संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : कोरोनाच्या संकटामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. बाजारात ग्राहकच नसल्याने टोमॅटो, टरबूज, खरबूज, कांद्याचे भाव पडल्याने नफा तर दूरच, उत्पादन घेण्यासाठी लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे तालुक्यातील भाज्यांचे उत्पादन घेणारा शेतकरी लॉकडाऊन झाला आहे. ऐन खरिपाच्या तोंडाव त्यांच्यावर सुलतानी संकट कोसळले आहे.टोमॅटोच्या एका कॅरेटमध्ये २५ ते २६ किलो माल साठवलेला असतो. अलीकडच्या काळात टोमॅटोला फक्त ४० ते ५० रुपये प्रतिकॅरेट भाव मिळाला. त्यातही बाजारपेठेत विक्रीसाठी नेलेला टोमॅटोचा निम्मे माल खपत होता व निम्मे माल तसाच पडून राहत होता. मजुरीचा खर्चही निघत नाही म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पिकाला पाणी व खते देणे बंद केले. ते पीक सुकल्यावर त्याची कापणी सुरू केली असल्याचे माहुली चोर येथील शेतकºयांनी सांगितले.यंदा बाजारपेठेत टरबूजही हुंडीने विकले गेले नाही. बरेचदा ते बाजारातून शेतक ºयांना परत आणावे लागले. खरबुजाची तर दयनीय अवस्था झाली होती. त्याला फक्त तीन ते चार रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. त्याच्या तोडीचा मजुरी खर्च व वाहतुकीचे भाडेही निघत नव्हते. म्हणून बºयाच शेतकºयांनी शेतातील खरबुजाची तोडही केली नाही.बाजारपेठेत ग्राहक नसल्याने कांद्याच्या मालालाही उठाव नव्हता. त्यामुळे शेतकºयांना माल साठवून ठेवावा लागला. त्यातील बराच माल खराब झाला.उत्कृष्ट प्रतीचा कांदा सात रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला व बारीक कांदा चार रुपये किलो दराने विकला गेला. जोडकांद्याला तीन रुपये प्रतिकिलो दर मिळाला.शेतात साडेचार एकरात टोमॅटो पीक होते. टरबूज व खरबुजाचे चार एकरावर पीक होते. त्यावर एकरी ६५ हजार रुपये खर्च झाला. यंदा खर्चही निघाला नाही.-अनिल झंझाट, शेतकरी, माहुली चोर
टरबूज, कांदा, टोमॅटो, उत्पादकांवर कोरोनाने ओढवले संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST
टोमॅटोच्या एका कॅरेटमध्ये २५ ते २६ किलो माल साठवलेला असतो. अलीकडच्या काळात टोमॅटोला फक्त ४० ते ५० रुपये प्रतिकॅरेट भाव मिळाला. त्यातही बाजारपेठेत विक्रीसाठी नेलेला टोमॅटोचा निम्मे माल खपत होता व निम्मे माल तसाच पडून राहत होता. मजुरीचा खर्चही निघत नाही म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पिकाला पाणी व खते देणे बंद केले. ते पीक सुकल्यावर त्याची कापणी सुरू केली असल्याचे माहुली चोर येथील शेतकºयांनी सांगितले.
टरबूज, कांदा, टोमॅटो, उत्पादकांवर कोरोनाने ओढवले संकट
ठळक मुद्देतयार मालाला ग्राहकच नाही : खरिपाच्या तोंडावर पैशांची चणचण; पीक उपटून काढण्यावर शेतकऱ्यांचा भर