शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

तूर बेभाव, नाफेडची खरेदी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:16 PM

यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत.

ठळक मुद्देहंगामाला सुरुवात : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

रोशन कडू ।आॅनलाईन लोकमततिवसा : यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकºयांच्या कोट्यवधींची तूर मातीमोल दराने व्यापाºयांकडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.यंदाच्या तुरीच्या हंगामात तिवसा तालुक्यात ५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होता. शेतकºयांच्या तुरी बाजारात विक्रीसाठी आलेल्या असतानाही शासनाकडून शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाही. नाइलाजाने शेतकºयांना खासगी व्यापाºयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. हमीभावपेक्षा ९०० रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने तुरीची विक्री करावी लागत आहे. शेतकºयांना बसणारा आर्थिक फटका रोखण्यासाठी तत्काळ शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.तालुक्यात मागील आठ दिवसांपासून तुरीची काढणी सुरू झाली अहे. मात्र, हमीभाव ५४५० असताना खासगी व्यापाºयांकडून केवळ ४५०० रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तत्काळ केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.९०० रुपयांपेक्षा अधिक फरकाने खरेदीतालुक्यातील मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची लागवड झालेली होती. तुरीची काढणी मागील आठ दिवसांपासून सुरू झाली आहे. हमीभाव साडेपाच हजार असताना खासगी व्यापाºयांकडून साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे.दवाळामुळे तुरीचे संपूर्ण पीक वाळलेटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकºयांचे तुरीचे पीक दवाळामुळे वाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन आठवड्यांपासून थंडीचा प्रकोप सुरू असल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील तूर अवेळी वाळली. अशा पिकांचे पंचनामे करून आर्र्थिक मदतीची मागणी होत आहे. तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकरी श्रीनिवास हरिभाऊ काळे यांच्यासह अंबादास काळे, अनसूयाबाई काळे, प्रकाश चांदूरकर, राजेश बंड, मोहन तेलखडे, विनायक जुनघरे, बाळासाहेब भोंडे, अशोक भोडेसह परिसरातील अन्य शेतकºयांचे तूर पिकावर दव गेल्याने हातातोंडाशी आलेले पीक सुकले आहे. या नुकसानामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या संबंधित विभागाने नुकसानाचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.