शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देपाणी उचल करारनामा संपला : नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगर परिषद अणि चंद्रभागा प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यातील पाणी उचल करारनाम्याची मुदत संपल्यामुळे शहराचा चंद्रभागा प्रकल्पावरून होणारा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाकडून थांबविला जाऊ शकतो.अचलपूर नगरपालिकेकडून अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरांना चंद्रभागा धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. याकरिता चंद्रभागा प्रकल्पातील ६.१५ दलघमी पाणी शासनस्तरावरून आरक्षित ठेवण्यात आले आहे. पण, धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.अचलपूर नगरपालिकेकडून या पाणीपुरवठ्याचे नियोजन २०२४ ची लोकसंख्या विचारात घेऊन केले गेले. २०४० च्या संभाव्य २ लाख ३३ हजार या लोकसंख्येला दररोज २ कोटी ३० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन दिले गेले, तर २००७ मध्ये १ लाख २५ हजार लोकसंख्येला दररोज १ कोटी १० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे प्रस्तावित केले. या नियोजनानुसार दोन्ही शहरांतील नागरिकांना २४ तास मुबलक पाणी पुरविण्याचे स्पष्ट केले गेले. आज मात्र २४ तास तर सोडा, दिवसातून एकवेळा साधे तासभरही पाणी नागरिकांना मिळत नाही. अनेक भागात पाणीच पोहोचत नाही. धरणात पाणी असूनही नियोजनाअभावी नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाइप लाइनवर असलेल्या मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष करून त्याचे खापर नळावर बसविण्यात जाणाऱ्या टिल्लू मशीनवर प्रशासनाकडून फोडले जात आहे.३८ लाखांचे बीलधरणातून उचल केलेल्या पाण्यापोटी ३८ लाखांचे बिल थकीत होते. साडेसात लाख अजून नगर परिषदेकडून येणे बाकी आहे्. यादरम्यान पाणी बिलाचा वेळेवर भरणा न केल्याने ५२ हजारांचे व्याजही नगरपालिकेवर आकारण्यात आले आहे.पेचानुसार पाणीधरणातील आरक्षित पाणी गरजेनुसार करारनाम्याच्या अनुषंगाने मीटरच्या मदतीने मोजून घेणे अपेक्षित होते. पण, अचलपूर नगर परिषदेने तसे केले नाही. पाटबंधारे विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. मीटरऐवजी कॉक चा पेच उघडल्यावर किती पाणी मिळते, याचे मोजमाप केले गेले. एक-दोन पेच उघडले, तर किती घनमीटर पाणी दिले जाते, याचे गणित पाटबंधारे विभागाने मांडले. या अंदाजाच्या, कॉकच्या पेचाच्या गणितावर पाटबंधारे विभागाने नगर परिषदेला पाणी पुरविले आहे.नव्या मीटरची हमीपाणी थांबविताच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने एक महिन्यात नवे मीटर बसविण्याची हमी पाटबंधारे विभागाला दिली आहे. किंबहुना पाटबंधारे विभागाने तशी हमी नगर परिषदेकडून लेखी स्वरूपात घेतली आहे.अधीक्षक अभियंत्यांची भेट निर्देशपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे-देशमुख यांनी १९ मे रोजी चंद्रभागा प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या भेटीत हा प्राकार उघड झाला. पाण्याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी अभियंत्यांना दिलेत. यात एक दिवस नगरपालिकेचे पाणीही थांबविले गेले.पाणी पुरवठा योजनेकरिता चंद्रभागा प्रकल्पातून पाण्याची उचल करण्याकरिता आवश्यक असलेल्या करारनाम्याची मुदत संपली आहे. पाटबंधारे विभागासोबत समन्वय ठेवत करारनामा नव्याने करणे गरजेचे आहे. प्रकल्पस्थळी नवे मीटर बसविण्याची हमी अचलपूर नगरपरिषदेने दिली आहे.- शशांक फाटकरउपविभागीय अभियंता, चंद्रभागा प्रकल्प

टॅग्स :Socialसामाजिक