शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितींचे मुहूर्त केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:33 IST

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याला बगल : अमरावती विद्यापीठाकडून नियमावली तयार नाही

- गणेश वासनिक अमरावती : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा- २०१६ अन्वये विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितीचे गठण करणे अनिवार्य आहे. मात्र, चालू वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन पाच महिने झाले असताना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ३८२ महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न, समस्या कशा, कुणाकडे सोडवाव्यात, ही गंभीर बाब निर्माण झाली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या उच्च शिक्षणाबाबतचे नियंत्रण अमरावती विद्यापीठातून केले जाते.

१४ जून २०१८ पासून महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक स्तरावरील कामे प्रारंभ झालीत. नव्या विद्यापीठ कायद्यान्वये तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. मात्र, ही तक्रार निवारण समिती कशाप्रकारे गठित करावी, याबाबतची नियमावली तयार करण्यात आली नाही. मध्यंतरी अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र पाठवून महाविद्यालय स्तरावर तक्रार निवारण समिती गठित करावे, अशा सूचना दिल्या आहेत. तथापि, या समितीच स्वरूप,रचना कशाच्या आधारे करावी, यासंदर्भात प्राचार्य, संस्थाचालकही अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे.

यापूर्वी महाविद्यालय स्तरावर केंद्रीय विद्यापीठ कायद्यानुसार ‘कॉलेज डेव्हलपमेंट समिती’ स्थापन केली जायची. परंतु, शासनाने महाविद्यालयांचे कोणतेही कामकाज आता नवीन विद्यापीठ कायद्यानुसार असावे, असे आदेशित केले आहे. मात्र, नियमावलीअभावी अमरावती विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये समिती गठणाचा मुहूर्त सापडत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी प्रश्न, समस्या किंवा एखाद्या गंभीर विषयांबाबत कोणाकडे व्यथा मांडाव्यात, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

विद्यार्थ्यांना हक्क, अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डावनव्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, अधिकारांची जाणीव व्हावी, याची माहिती, प्रचार व प्रसारासाठी आॅनलाईन तक्रारी मागविण्याची नियमावली आहे. नवा विद्यापीठ कायदा अस्तित्वात येऊन दीड वर्षे लोटले असताना तक्रार निवारण समिती गठित होऊ नये, ही बाब लाजीरवाणी असल्याचे मत राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

विद्यार्थी विकास बोर्डाने मान्यता दिल्यानंतर विद्यापीठात तक्रार निवारण समिती गठनाची प्रक्रिया त्वरेने सुरू होईल. यापूर्वी महाविद्यालयांना समिती गठणाबाबत अवगत केले आहे. - राजेश जयपूरकर,  प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

 

टॅग्स :Educationशिक्षण