शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

वऱ्हाडात पाणीटंचाई; निवारणार्थ ७.३१ कोटींची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:24 IST

वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्दे१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ राबविलेल्या, राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरील खर्च या निधीतून भागविला जाईल.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २७ मार्च रोजी नाशिक विभागाला ३०२.९३ लाख, औरंगबाद विभागाला ४२१.१० लाख, अमरावती विभागाला ७३१.३५ लाख असे एकूण १४५५.३९ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.अमरावती विभागातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४४.१८ लाखांतून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. या तिन्ही जिल्ह्यांतील नागरी भागात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ६८७.१७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अमरावती, नाशिक आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करीत असताना तो उपयोजनानिहाय वितरित होईल, याची दक्षता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठाअकोला जिल्ह्यातील ६४ गावांना ५४ टँकरने, वाशिम जिल्ह्यातील ७ गावांना ७ टँकरने, बुलडाणा जिल्ह्यातील १८ गावांना १८ टँकरने, तर यवतमाळातील २२ गावांना अशा एकूण १११ गावांना १०१ टँकरने तूर्तास पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील एकाच गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची नोंद विभागीय आयुक्तालयात करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी