शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

वांझोटे बियाणे उठले शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:07 IST

गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग, उडदाचे पीक बाद होऊन सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे अचानकपणे सोायाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले आहे.जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात कोल्हा-काकडा, रासेगाव, असदपूर, भातकुली तालुक्यात टाकरखेडा संभूमध्ये महाबीज व दर्यापूर तालुक्यात येलकी, यरंडी, गणेशपूर, दारापूर, शिंगणापूर आदी गावांमध्ये मयुर व सुंदरम या बियाणे कंपनी विरोधात शेतकºयांच्या कृषी विभागाकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असताना तुरीची उगवण क्षमता चांगली झाली. त्यामुळे पावसाचा खंड आदी कुठलेही कारण या ठिकाणी देता येणार नाही.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी आयुक्तांचे १७ आॅक्टोबर २०१३ च्या आदेशान्वये पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना झालेली आहे. या समितीद्वारा काही तक्रारींची पाहणी करण्यात आली. याविषयीचा अहवाल अद्याप अप्राप्त असला तरी बहुतांश ठिकाणी बियाण्यांची गुणवत्ता खराब असल्याने उगवण झालेली नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाºयाने सांगितले.याबाबत महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे अध्यक्षबियाणे, खते व कीटकनाशकासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेण्यासाठी कृषी आयुक्तांचे आदेशान्वये जिल्ह्यातील १४ तालुक्यात पाच सदस्यीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या समितीमध्येसबंधीत तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र व महाबीजचे प्रतिनिधी तसेच पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी सदस्य आहेत. तालुक्यात तक्रार होताच तिची नोंदवहीत नोंद घेऊन लगेच समिती अध्यक्षांकडे पाठविणे बंधनकारक आहे.तक्रारीनंतर सात दिवसांत शेताची पाहणी अनिवार्यतक्रार प्राप्त होताच ७ दिवसांच्या आत समिती अध्यक्षांनी समिती सदस्यांची भेट घेणे व सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.शेतकºयांकडे निविष्ठा खरेदीच्या पावत्यांची शहानिशा करून विहीत प्रपत्रात पंचनामा करून प्रत शेतकरी व कंपनीच्या प्रतिनिधींना देणेतक्रार अशलेल्या बियाण्याच्या प्लॉटचट नमुना घेवूण अधिसुचित प्रयोगशाळेत तपासणी करावयास पाठवीणे बंधनकारक आहे.तक्रार ज्या कंपनी विरोधात आहे. त्यांच्या प्रतिनिधीला व कृषी विके्रत्याला पाहणीच्या वेळी बोलावणे, त्यांची व शेतकºयाची साक्ष घेणे बंधनकारक