शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आठवडाभर उसंत, तुरळक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:02 IST

जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञांची माहिती : १७ तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.गेल्या २४ तासांत धारणी तालुका वगळता पाऊस निरंक राहिला. जिल्ह्यात १ जून ते ९ आॅगस्ट या कालावधीत ५००.४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५५३.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ११०.६ टक्केवारी आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्याने पावसाची सरासरी पार केलेली आहे. विशेष म्हणजे यंदाचा निम्मा पावसाळा झाल्यानंतर दहा तालुक्यांत पावसाने सरासरी पार केलेली आहे.यामध्ये अमरावती ११०.७ टक्के, भातकुली ६९.५, चांदूर रेल्वे १२४, धामणगाव १२८.३, अचलपूर ११८.४, चांदूर बाजार १४१.३, दर्यापूर १०९.५, अंजनगाव सुर्जी ११५.७, धारणी १३३.९ तर चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या ११९.४ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाच्या १२० पैकी ७१ दिवसा झाले असतांनाही भातकुली तालुक्यात ६९.५ टक्के, नांदगाव खंडेश्वर ९८.३, तिवसा ९६.४, मोर्शी ८९.८ व वरुड तालुक्यात ८३.८ टक्के पाऊस पडल्याने हे पाच तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.हवामानाची सद्यस्थिती४ तारखेला बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर गुजरात, दक्षिण राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्रात आहे. सोबत चक्राकार वारे आहेत. उत्तर बंगालच्या उपसागरावर व आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहिल्याने विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी १७ आॅगस्टपर्यंत पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील. १२ तारखेला उत्तर बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ही प्रणाली वायव्य दिशेने सरकरणार असल्याची शक्यता असल्याने मध्य भारतात पावसात वाढ होईल, त्याचा विदर्भाला फारसा फायदा होणार नसल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराRainपाऊस