटी २९ लाख ५ हजार ७९२ रुपयांचा पीक विमा जाहीर झाला आहे. यामध्ये कपाशीसाठी ४८२ शेतकऱ्यांना ५३८ हेक्टरसाठी ५ लाख ९२ हजार ७४७ रुपयेतर सोयाबीनसाठी ८० हजार १८६ शेतकऱ्यांना ९० हजार ६९५ हेक्टरसाठी ८२ कोटी २३ लाख १३ हजार ४५ रुपंयाचा विमा जाहीर करण्यात आलेला आहे.