शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

चमकोगिरीला उधाण कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:01 IST

गणपतीच्या शुभेच्छा, मंत्र्यांच्या आगमनाचे स्वागत, विकासकामांचे भूमिपूजन, वाढदिवसाच्या शुभेच्छा याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारा अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे असताना या विभागाकडे धाडसच नसल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

ठळक मुद्देशहर सौंदर्याचे विद्रुपीकरण : महापालिकेचा बाजार परवाना विभाग करतो तरी काय?

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चौकाचौकांत लागलेल्या अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण अन् महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. हे होर्डिंग्ज रस्त्यावर पडत असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सणासुदीत व्यावसायिक, निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी व बाराही महिने पेव फुटलेले कोचिंग क्लासेस यांचे अनधिकृत होर्डिंग्जच्या विळख्यात शहर आहे. महापालिकेच्या बाजार परवाना विभागाद्वारा कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे.गणपतीच्या शुभेच्छा, मंत्र्यांच्या आगमनाचे स्वागत, विकासकामांचे भूमिपूजन, वाढदिवसाच्या शुभेच्छा याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारा अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे असताना या विभागाकडे धाडसच नसल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे राहणीमानाच्या निर्देशांकात राज्यात टॉप तीनमध्ये असणारे शहर हेच काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.या चमकोगिरीसाठी सर्व नियम, कायदे पायदळी तुडविले जात आहे. बाजार परवाना विभागाकडे महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांचे असणारे दुर्लक्ष व या विभागात जरब असणारा अधिकारीच नसल्यामुळे या प्रकारात दिवसेंदिवसेन वाढ होत आहे. अत्यंत स्वस्त व सवंग जाहिरातीच्या या प्रकाराला पायबंध घालणार कोण, असा नागरिकांचा सवाल आहे. अगदी थातूरमातूर कारवाई करण्यात धन्यता माननाऱ्या या विभागाची महापालिकेत गरजच काय, अन् नागरिकांच्या भरलेल्या करातून देखाव्यासाठी कशाला हा विभाग ठेवता, असा सवाल अमरावतीकरांचा आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान आयोगाचे निर्देश आहेत म्हणून ही होर्डिंग्ज काढण्यात आली. त्यानंतर शहराची स्थिती पुन्हा जैसे थै राहणार आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची वाट पाहणार, त्यामुळे उत्पन्नावर घाला घालणाºया या विभागाचे काम तरी कोणते? तसेही महापालिकेने काढले नाही तर निवडणूक यंत्रणेद्वारा अधिकृत अन् अनधिकृत चमकोबाजांची फलके काढणार आहे. त्यामुळे शहर सौंदर्याची वाट लावणाºया या विभागावर आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोणबाजार परवाना विभागाद्वारा अधिकृत होर्डिग्जला परवानगी देताना त्यांच्याच मजकुराची पडताळणी केली जाते. जेथे फलक लावायचा आहे, त्या ठिकाणच्या सर्व संबंधित ‘ना हरकत परवानगी’ मागितली जाते. किती कालावधीसाठी हा फलक राहणार, याचे स्टिकर त्या होर्डिंग्जवर लावले जाते. अन्यथा बाजार परवाना विभागाद्वारा महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायद्याचे अधिनियम १९९५ अंतर्गत प्रावधान आहे. यात तीन महिन्यांची शिक्षा व दोन हजारांचा दंड किंवा एकाचवेळी दोन्ही प्रकारच्या शिक्षेची यात तरतूद आहे. मात्र, बाजार परवाना विभागात कारवाई करण्याची हिंमतच नसल्यामुळे या चमकोगिरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे किती प्रमाणात पालन?भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी वैयक्तिक किंवा पक्षाची होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, डिजिटल फ्लेक्स लावू नयेत, कमानी उभारू नयेत, त्यावर मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांचे छायाचित्र प्रदर्शित करू नयेत, अशा सूचना प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मार्च महिन्यात केल्या आहेत. तसेच सूचनेचे सक्तीने पालन करावे, अशी तंबीदेखील सदर पत्रात देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेतील भाजप पदाधिकाºयांचे कित्येक अनधिकृत फलक चौकाचौकांत दृष्टीपथास येत आहेत. त्यामुळे अन्य पक्षीय पदाधिकाºयांकडून काय अपेक्षा करावी, असा नागरिकांचा थेट सवाल आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती