शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

पावसाळ्याअखेर ६५० गाव-वाड्यांमध्ये ‘टँकरवारी’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 15:58 IST

राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे.

प्रदीप भाकरे

अमरावती - यंदाच्या मोसमातील परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा अवघा ६६ टक्क्यांवर स्थिरावल्याने या जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही तीन वर्षांपूर्वी कोरड्या दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाडा विभागात जलसाठ्याची उपलब्धता चिंताजनक बनली आहे. पावसाचे शिल्लक दिवस पाहता, हिवाळ्यातच राज्याच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, १० सप्टेंबरअखेर राज्यातील २५९ गावे आणि ३९१ वाड्यांमध्ये एकूण २५८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागातील ९१ गावे व २८८ वाड्यांना एकूण ७८ टँकरने पेयजलाचा पुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ११८ गाव-वाड्यांची तहान १७ टँकरने भागविली जात आहे. औरंगाबाद विभागातील १४२ गावे व ३ वाड्यांना सर्वाधिक १५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ गावांत १३६ व जालना जिल्ह्यातील १४ गाव-वाड्यांमध्ये १७ टँकर लावण्यात आले आहेत. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटगी यांनी जाहीर केली आहे. नागपूर, कोकण व अमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी १० सप्टेंबरअखेर राज्यातील १८१६ गाव-वाड्यांमध्ये ३०२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

३२६७ प्रकल्पांमध्ये ६६.३६ टक्के पाणी

राज्यातील ३२६७ जलप्रकल्पांमध्ये १७ सप्टेंबरअखेर ६६.३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ५७.३८, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९२.५६, नागपूर प्रदेशातील ३८४ प्रकल्पांमध्ये ४९.८६, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ६४.४९, पुणे प्रदेशातील ७२६ प्रकल्पांमध्ये ८६.७१ व मराठवाडा प्रदेशातील ९६५ प्रकल्पांमध्ये केवळ २८.८३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी