शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पावसाळ्याअखेर ६५० गाव-वाड्यांमध्ये ‘टँकरवारी’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 15:58 IST

राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे.

प्रदीप भाकरे

अमरावती - यंदाच्या मोसमातील परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा अवघा ६६ टक्क्यांवर स्थिरावल्याने या जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही तीन वर्षांपूर्वी कोरड्या दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाडा विभागात जलसाठ्याची उपलब्धता चिंताजनक बनली आहे. पावसाचे शिल्लक दिवस पाहता, हिवाळ्यातच राज्याच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, १० सप्टेंबरअखेर राज्यातील २५९ गावे आणि ३९१ वाड्यांमध्ये एकूण २५८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागातील ९१ गावे व २८८ वाड्यांना एकूण ७८ टँकरने पेयजलाचा पुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ११८ गाव-वाड्यांची तहान १७ टँकरने भागविली जात आहे. औरंगाबाद विभागातील १४२ गावे व ३ वाड्यांना सर्वाधिक १५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ गावांत १३६ व जालना जिल्ह्यातील १४ गाव-वाड्यांमध्ये १७ टँकर लावण्यात आले आहेत. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटगी यांनी जाहीर केली आहे. नागपूर, कोकण व अमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी १० सप्टेंबरअखेर राज्यातील १८१६ गाव-वाड्यांमध्ये ३०२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

३२६७ प्रकल्पांमध्ये ६६.३६ टक्के पाणी

राज्यातील ३२६७ जलप्रकल्पांमध्ये १७ सप्टेंबरअखेर ६६.३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ५७.३८, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९२.५६, नागपूर प्रदेशातील ३८४ प्रकल्पांमध्ये ४९.८६, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ६४.४९, पुणे प्रदेशातील ७२६ प्रकल्पांमध्ये ८६.७१ व मराठवाडा प्रदेशातील ९६५ प्रकल्पांमध्ये केवळ २८.८३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी