शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पीक उत्पादनवाढीसाठी जलसंपदा, कृषी विभाग येणार एकत्र

By admin | Updated: November 20, 2014 22:43 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंचन क्षेत्रावरुन महाभारत घडले असले तरी प्रत्यक्षात २० टक्केपर्यंत वाढलेल्या सिंचनक्षमतेचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने राज्य शासन कामाला लागले आहे.

जितेंद्र दखणे - अमरावतीनिवडणुकीच्या रणधुमाळीत सिंचन क्षेत्रावरुन महाभारत घडले असले तरी प्रत्यक्षात २० टक्केपर्यंत वाढलेल्या सिंचनक्षमतेचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने राज्य शासन कामाला लागले आहे. जलसंपदा व कृषी विभागातील अधिकाऱ्यांची यासाठी आता अगदी तालुका पातळीपर्यंत समन्वय समितीही आकारास येणार आहे.सिंचनातील भ्रष्टाचार व गैरव्यवहार हा कळीचा मुद्दा बनवीत विरोधी पक्षांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या तोंडाला फेस आणला होता. तेच विरोधक आज सत्तेत आले आहेत. विशेष म्हणजे याच सत्ताधाऱ्यांनी आता एक आदेश काढून २०१३ पर्यंत जलसंपदाच्या प्रकल्पामुळे राज्यात ४९.७० दशलक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या वाढलेल्या क्षमतेचा फायदा पिकांच्या उत्पादनवाढीसाठी करता यावा यासाठी जलसंपदा तसेच कृषी विभागाने समन्वय राखून काम करावे यासाठी सरकार कामाला लागले आहे. याकरिता राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समिती नियुक्त करण्याचे काम जोमाने सुरु झाले आहे. जलसंपदा विभागाचे अपर सचिव आर.बी. गलीयाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, १९७४ ते १९९२ या कालावधीत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत पीक उत्पादनासाठी जाणीवपूर्वक काम करण्यात आले होते. ही यंत्रणा २००० पर्यंत अस्तीत्वात होती. पुढे ती गुंडाळण्यात आली ही समिती पुन्हा कार्यरत असावी, अशी शिफारस सिंचनविषयक समितीनेही केली होती. २०१३ अखेर ४९.७० दशलक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. शासनाने या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या समन्वय समितींची निर्मिती केली. १० आॅक्टोबरला मुख्य सचिवांच्या पुढाकाराने दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यानुसार निर्माण झालेली सिंचन क्षमता व ओलीताखालील क्षेत्र यातील फरक दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल. बागायती शेती कशी करावी. पिकांचे नियोजन व व्यवस्थापन कसे करावे. बी बियाणे कीटकनाशके कोणती निवडावी, त्यांचे प्रमाण याबाबत शेतकऱ्यांना माहिती पुरविण्यात येईल. हे सर्व प्रयत्न संयुक्तपणे होणार आहेत.