शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही ४२४ टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 15:41 IST

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही.

अमरावती : पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४१६ गावांमध्ये ४२४ टँंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय तात्पुरती उपाययोजना या अर्थाने २३७२ विहिरी दोन हजारांवर गावांची तहान भागवित असल्याचे पश्चिम विदर्भातील वास्तव आहे. यंदाच्या पावसाळ्यात १० जुलैपर्यंत सरासरी २३४.९ मिमी पावसाची अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६६.१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ७२ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला १८८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यात फक्त बुलडाणा जिल्ह्यात १०३ टक्के पाऊस पडला. उर्वरित चारही तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. सरासरीच्या सर्वात कमी ४५.५ टक्के पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झालेला आहे. अमरावती ६६.७, अकोला ८३.७ व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६४.४ टक्के  पाऊस पडला आहे.कमी पावसामुळे नदी-नाले प्रवाहीत नाही. प्रकल्प क्षेत्रातदेखील हीच स्थिती कायम असल्याने जलसाठा तसूभरही वाढलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचे जलास्त्रोत कोरडेच आहेत. जमिनीत आर्द्रताअभावी अर्ध्याअधिक क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. भर पावसाळ्यात ही स्थिती ओढावल्याने राज्य शासनाने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. हा तहानलेल्या गावांना दिलासा असला तरी पावसाची एकंदरीत स्थिती व हवामानतज्ज्ञांची माहिती गृहीत धरता जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ देणे महत्त्वाचे आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत धारणी, तेल्हारा, बाळापूर, बुलडाणा चिखली, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात पावसाने सरासरी पार केली तर भातकुली, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मूर्तिजापूर, यवतमाळ, कळंब, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी-जामणी, बुलडाणा व देऊळगाव राजा या तालुक्यात पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे.या आहेत पाणीटंचाईच्या उपाययोजनापश्चिम विदर्भात जुनअखेर ७७६ विंधन विहिरी, १२७ नळयोजनांची विशेष दुरूस्ती, ७४ तात्पुरत्या नळ योजनांची विशेष दुरूस्ती, ५६८ टँकर व २३७२ खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यासाठी एकूण ७८ कोटी ५५ लाख ५९ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी १०.२९ कोटी, नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी १२.३७ कोटी, तात्पुरत्या नळ योजनांसाठी ९.७१ कोटी, टँंकरने पाणी पुरवठ्यासाठी ३२.६० कोटी, विहिरींच्या अधिग्रहणासाठी १३.५७ कोटींची आवश्यकता आहे.टँकरने पाणीपुरवठ्याची जिल्हानिहाय स्थिती (५ जुलै)जिल्हा        तालुके    गावे    लोकसंख्या     टँकरअमरावती    १०    ५६    १,२२,७६६    ५७अकोला    ६    २९    ७१,९१९    ३४यवतमाळ    ८    ७२    १,१७,४४०    ७२बुलडाणा    १२    १९३    ३,७७,७९७    १९७वाशिम        ६    ६६    १,१४,२३६    ६४एकूण        ४२    ४१६    ८,०४,१५८    ४२४