शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितींचे मुहूर्त केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:33 IST

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याला बगल : अमरावती विद्यापीठाकडून नियमावली तयार नाही

- गणेश वासनिक अमरावती : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा- २०१६ अन्वये विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितीचे गठण करणे अनिवार्य आहे. मात्र, चालू वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन पाच महिने झाले असताना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ३८२ महाविद्यालयांमध्ये तक्रार निवारण समितीचे गठण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न, समस्या कशा, कुणाकडे सोडवाव्यात, ही गंभीर बाब निर्माण झाली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या उच्च शिक्षणाबाबतचे नियंत्रण अमरावती विद्यापीठातून केले जाते.

१४ जून २०१८ पासून महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक स्तरावरील कामे प्रारंभ झालीत. नव्या विद्यापीठ कायद्यान्वये तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. मात्र, ही तक्रार निवारण समिती कशाप्रकारे गठित करावी, याबाबतची नियमावली तयार करण्यात आली नाही. मध्यंतरी अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र पाठवून महाविद्यालय स्तरावर तक्रार निवारण समिती गठित करावे, अशा सूचना दिल्या आहेत. तथापि, या समितीच स्वरूप,रचना कशाच्या आधारे करावी, यासंदर्भात प्राचार्य, संस्थाचालकही अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे.

यापूर्वी महाविद्यालय स्तरावर केंद्रीय विद्यापीठ कायद्यानुसार ‘कॉलेज डेव्हलपमेंट समिती’ स्थापन केली जायची. परंतु, शासनाने महाविद्यालयांचे कोणतेही कामकाज आता नवीन विद्यापीठ कायद्यानुसार असावे, असे आदेशित केले आहे. मात्र, नियमावलीअभावी अमरावती विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये समिती गठणाचा मुहूर्त सापडत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी प्रश्न, समस्या किंवा एखाद्या गंभीर विषयांबाबत कोणाकडे व्यथा मांडाव्यात, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

विद्यार्थ्यांना हक्क, अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डावनव्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, अधिकारांची जाणीव व्हावी, याची माहिती, प्रचार व प्रसारासाठी आॅनलाईन तक्रारी मागविण्याची नियमावली आहे. नवा विद्यापीठ कायदा अस्तित्वात येऊन दीड वर्षे लोटले असताना तक्रार निवारण समिती गठित होऊ नये, ही बाब लाजीरवाणी असल्याचे मत राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

विद्यार्थी विकास बोर्डाने मान्यता दिल्यानंतर विद्यापीठात तक्रार निवारण समिती गठनाची प्रक्रिया त्वरेने सुरू होईल. यापूर्वी महाविद्यालयांना समिती गठणाबाबत अवगत केले आहे. - राजेश जयपूरकर,  प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

 

टॅग्स :Educationशिक्षण