शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

इतवारा बाजारात किती ही गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 06:00 IST

महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत.

ठळक मुद्दे‘कोरोना’ - छेद सुरक्षिततेला : आरोग्याची काळजी घेण्याचा विसर, महापालिका पथकाकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदी करता यावे, यासाठी दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. हे वारंवार सांगितले जात असूनही इतवारा बाजारात बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अमरावतीकरांनी गर्दी केली. ‘स्वत:ला जपा, सुरळीत काळजी घ्या’ या ‘कोरोना नियंत्रणा’चा विसर पडल्यागत नागरिकांना येथे संचार होता, हे विशेष.महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू खरेदी करताना चार तासांच्या कालावधीत जी मिळेल ती वस्तू खरेदी करण्याची मानसिकता नागरिकांची झाली आहे.एकच गर्दी झाल्यामुळे इतवारा बाजारात काहीवेळ रेटारेटी झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचनेला यावेळी बगल देण्यात आली. वस्तू खरेदीच्या वेळी झालेल्या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. अखेर महापालिका फिरत्या पथकाने या गर्दीवर अंकुश मिळविला. दुकानदारांना नियोजनबद्धतेने वस्तू विक्री करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. नागरिकांनी सामाजिक कर्तव्य आणि प्राप्त परिस्थितीचा विचार करून वर्तन करावे, अशा सूचना महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी इतवारा बाजारातील गर्दी पांगविताना केल्यात.आता इतवारा बाजारात मिळेल फक्त किराणाइतवारा बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता येथे केवळ किराणा माल मिळणार आहे. इतवारा बाजारात फक्त किराणा दुकाने सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाजी विक्रीची दुकाने बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहे.अ‍ॅकेडमिक स्कूलमध्ये भाजी विक्री होणारवलगाव मार्गावरील अ‍ॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात आता भाजीपाला विक्री होणार असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. इतवारा बाजारात भाजीपाला खरेदीदरम्यान उसळणारी गर्दी ही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे इतवारा बाजारातून अ‍ॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात भाजी विक्री होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार