शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:11 IST

यंदा मान्सूनचा पाऊस ३० सप्टेंबर रोजी संपला आहे. पावसाळा जरी संपला असला तरी अकाली पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्याकारणाने लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला आहे.

ठळक मुद्देसात प्रकल्पांची दारे उघडीच

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा मान्सूनचा पाऊस ३० सप्टेंबर रोजी संपला आहे. पावसाळा जरी संपला असला तरी अकाली पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अकाली पावसाने प्रकल्पातील पाणीसाठा फारसा वाढण्याची शक्यता नाही. त्याकारणाने लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण ५०२ प्रकल्पांचा पाणीसाठा सरासरी ८० टक्क्यांवर स्थिरावला आहे.विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ८३.८६ टक्के आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ९०.३३ टक्के पाणीसाठा आहे. ४७३ लघु प्रकल्पांत ६९.८१ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, यापुढे पाणीसाठा वाढण्याची शक्यता नसल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. अद्यापही सात प्रकल्पांची दारे उघडीच आहेत. पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून, किमान पाच ते दोन सेंमीपर्यंत अद्याप अनेक प्रकल्पांचे गेट उघडेच आहेत.मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प ६९.८० टक्के, अरुणावती १५.८८ टक्के, बेंबळा १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५९.५४ टक्के, वान प्रकल्प १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ७१.३६ टक्के, पेनटाकळी १०० टक्के, खडकपूर्णा ९९.७ टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये उर्ध्व वर्धा, बेंबळा, वान व पेनटाकळी प्रकल्पांचे अद्यापही गेट उघडेच आहेत. त्यातून नदीपात्रात पाणीसाठा होत आहे. मात्र, विसर्गाचे प्रमाण घमी प्रतिसेकंदानें कमी करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.२४ मध्यम प्रकल्पांची स्थितीअमरावती जिल्ह्यतील शहानूर मध्यम प्रकल्पात ९९.३७ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा ९९.२२ टक्के, पूर्णा ९६.२७ टक्के, सपन १०० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस १०० टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५८.२८ टक्के, वाघाडी ९५.५३ टक्के, बोरगाव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ७२.५५ टक्के, उमा ६२.६७ टक्के, घुंगशी बॅरेज ९०.३३ टक्के, अडाण ८४.१९ टक्के, वाशीम जिल्ह्यातील सोनल ८८.१८ टक्के, एकबुर्जी ७६.२७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोेराडी ३३.२० टक्के, मन ९६.९३ टक्के तोरणा १०० टक्के, उतावळी १०० टक्के पाणीसाठा साचला आहे. त्याकारणाने आणखीन पाणी वाढण्याची शक्यता कमी आहे. पण परतीच्या किंवा अकाली पावसाने काही प्रमाणात पाणीसाठा वाढू शकते, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.तीन मध्यम प्रकल्पांची अद्यापही द्वारे उघडीचअमरावती जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांचे गेट अद्यापही उघडेच आहेत. ९ आॅक्टोंबर सकाळी सात पर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पाचे एक गेट २.५ सेंमीने उघडे आहे. ३ घमी प्रतिसकंदाने विसर्ग होत आहे. चंद्रभागा प्रकल्पाचे दोन गेट उघडे आहे. पाच सेंमीने ९.०० घमी प्रतिसेकंदाने विसर्ग होत आहे. सपन प्रकल्पाचे दोन गेट तीन सेंमीने उघडे असून ५.४८ घमीप्रसेकंदाने विसर्ग होत आहे.

टॅग्स :Waterपाणी