शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही ४२४ टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 15:41 IST

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही.

अमरावती : पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४१६ गावांमध्ये ४२४ टँंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय तात्पुरती उपाययोजना या अर्थाने २३७२ विहिरी दोन हजारांवर गावांची तहान भागवित असल्याचे पश्चिम विदर्भातील वास्तव आहे. यंदाच्या पावसाळ्यात १० जुलैपर्यंत सरासरी २३४.९ मिमी पावसाची अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६६.१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ७२ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला १८८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यात फक्त बुलडाणा जिल्ह्यात १०३ टक्के पाऊस पडला. उर्वरित चारही तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. सरासरीच्या सर्वात कमी ४५.५ टक्के पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झालेला आहे. अमरावती ६६.७, अकोला ८३.७ व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६४.४ टक्के  पाऊस पडला आहे.कमी पावसामुळे नदी-नाले प्रवाहीत नाही. प्रकल्प क्षेत्रातदेखील हीच स्थिती कायम असल्याने जलसाठा तसूभरही वाढलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचे जलास्त्रोत कोरडेच आहेत. जमिनीत आर्द्रताअभावी अर्ध्याअधिक क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. भर पावसाळ्यात ही स्थिती ओढावल्याने राज्य शासनाने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. हा तहानलेल्या गावांना दिलासा असला तरी पावसाची एकंदरीत स्थिती व हवामानतज्ज्ञांची माहिती गृहीत धरता जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ देणे महत्त्वाचे आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत धारणी, तेल्हारा, बाळापूर, बुलडाणा चिखली, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात पावसाने सरासरी पार केली तर भातकुली, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मूर्तिजापूर, यवतमाळ, कळंब, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी-जामणी, बुलडाणा व देऊळगाव राजा या तालुक्यात पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे.या आहेत पाणीटंचाईच्या उपाययोजनापश्चिम विदर्भात जुनअखेर ७७६ विंधन विहिरी, १२७ नळयोजनांची विशेष दुरूस्ती, ७४ तात्पुरत्या नळ योजनांची विशेष दुरूस्ती, ५६८ टँकर व २३७२ खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यासाठी एकूण ७८ कोटी ५५ लाख ५९ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी १०.२९ कोटी, नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी १२.३७ कोटी, तात्पुरत्या नळ योजनांसाठी ९.७१ कोटी, टँंकरने पाणी पुरवठ्यासाठी ३२.६० कोटी, विहिरींच्या अधिग्रहणासाठी १३.५७ कोटींची आवश्यकता आहे.टँकरने पाणीपुरवठ्याची जिल्हानिहाय स्थिती (५ जुलै)जिल्हा        तालुके    गावे    लोकसंख्या     टँकरअमरावती    १०    ५६    १,२२,७६६    ५७अकोला    ६    २९    ७१,९१९    ३४यवतमाळ    ८    ७२    १,१७,४४०    ७२बुलडाणा    १२    १९३    ३,७७,७९७    १९७वाशिम        ६    ६६    १,१४,२३६    ६४एकूण        ४२    ४१६    ८,०४,१५८    ४२४