शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

शेतमाल व्यापाऱ्याच्या गोदामात जाताच भाव कडाडले

By admin | Updated: April 29, 2015 00:22 IST

राज्य शासनाने धान्य बाजारातील साठेबाजांवरील नियंत्रण उठविल्याने धान्याची बेभाव विक्री सुरु आहे.

लूट : शासनाने साठेबाजांवरील नियंत्रण उठविल्याचा परिणामप्रभाकर भगोले चांदूररेल्वेराज्य शासनाने धान्य बाजारातील साठेबाजांवरील नियंत्रण उठविल्याने धान्याची बेभाव विक्री सुरु आहे. धान्याच्या भाव वधारल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. सोयाबीन, तूर, कापूस, मूग, तीळ हे पीक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व साठवणुकीवर तारण नसल्याने शेतकऱ्यांनी कवडी मोल भावात विकले. परंतु व्यापाऱ्यांच्या गोदामात जाताच धान्य भावात बेसुमार वाढ झाल्याने शासनाच्या धोरणावर तीव्र नापसंती शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. ग्राहकांना मात्र चढ्या भावाने जीवनापयोगी वस्तू खरेदी कराव्या लागत आहे. व्यापाऱ्याकडूनच नफेखोरीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. शासनाची नियंत्रण ठेवणारी अन्न विभागाची यंत्रणा मूग गिळून बसली आहे. शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्याबरोबर तूरडाळ ७० रुपये किलो , तांदूळ ३८ रुपये, चनादाळ ४२ रु. मूगदाळ ८० रु. तेल ६८ रु. प्रतिकिलो चेर दर होते. आताचे दर तूरदाळ १०५, तांदूळ ५६, चनादाळ ५२, मूगदाळ १०५ ते ७५ रुपये अद्यावत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्राहक संघटनेने केला आहे. शेतमालाचे दर घसरले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेतमाल तारण ठेवून बाजारभावाने ६० टक्के तारण कर्ज देण्याची शासनाची योजना आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था केवळ आर्थिक बाबींची तरतूद नसते. त्यामुळे तारणाची योजना कागदावरच असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने सध्या साठेबाजीवर नियंत्रणही उठविले असल्याने व्यापाऱ्यांनाही मुक्तपणे साठेबाजी करण्यासाठी व्यापारी मोकळे झाले आहे. यंदा आधीच नापिकी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असतांना दुसरीकडे साठेबाजीचा प्रकार सुरु आहे. यापूर्वी पुरवठा खातेदार धान्य व इतर दुकानाची तपासणी करुन कार्यवाही होत होती. परंतु अधिकारी जातात चहापाणी घेवून निघून येतात, असे या ेयंत्रणेचे कार्य आजपर्यंत सुरू असल्याचा आरोप ग्राहक संघटनेने केला आहे.