शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

सुरईच्या वापराने टळू शकतात जलजन्य आजार

By admin | Updated: July 7, 2015 00:06 IST

सुरईतील नळाद्वारे पाणी पिणे शाळकरी मुलांच्या दृष्टीने योग्य ठरते,

विद्यार्थ्यांसाठी उपयोगी : सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे ‘डब्ल्यूएचओ’ला पत्र वैभव बाबरेकर अमरावतीसुरईतील नळाद्वारे पाणी पिणे शाळकरी मुलांच्या दृष्टीने योग्य ठरते, असे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने जागतिक आरोग्य संघटनेला पाठविले आहे. त्यांनी ५० कुटुंबांतील शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण केले असता शाळकरी मुलांवर दूषित पाण्याचा प्रभाव पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील १२ ते १३ शाळा निवडून लहान मुलांच्या व्यवहाराकडे लक्ष दिले. त्यामध्ये शाळेतील मुले पाणी पिताना माठात हात बुडवून पाणी पीत असल्याचे लक्षात आले. पाण्यात हात बुडवीत असल्यामुळे माठातील पाणी दूषित होत आहेत आणि तेच पाणी शाळकरी मुले पीत असल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. विभागाने जिल्ह्यातील ५० कुटुबांतील शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबत चौकशी केली आहे. त्यामध्ये बहुतांश मुलांना सर्दी, ताप, डायरिया व खोकला आदी आजार आढळून आले आहेत. पुर्वीच्या काळात सुरळीतून पाणी पिण्याची पध्दत होती. मात्र आता ती लोप पावली आहे. अनेक शाळेनी ती पध्दत मोडित काढली असून आता वॉटर प्यूरिफाय किंवा केवळ पाण्याचे माठचा मुलांसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे लहान मुले जेवणाचा डब्बा खाल्यावर पाणी पिताना सरळ ग्लास माठात बुडवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शाळेत ४० टक्के विद्यार्थ्यांवर दूषित पाण्याचा प्रभाव पडत असल्याचे लश्रात आले आहेत. त्यामुळे शाळेमध्ये सुरळीतून पाणी पिण्याची पध्दत सुरु करण्यात यावी अशी मागणी सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने आरोग्य संघटनेला कळविले आहे. त्यातच मुलांना जेवताना चमच्याची सवय लावण्याच्या सुचना शाळेला देण्यात आल्या आहेत. शाळेतील मुलांना सुरळीतील पाणी पिण्याची सवय लावल्यास त्यांच्या आरोग्याच्या ३० ते ४० टक्के तक्रारी कमी होण्याचा दावा सुक्ष्मजीव शास्त्र विभागाने केले आहे. लोणार सरोवरात आढळले अतिदुर्मीळ बॅक्टेरिया सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्यात अतिदुर्मीळ प्रजातीचे बॅक्टेरिया आढळून आले आहेत. त्यावर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रयोग शाळेत संशोधन सुरु आहे, अशी माहिती विभागप्रमुख दी.हो. तांबेकर यांनी दिली. हागणदारीमुक्त ५० गावांतील पाणी शुध्द १०० हागणदारी मुक्त गावाची तपासणी करण्यात आली. जे ५० गावे हागणदारीमुक्त नाहीत. तेथील पाणी दूषित आढळून आले आहेत. जिल्हा परिषदेकडून सूक्ष्मजीव विभागाने यादी मागविली असून तेथील पाण्याचा दर्जा तपासण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. ७० टक्के रोग हे दूषित पाण्यामुळे होताच, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचा आहे. जिल्ह्यातील १२ शाळा निवडून मुलांच्या पाणी पिण्याच्या सवयीकडे लक्ष देण्यात आले. त्यामध्ये ५० कुटुबांंतील मुले दूषित पाण्यामुळे आजारी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुलांचा पाणी पिताना पाण्यात हात जाऊ नये. याची खबरदारी घेण्यासाठी शाळेत सुरईचा उपयोग करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेलाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. -दि.हो.तांबेकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख.