शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सुकलेल्या पिकांचे सर्वेक्षण केव्हा ?

By admin | Updated: September 12, 2016 00:20 IST

तालुक्यातील सोयाबीन पीक संपूर्ण एक महिन्याच्या पावसाच्या दडीमुळे नष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना जबर फटका : पावसाच्या दडीमुळे परिणामप्रभाकर भगोले चांदूररेल्वेतालुक्यातील सोयाबीन पीक संपूर्ण एक महिन्याच्या पावसाच्या दडीमुळे नष्ट झाले आहे. त्याबाबत शासकीय योजनेची शेतकरी कार्यालयात प्रतीक्षा लागली आहे. चांदूररेल्वे तालुक्यात सोयाबीन पिकाची २७,३३४ हे. मूग ३३२ हे. उडीद १९६ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली होती. जुलै महिन्यातील अतिपावसाने खरिपातील खोयाबीन, मूग, उडीद पिके बहरली. परंतु ऐन सोयाबीनला बार येताच पावसाने तब्बल महिनाभरापासून दडी मारल्याने सोयाबीनला आलेल्या रोगासह सोयाबीनचे झाड सुकू लागले आहे. त्यामुळे या महिन्यात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या पदरी याहीवर्षी निराशाच येण्याची शक्यता वाढीस लागली आहे. महसूल यंत्रणेकडून याबाबतचे सर्वेक्षण अद्यापही सुरू न झाल्याने शेतकरी वर्गात आश्चर्य व्यक्त आहे. सोयबीनच्या २७३३४ हेक्टरमध्ये पेरणी असली तरी १८ टक्के शेतकरी ज्याचेकडे सिंचन व्यवस्था आहे ते ओलिताखाली आणले गेले. परंतु मागील वर्षी ओलिताचे सोयाबीनच्या शेंगा फुसक्या राहिल्या होत्या. २२,४१४ हेक्टरमध्ये सध्या कोरडवाहू सोयाबीन पिकाची पेरणी अस्तित्वात आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आले आहेत. या सुकलेल्या खरीप पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी महसूल यंत्रणा थोडीही हालली नसल्याने शेतकरी वर्गाची तीव्र नाराजी शासनाविरुद्ध व्यक्त केली जात आहे. विभागीय, जिल्हास्तरावर शासकीय सभा घेऊन दररोज आढावा सभेचे इतिवृत्त प्रसिद्ध होतात. परंतु चांदूररेल्वे संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असताना याबाबत साधी सभा घेऊन आढावासुद्धा घेण्यात आला नाही. याबाबत शेतकऱ्यांविषयी शासन किती उदासीन आहे, याची प्रचिती आता शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. शासनाने याबाबत एका आठवड्याच्या आत निर्णय न घेतल्यास शेतकरी वर्ग रस्त्यावर येऊन शासकीय यंत्रणेला जाब विचारण्याच्या तयारीत असल्याचीही तालुक्यात चर्चा होत आहे. या सुकलेल्या सोयाबीन पिकाच्या सर्वेक्षणाची शेतकऱ्यांनी कुठपर्यंत प्रतीक्षा करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.