शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वांझोटे बियाणे उठले शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:07 IST

गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग, उडदाचे पीक बाद होऊन सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे अचानकपणे सोायाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले आहे.जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात कोल्हा-काकडा, रासेगाव, असदपूर, भातकुली तालुक्यात टाकरखेडा संभूमध्ये महाबीज व दर्यापूर तालुक्यात येलकी, यरंडी, गणेशपूर, दारापूर, शिंगणापूर आदी गावांमध्ये मयुर व सुंदरम या बियाणे कंपनी विरोधात शेतकºयांच्या कृषी विभागाकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असताना तुरीची उगवण क्षमता चांगली झाली. त्यामुळे पावसाचा खंड आदी कुठलेही कारण या ठिकाणी देता येणार नाही.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी आयुक्तांचे १७ आॅक्टोबर २०१३ च्या आदेशान्वये पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना झालेली आहे. या समितीद्वारा काही तक्रारींची पाहणी करण्यात आली. याविषयीचा अहवाल अद्याप अप्राप्त असला तरी बहुतांश ठिकाणी बियाण्यांची गुणवत्ता खराब असल्याने उगवण झालेली नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाºयाने सांगितले.याबाबत महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे अध्यक्षबियाणे, खते व कीटकनाशकासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेण्यासाठी कृषी आयुक्तांचे आदेशान्वये जिल्ह्यातील १४ तालुक्यात पाच सदस्यीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या समितीमध्येसबंधीत तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र व महाबीजचे प्रतिनिधी तसेच पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी सदस्य आहेत. तालुक्यात तक्रार होताच तिची नोंदवहीत नोंद घेऊन लगेच समिती अध्यक्षांकडे पाठविणे बंधनकारक आहे.तक्रारीनंतर सात दिवसांत शेताची पाहणी अनिवार्यतक्रार प्राप्त होताच ७ दिवसांच्या आत समिती अध्यक्षांनी समिती सदस्यांची भेट घेणे व सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.शेतकºयांकडे निविष्ठा खरेदीच्या पावत्यांची शहानिशा करून विहीत प्रपत्रात पंचनामा करून प्रत शेतकरी व कंपनीच्या प्रतिनिधींना देणेतक्रार अशलेल्या बियाण्याच्या प्लॉटचट नमुना घेवूण अधिसुचित प्रयोगशाळेत तपासणी करावयास पाठवीणे बंधनकारक आहे.तक्रार ज्या कंपनी विरोधात आहे. त्यांच्या प्रतिनिधीला व कृषी विके्रत्याला पाहणीच्या वेळी बोलावणे, त्यांची व शेतकºयाची साक्ष घेणे बंधनकारक