शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष 

By गणेश वासनिक | Updated: February 29, 2024 20:33 IST

लोकसभा निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता

अमरावती: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र आदिवासी विकास विभाग, ग्राम विकास, वन विभागासह अन्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. कारण आदिवासी आणि ग्रामीण भागावर आदिवासी, कृृषी, ग्राम विकास, वन विभागाचे कायम प्राबल्य दिसून येते. त्यामुळे निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित होण्यास अवधी असला तरी जिल्हा प्रशासनाने निवडणूक उत्सवाला सुरूवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी, समन्वयक, सहाय्यक निवडणूक अधिकारी, नामनिर्देशीत करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण, कार्यशाळांना वेग आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महसूल विभागाने जिल्हाधिकारी ते तहसीलदार या पदांवर या पदांवर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना हलविण्यास सुरूवात केली आहे. तर पाेलिस विभागाने सुद्धा बदल्यांना वेग आणला आहे.निवडणुकीच्या कामकाजावर प्रभाव पडू नये, यासाठी प्रशासन अशी खबरदारी घेत आहे. मात्र लोकांशी संपर्कात येणारे कृषी, वने, आदिवासी, ग्राम विकास या विभागातील अधिकारी मात्र ‘जैसे थे’ आहेत. लोकसभा निवडणूक भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षइत असताना केवळ महसूल आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना आदिवासी, कृृषी, ग्राम विकास, वन विभाग हा देखील जनतेच्या संपर्कात असताे. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने नजर ठेवणे गरजेचे झाले आहे.

वन विभागातील अधिकारी तळ ठोकूनचभारतीय वन सेवा आणि राज्य सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. यामध्ये अनेक अधिकारी एकाच ठिकाणी तीन ते चार वर्षांपासून ठाण मांडून बसल्याचे वास्तव आहे. अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी या अमरावती जिल्ह्यात गत आठ वर्षांपासून आहेत. सन २००६ मध्ये पूर्व मेळघाट येथे उपवनसंरक्षक पदावर सलग तीन वर्षे कार्यरत होत्या. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागात सन २००९ ते २०११ पर्यंत उपवनसंरक्षक होत्या. मध्यंतरी त्यांची बदली झाल्यानंतर मुख्यवनसंरक्षक म्हणून पुन्हा त्या अमरावती येथे सन २०२१ मध्ये आल्या. त्यामुळे बॅनर्जी यांची सलग आठ वर्षे सेवा आणि जिल्ह्याशी थेट संबंध येत असल्याचे स्पष्ट होते. तसेच मेळघाटमध्ये सीसीएफ बॅनर्जी यांची चांगली ओळख असल्याने याबाबत निवडणूक आयोगाने लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय विभागीय वनाधिकारी या पदापासून ते वनपरिक्षेत्रधिकारी असे एकाच जागेवर ठाण मांडून असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगTransferबदली