शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसमारंभांना ३-१ मार्चपर्यंत मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

सायन्स कोर मैदानावरील हस्तकला विक्री व प्रदर्शन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रदर्शनाची परवानगी ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र प्रदर्शन आयोजकांना दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, स्विमिंग टँक, व्यायामशाळा, खासगी कोचिंग क्लासेसला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिनेमागृह, स्विमिंग टँक, नाट्यगृहे व खासगी कोचिंग क्लासेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी दिले. गर्दी होऊ नये, यासाठी सभागृह, मंगल कार्यालये व मंडपातील सर्व कार्यक्रमदेखील ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणाला दिले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक आदेश १३ मार्चपासून लागू करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू करण्यात आला आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग व कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात येऊ नये, दिली असल्यास रद्द करावी. सभागृह, मंगल कार्यालये व मंडपातील सर्व समारंभ ३१ मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ, महापालिकेचे आयुक्त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व मुख्याधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.सायन्स कोर मैदानावरील हस्तकला विक्री व प्रदर्शन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रदर्शनाची परवानगी ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र प्रदर्शन आयोजकांना दिले आहे.आयसोलेशन वार्डातील व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. क्वारंटाइन कक्षात सध्या एकही रुग्ण नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. मंडप व मंगलकार्यालयातील कार्यक्रम स्थगितीच्या सूचना दिल्यात.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीपालकमंत्र्यांद्वारा आज यंत्रणेचा आढावाकोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंध घालण्याकरिता शासनाने अत्यावश्यक पावले उचलली आहे. यंत्रणाही सुसज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी केले. यासंदर्भात सोमवारी सर्व यंत्रणेचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरी व ग्रामीण यंत्रणा अशा दोन टप्प्यात ही बैठक होणार आहे.जागृतीसाठी तालुक्यांना १० हजारमुख्यमंत्र्यांनी व्हीसीमध्ये बुधवारी दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाविषयक जागृतीसाठी प्रत्येक तालुक्याला १० हजारांचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. यानुसार आता फलक, पोस्टर व अन्य माध्यमातून गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काय करावे व काय करु नये आदीद्वारे प्रत्येक गावात जागर केला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.महापालिका क्षेत्रात शाळा बंदचे आदेशअमरावती महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व खासगी शाळा व महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी अब्दूल राजीक यांनी रविवारी दिले. १० व १२ वीच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घ्याव्यात. आजारी विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित संस्थाप्रमुखांना देण्यात आलेले आहे.सह्याद्री महानाट्य रद्दचे निर्देशयेथील शिवाजी बीपीएड कॉलेजच्या पटांगणात ९ ते ११ एप्रिल दरम्यान सह्याद्री महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांद्वारा जिल्हा प्रशासनाला १२ मार्चला पत्र देण्यात आले. यामध्ये ५०० कलावंत यासह हत्ती, घोडे, उंट व कार्यक्रमाला किमान ५ ते ६ हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचे नमूद आहे. मात्र, गर्दीचे कार्यक्रम रद्दचे शासनादेश असल्याने हा कार्यक्रम रद्दचे आदेश आरडीसी नितीन व्यवहारे यांनी १३ मार्चला दिले.‘त्या’ नागरिकांच्या तपासणीसाठी दोन पथकेपरदेशतून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकृतीची चौकशी करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आलेली आहेत. रविवारी सीएस कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा पुनसे व डॉ राहुल परसावणे व सिस्टर स्मिता रंगारी यांचा पथकात समावेश आहे. नागरिकांशी सौदार्हपूर्ण शब्दांत विचारणा करा व विहित कालावधीत तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व शाळा बंदचे आदेशशहर व ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये व आयटीआयदेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय जिल्हाभरातील सर्व अंगणवाड्यादेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ, महापालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी पत्र जारी केले आहे.सांस्कृतिक भवनात निवडणूक प्रशिक्षण कसे?ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात रविवारी येथील सांस्कृतिक भवनात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षणोत्सवासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. प्रशिक्षणालादेखील कर्मचाऱ्यांची गर्दी होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा हा दुजाभाव का, अशी विचारणा होत आहे. यानंतर २५ ते ३० कर्मचाऱ्यांना ग्रुपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना