शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

इतवारा बाजारात किती ही गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 06:00 IST

महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत.

ठळक मुद्दे‘कोरोना’ - छेद सुरक्षिततेला : आरोग्याची काळजी घेण्याचा विसर, महापालिका पथकाकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदी करता यावे, यासाठी दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. हे वारंवार सांगितले जात असूनही इतवारा बाजारात बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अमरावतीकरांनी गर्दी केली. ‘स्वत:ला जपा, सुरळीत काळजी घ्या’ या ‘कोरोना नियंत्रणा’चा विसर पडल्यागत नागरिकांना येथे संचार होता, हे विशेष.महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू खरेदी करताना चार तासांच्या कालावधीत जी मिळेल ती वस्तू खरेदी करण्याची मानसिकता नागरिकांची झाली आहे.एकच गर्दी झाल्यामुळे इतवारा बाजारात काहीवेळ रेटारेटी झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचनेला यावेळी बगल देण्यात आली. वस्तू खरेदीच्या वेळी झालेल्या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. अखेर महापालिका फिरत्या पथकाने या गर्दीवर अंकुश मिळविला. दुकानदारांना नियोजनबद्धतेने वस्तू विक्री करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. नागरिकांनी सामाजिक कर्तव्य आणि प्राप्त परिस्थितीचा विचार करून वर्तन करावे, अशा सूचना महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी इतवारा बाजारातील गर्दी पांगविताना केल्यात.आता इतवारा बाजारात मिळेल फक्त किराणाइतवारा बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता येथे केवळ किराणा माल मिळणार आहे. इतवारा बाजारात फक्त किराणा दुकाने सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाजी विक्रीची दुकाने बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहे.अ‍ॅकेडमिक स्कूलमध्ये भाजी विक्री होणारवलगाव मार्गावरील अ‍ॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात आता भाजीपाला विक्री होणार असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. इतवारा बाजारात भाजीपाला खरेदीदरम्यान उसळणारी गर्दी ही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे इतवारा बाजारातून अ‍ॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात भाजी विक्री होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार