शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

पावसाळ्याअखेर ६५० गाव-वाड्यांमध्ये ‘टँकरवारी’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 15:58 IST

राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे.

प्रदीप भाकरे

अमरावती - यंदाच्या मोसमातील परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, राज्यभरात तब्बल ६५० गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची स्थिती उद्भवली आहे. राज्यातील धरणांमधील जलसाठा अवघा ६६ टक्क्यांवर स्थिरावल्याने या जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही तीन वर्षांपूर्वी कोरड्या दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाडा विभागात जलसाठ्याची उपलब्धता चिंताजनक बनली आहे. पावसाचे शिल्लक दिवस पाहता, हिवाळ्यातच राज्याच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, १० सप्टेंबरअखेर राज्यातील २५९ गावे आणि ३९१ वाड्यांमध्ये एकूण २५८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागातील ९१ गावे व २८८ वाड्यांना एकूण ७८ टँकरने पेयजलाचा पुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ११८ गाव-वाड्यांची तहान १७ टँकरने भागविली जात आहे. औरंगाबाद विभागातील १४२ गावे व ३ वाड्यांना सर्वाधिक १५५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १२९ गावांत १३६ व जालना जिल्ह्यातील १४ गाव-वाड्यांमध्ये १७ टँकर लावण्यात आले आहेत. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील आठ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटगी यांनी जाहीर केली आहे. नागपूर, कोकण व अमरावती विभागातील बुलडाणा वगळता अन्य चार जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी १० सप्टेंबरअखेर राज्यातील १८१६ गाव-वाड्यांमध्ये ३०२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

३२६७ प्रकल्पांमध्ये ६६.३६ टक्के पाणी

राज्यातील ३२६७ जलप्रकल्पांमध्ये १७ सप्टेंबरअखेर ६६.३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ५७.३८, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९२.५६, नागपूर प्रदेशातील ३८४ प्रकल्पांमध्ये ४९.८६, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ६४.४९, पुणे प्रदेशातील ७२६ प्रकल्पांमध्ये ८६.७१ व मराठवाडा प्रदेशातील ९६५ प्रकल्पांमध्ये केवळ २८.८३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी