शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अचलपूर-परतवाडा शहरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देपाणी उचल करारनामा संपला : नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगर परिषद अणि चंद्रभागा प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यातील पाणी उचल करारनाम्याची मुदत संपल्यामुळे शहराचा चंद्रभागा प्रकल्पावरून होणारा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाकडून थांबविला जाऊ शकतो.अचलपूर नगरपालिकेकडून अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरांना चंद्रभागा धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. याकरिता चंद्रभागा प्रकल्पातील ६.१५ दलघमी पाणी शासनस्तरावरून आरक्षित ठेवण्यात आले आहे. पण, धरणातील या आरक्षित पाण्याची उचल करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता व नगरपालिका यांच्यात पाणी उचल करारनामा केला जातो. त्यानुसारच धरणातून पाण्याची उचल केली जाते. करारनाम्याची मुदत सहा वर्षांची असते. सहा वर्षांनंतर परत काररनामा केला जातो. पण, नगरपालिकेकडून मुदत संपुष्टात आल्यानंतरही हा करारनामा अजूनपर्यंत करण्यात आलेला नाही.अचलपूर नगरपालिकेकडून या पाणीपुरवठ्याचे नियोजन २०२४ ची लोकसंख्या विचारात घेऊन केले गेले. २०४० च्या संभाव्य २ लाख ३३ हजार या लोकसंख्येला दररोज २ कोटी ३० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे नियोजन दिले गेले, तर २००७ मध्ये १ लाख २५ हजार लोकसंख्येला दररोज १ कोटी १० लाख लिटर पाणी वितरित करण्याचे प्रस्तावित केले. या नियोजनानुसार दोन्ही शहरांतील नागरिकांना २४ तास मुबलक पाणी पुरविण्याचे स्पष्ट केले गेले. आज मात्र २४ तास तर सोडा, दिवसातून एकवेळा साधे तासभरही पाणी नागरिकांना मिळत नाही. अनेक भागात पाणीच पोहोचत नाही. धरणात पाणी असूनही नियोजनाअभावी नागरिकांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाइप लाइनवर असलेल्या मोठ्या गळतीकडे दुर्लक्ष करून त्याचे खापर नळावर बसविण्यात जाणाऱ्या टिल्लू मशीनवर प्रशासनाकडून फोडले जात आहे.३८ लाखांचे बीलधरणातून उचल केलेल्या पाण्यापोटी ३८ लाखांचे बिल थकीत होते. साडेसात लाख अजून नगर परिषदेकडून येणे बाकी आहे्. यादरम्यान पाणी बिलाचा वेळेवर भरणा न केल्याने ५२ हजारांचे व्याजही नगरपालिकेवर आकारण्यात आले आहे.पेचानुसार पाणीधरणातील आरक्षित पाणी गरजेनुसार करारनाम्याच्या अनुषंगाने मीटरच्या मदतीने मोजून घेणे अपेक्षित होते. पण, अचलपूर नगर परिषदेने तसे केले नाही. पाटबंधारे विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. मीटरऐवजी कॉक चा पेच उघडल्यावर किती पाणी मिळते, याचे मोजमाप केले गेले. एक-दोन पेच उघडले, तर किती घनमीटर पाणी दिले जाते, याचे गणित पाटबंधारे विभागाने मांडले. या अंदाजाच्या, कॉकच्या पेचाच्या गणितावर पाटबंधारे विभागाने नगर परिषदेला पाणी पुरविले आहे.नव्या मीटरची हमीपाणी थांबविताच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने एक महिन्यात नवे मीटर बसविण्याची हमी पाटबंधारे विभागाला दिली आहे. किंबहुना पाटबंधारे विभागाने तशी हमी नगर परिषदेकडून लेखी स्वरूपात घेतली आहे.अधीक्षक अभियंत्यांची भेट निर्देशपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी ठाकरे-देशमुख यांनी १९ मे रोजी चंद्रभागा प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या भेटीत हा प्राकार उघड झाला. पाण्याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी अभियंत्यांना दिलेत. यात एक दिवस नगरपालिकेचे पाणीही थांबविले गेले.पाणी पुरवठा योजनेकरिता चंद्रभागा प्रकल्पातून पाण्याची उचल करण्याकरिता आवश्यक असलेल्या करारनाम्याची मुदत संपली आहे. पाटबंधारे विभागासोबत समन्वय ठेवत करारनामा नव्याने करणे गरजेचे आहे. प्रकल्पस्थळी नवे मीटर बसविण्याची हमी अचलपूर नगरपरिषदेने दिली आहे.- शशांक फाटकरउपविभागीय अभियंता, चंद्रभागा प्रकल्प

टॅग्स :Socialसामाजिक