शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे. गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात जलजीवन मिशन : गाव कृती आराखडा; वाडी-वस्त्यांचाही होणार विचार

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छता अभियानाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम मिशन महाविकास आघाडी सरकारने हाती घेतली आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबवण्यात येणार असून, पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाचे पाणी मिळेल, या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना राबविली जाते. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्ण राहतात. बरेचदा पाणीपुरवठ्याचे स्रोत आटतात. उन्हाळ्यात गावांची तहान भागवण्यासाठी टँकर सुरू करावे लागतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक, सरपंचांनी कृती आराखडा तयार करावयाचा आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे.गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये योजना असतील; परंतु त्या अपुºया पडत असतील, अशा गावांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आधारित कृती आराखडा तयार करावा लागेल.जुन्या योजनेत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. आता दरडोई ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने हा आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच हा आराखडा तयार करताना गावातील पशुधनाची संख्या, त्यांना लागणारे पाणी यांचा विचार करावा लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.अधिकाऱ्यांना मिळाले प्रशिक्षणजलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, मुख्य कार्यकारी ते वरिष्ठ स्तरावरील अधिकाºयांपर्यंत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे कार्यशाळा पार पडली. यामध्ये केंद्रीय सचिवांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून केले जात असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी