शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देपाणी उचल करारनामा संपला : नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगर परिषद अणि चंद्रभागा प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यातील पाणी उचल करारनाम्याची मुदत संपल्यामुळे शहराचा चंद्रभागा प्रकल्पावरून होणारा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाकडून थांबविला जाऊ शकतो.अचलपूर नगरपालिकेकडून अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरांना चंद्रभागा धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. याकरिता चंद्रभागा प्रकल्पातील ६.१५ दलघमी पाणी शासनस्तरावरून आरक्षित ठेवण्यात आले आहे. पण, धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.अचलपूर नगरपालिकेकडून या पाणीपुरवठ्याचे नियोजन २०२४ ची लोकसंख्या विचारात घेऊन केले गेले. २०४० च्या संभाव्य २ लाख ३३ हजार या लोकसंख्येला दररोज २ कोटी ३० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन दिले गेले, तर २००७ मध्ये १ लाख २५ हजार लोकसंख्येला दररोज १ कोटी १० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे प्रस्तावित केले. या नियोजनानुसार दोन्ही शहरांतील नागरिकांना २४ तास मुबलक पाणी पुरविण्याचे स्पष्ट केले गेले. आज मात्र २४ तास तर सोडा, दिवसातून एकवेळा साधे तासभरही पाणी नागरिकांना मिळत नाही. अनेक भागात पाणीच पोहोचत नाही. धरणात पाणी असूनही नियोजनाअभावी नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाइप लाइनवर असलेल्या मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष करून त्याचे खापर नळावर बसविण्यात जाणाऱ्या टिल्लू मशीनवर प्रशासनाकडून फोडले जात आहे.३८ लाखांचे बीलधरणातून उचल केलेल्या पाण्यापोटी ३८ लाखांचे बिल थकीत होते. साडेसात लाख अजून नगर परिषदेकडून येणे बाकी आहे्. यादरम्यान पाणी बिलाचा वेळेवर भरणा न केल्याने ५२ हजारांचे व्याजही नगरपालिकेवर आकारण्यात आले आहे.पेचानुसार पाणीधरणातील आरक्षित पाणी गरजेनुसार करारनाम्याच्या अनुषंगाने मीटरच्या मदतीने मोजून घेणे अपेक्षित होते. पण, अचलपूर नगर परिषदेने तसे केले नाही. पाटबंधारे विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. मीटरऐवजी कॉक चा पेच उघडल्यावर किती पाणी मिळते, याचे मोजमाप केले गेले. एक-दोन पेच उघडले, तर किती घनमीटर पाणी दिले जाते, याचे गणित पाटबंधारे विभागाने मांडले. या अंदाजाच्या, कॉकच्या पेचाच्या गणितावर पाटबंधारे विभागाने नगर परिषदेला पाणी पुरविले आहे.नव्या मीटरची हमीपाणी थांबविताच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने एक महिन्यात नवे मीटर बसविण्याची हमी पाटबंधारे विभागाला दिली आहे. किंबहुना पाटबंधारे विभागाने तशी हमी नगर परिषदेकडून लेखी स्वरूपात घेतली आहे.अधीक्षक अभियंत्यांची भेट निर्देशपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे-देशमुख यांनी १९ मे रोजी चंद्रभागा प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या भेटीत हा प्राकार उघड झाला. पाण्याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी अभियंत्यांना दिलेत. यात एक दिवस नगरपालिकेचे पाणीही थांबविले गेले.पाणी पुरवठा योजनेकरिता चंद्रभागा प्रकल्पातून पाण्याची उचल करण्याकरिता आवश्यक असलेल्या करारनाम्याची मुदत संपली आहे. पाटबंधारे विभागासोबत समन्वय ठेवत करारनामा नव्याने करणे गरजेचे आहे. प्रकल्पस्थळी नवे मीटर बसविण्याची हमी अचलपूर नगरपरिषदेने दिली आहे.- शशांक फाटकरउपविभागीय अभियंता, चंद्रभागा प्रकल्प

टॅग्स :Socialसामाजिक