शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सुरईच्या वापराने टळू शकतात जलजन्य आजार

By admin | Updated: July 7, 2015 00:06 IST

सुरईतील नळाद्वारे पाणी पिणे शाळकरी मुलांच्या दृष्टीने योग्य ठरते,

विद्यार्थ्यांसाठी उपयोगी : सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे ‘डब्ल्यूएचओ’ला पत्र वैभव बाबरेकर अमरावतीसुरईतील नळाद्वारे पाणी पिणे शाळकरी मुलांच्या दृष्टीने योग्य ठरते, असे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने जागतिक आरोग्य संघटनेला पाठविले आहे. त्यांनी ५० कुटुंबांतील शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण केले असता शाळकरी मुलांवर दूषित पाण्याचा प्रभाव पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील १२ ते १३ शाळा निवडून लहान मुलांच्या व्यवहाराकडे लक्ष दिले. त्यामध्ये शाळेतील मुले पाणी पिताना माठात हात बुडवून पाणी पीत असल्याचे लक्षात आले. पाण्यात हात बुडवीत असल्यामुळे माठातील पाणी दूषित होत आहेत आणि तेच पाणी शाळकरी मुले पीत असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. विभागाने जिल्ह्यातील ५० कुटुबांतील शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत चौकशी केली आहे. त्यामध्ये बहुतांश मुलांना सर्दी, ताप, डायरिया व खोकला आदी आजार आढळून आले आहेत. पुर्वीच्या काळात सुरळीतून पाणी पिण्याची पध्दत होती. मात्र आता ती लोप पावली आहे. अनेक शाळेनी ती पध्दत मोडित काढली असून आता वॉटर प्यूरिफाय किंवा केवळ पाण्याचे माठचा मुलांसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे लहान मुले जेवणाचा डब्बा खाल्यावर पाणी पिताना सरळ ग्लास माठात बुडवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शाळेत ४० टक्के विद्यार्थ्यांवर दूषित पाण्याचा प्रभाव पडत असल्याचे लश्रात आले आहेत. त्यामुळे शाळेमध्ये सुरळीतून पाणी पिण्याची पध्दत सुरु करण्यात यावी अशी मागणी सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने आरोग्य संघटनेला कळविले आहे. त्यातच मुलांना जेवताना चमच्याची सवय लावण्याच्या सुचना शाळेला देण्यात आल्या आहेत. शाळेतील मुलांना सुरळीतील पाणी पिण्याची सवय लावल्यास त्यांच्या आरोग्याच्या ३० ते ४० टक्के तक्रारी कमी होण्याचा दावा सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने केले आहे. लोणार सरोवरात आढळले अतिदुर्मीळ बॅक्टेरिया सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्यात अतिदुर्मीळ प्रजातीचे बॅक्टेरिया आढळून आले आहेत. त्यावर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रयोग शाळेत संशोधन सुरु आहे, अशी माहिती विभागप्रमुख दी.हो. तांबेकर यांनी दिली. हागणदारीमुक्त ५० गावांतील पाणी शुध्द १०० हागणदारी मुक्त गावाची तपासणी करण्यात आली. जे ५० गावे हागणदारीमुक्त नाहीत. तेथील पाणी दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेकडून सूक्ष्मजीव विभागाने यादी मागविली असून तेथील पाण्याचा दर्जा तपासण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. ७० टक्के रोग हे दूषित पाण्यामुळे होताच, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचा आहे. जिल्ह्यातील १२ शाळा निवडून मुलांच्या पाणी पिण्याच्या सवयीकडे लक्ष देण्यात आले. त्यामध्ये ५० कुटुबांंतील मुले दूषित पाण्यामुळे आजारी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुलांचा पाणी पिताना पाण्यात हात जाऊ नये. याची खबरदारी घेण्यासाठी शाळेत सुरईचा उपयोग करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेलाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. -दि.हो.तांबेकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख.