शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितींचे मुहूर्त केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:33 IST

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याला बगल : अमरावती विद्यापीठाकडून नियमावली तयार नाही

- गणेश वासनिक अमरावती : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा- २०१६ अन्वये विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितीचे गठण करणे अनिवार्य आहे. मात्र, चालू वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन पाच महिने झाले असताना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ३८२ महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न, समस्या कशा, कुणाकडे सोडवाव्यात, ही गंभीर बाब निर्माण झाली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या उच्च शिक्षणाबाबतचे नियंत्रण अमरावती विद्यापीठातून केले जाते.

१४ जून २०१८ पासून महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक स्तरावरील कामे प्रारंभ झालीत. नव्या विद्यापीठ कायद्यान्वये तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. मात्र, ही तक्रार निवारण समिती कशाप्रकारे गठित करावी, याबाबतची नियमावली तयार करण्यात आली नाही. मध्यंतरी अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र पाठवून महाविद्यालय स्तरावर तक्रार निवारण समिती गठित करावे, अशा सूचना दिल्या आहेत. तथापि, या समितीच स्वरूप,रचना कशाच्या आधारे करावी, यासंदर्भात प्राचार्य, संस्थाचालकही अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे.

यापूर्वी महाविद्यालय स्तरावर केंद्रीय विद्यापीठ कायद्यानुसार ‘कॉलेज डेव्हलपमेंट समिती’ स्थापन केली जायची. परंतु, शासनाने महाविद्यालयांचे कोणतेही कामकाज आता नवीन विद्यापीठ कायद्यानुसार असावे, असे आदेशित केले आहे. मात्र, नियमावलीअभावी अमरावती विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये समिती गठणाचा मुहूर्त सापडत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी प्रश्न, समस्या किंवा एखाद्या गंभीर विषयांबाबत कोणाकडे व्यथा मांडाव्यात, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

विद्यार्थ्यांना हक्क, अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डावनव्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, अधिकारांची जाणीव व्हावी, याची माहिती, प्रचार व प्रसारासाठी आॅनलाईन तक्रारी मागविण्याची नियमावली आहे. नवा विद्यापीठ कायदा अस्तित्वात येऊन दीड वर्षे लोटले असताना तक्रार निवारण समिती गठित होऊ नये, ही बाब लाजीरवाणी असल्याचे मत राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

विद्यार्थी विकास बोर्डाने मान्यता दिल्यानंतर विद्यापीठात तक्रार निवारण समिती गठनाची प्रक्रिया त्वरेने सुरू होईल. यापूर्वी महाविद्यालयांना समिती गठणाबाबत अवगत केले आहे. - राजेश जयपूरकर,  प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

 

टॅग्स :Educationशिक्षण