शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

२०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे. गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात जलजीवन मिशन : गाव कृती आराखडा; वाडी-वस्त्यांचाही होणार विचार

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छता अभियानाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम मिशन महाविकास आघाडी सरकारने हाती घेतली आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबवण्यात येणार असून, पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाचे पाणी मिळेल, या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना राबविली जाते. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्ण राहतात. बरेचदा पाणीपुरवठ्याचे स्रोत आटतात. उन्हाळ्यात गावांची तहान भागवण्यासाठी टँकर सुरू करावे लागतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक, सरपंचांनी कृती आराखडा तयार करावयाचा आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे.गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये योजना असतील; परंतु त्या अपुºया पडत असतील, अशा गावांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आधारित कृती आराखडा तयार करावा लागेल.जुन्या योजनेत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. आता दरडोई ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने हा आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच हा आराखडा तयार करताना गावातील पशुधनाची संख्या, त्यांना लागणारे पाणी यांचा विचार करावा लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.अधिकाऱ्यांना मिळाले प्रशिक्षणजलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, मुख्य कार्यकारी ते वरिष्ठ स्तरावरील अधिकाºयांपर्यंत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे कार्यशाळा पार पडली. यामध्ये केंद्रीय सचिवांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून केले जात असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी