शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे. गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात जलजीवन मिशन : गाव कृती आराखडा; वाडी-वस्त्यांचाही होणार विचार

जितेंद्र दखने।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छता अभियानाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम मिशन महाविकास आघाडी सरकारने हाती घेतली आहे. त्यासाठी जलजीवन मिशन राबवण्यात येणार असून, पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सन २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाचे पाणी मिळेल, या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नळयोजना राबविली जाते. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्ण राहतात. बरेचदा पाणीपुरवठ्याचे स्रोत आटतात. उन्हाळ्यात गावांची तहान भागवण्यासाठी टँकर सुरू करावे लागतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक, सरपंचांनी कृती आराखडा तयार करावयाचा आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत यावर चर्चा करण्यात आली आहे.गावातील नमुना ८ वरील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जाणार आहे. त्याशिवाय किमान ५० लोकांच्या वाडी-वस्तीवरील घरांचाही विचार, कृती आराखडा करावा लागणार आहे. या लोकांना पाणीपुरवठा कसे द्यायचा, गावाच्या आजूूबाजूला पाण्याचे स्रोत कोणते, पाइप लाइन कुठून व कशी आणता येईल आदी मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये योजना असतील; परंतु त्या अपुºया पडत असतील, अशा गावांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी आधारित कृती आराखडा तयार करावा लागेल.जुन्या योजनेत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन केले होते. आता दरडोई ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने हा आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच हा आराखडा तयार करताना गावातील पशुधनाची संख्या, त्यांना लागणारे पाणी यांचा विचार करावा लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.अधिकाऱ्यांना मिळाले प्रशिक्षणजलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, मुख्य कार्यकारी ते वरिष्ठ स्तरावरील अधिकाºयांपर्यंत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे कार्यशाळा पार पडली. यामध्ये केंद्रीय सचिवांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून केले जात असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी