शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

वऱ्हाडात पाणीटंचाई; निवारणार्थ ७.३१ कोटींची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:24 IST

वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्दे१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ राबविलेल्या, राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरील खर्च या निधीतून भागविला जाईल.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २७ मार्च रोजी नाशिक विभागाला ३०२.९३ लाख, औरंगबाद विभागाला ४२१.१० लाख, अमरावती विभागाला ७३१.३५ लाख असे एकूण १४५५.३९ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.अमरावती विभागातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४४.१८ लाखांतून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. या तिन्ही जिल्ह्यांतील नागरी भागात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ६८७.१७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अमरावती, नाशिक आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करीत असताना तो उपयोजनानिहाय वितरित होईल, याची दक्षता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठाअकोला जिल्ह्यातील ६४ गावांना ५४ टँकरने, वाशिम जिल्ह्यातील ७ गावांना ७ टँकरने, बुलडाणा जिल्ह्यातील १८ गावांना १८ टँकरने, तर यवतमाळातील २२ गावांना अशा एकूण १११ गावांना १०१ टँकरने तूर्तास पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील एकाच गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची नोंद विभागीय आयुक्तालयात करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी