शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

पीक उत्पादनवाढीसाठी जलसंपदा, कृषी विभाग येणार एकत्र

By admin | Updated: November 20, 2014 22:43 IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत सिंचन क्षेत्रावरुन महाभारत घडले असले तरी प्रत्यक्षात २० टक्केपर्यंत वाढलेल्या सिंचनक्षमतेचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने राज्य शासन कामाला लागले आहे.

जितेंद्र दखणे - अमरावतीनिवडणुकीच्या रणधुमाळीत सिंचन क्षेत्रावरुन महाभारत घडले असले तरी प्रत्यक्षात २० टक्केपर्यंत वाढलेल्या सिंचनक्षमतेचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी व्हावा, यादृष्टीने राज्य शासन कामाला लागले आहे. जलसंपदा व कृषी विभागातील अधिकाऱ्यांची यासाठी आता अगदी तालुका पातळीपर्यंत समन्वय समितीही आकारास येणार आहे.सिंचनातील भ्रष्टाचार व गैरव्यवहार हा कळीचा मुद्दा बनवीत विरोधी पक्षांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या तोंडाला फेस आणला होता. तेच विरोधक आज सत्तेत आले आहेत. विशेष म्हणजे याच सत्ताधाऱ्यांनी आता एक आदेश काढून २०१३ पर्यंत जलसंपदाच्या प्रकल्पामुळे राज्यात ४९.७० दशलक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या वाढलेल्या क्षमतेचा फायदा पिकांच्या उत्पादनवाढीसाठी करता यावा यासाठी जलसंपदा तसेच कृषी विभागाने समन्वय राखून काम करावे यासाठी सरकार कामाला लागले आहे. याकरिता राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समिती नियुक्त करण्याचे काम जोमाने सुरु झाले आहे. जलसंपदा विभागाचे अपर सचिव आर.बी. गलीयाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, १९७४ ते १९९२ या कालावधीत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत पीक उत्पादनासाठी जाणीवपूर्वक काम करण्यात आले होते. ही यंत्रणा २००० पर्यंत अस्तीत्वात होती. पुढे ती गुंडाळण्यात आली ही समिती पुन्हा कार्यरत असावी, अशी शिफारस सिंचनविषयक समितीनेही केली होती. २०१३ अखेर ४९.७० दशलक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. शासनाने या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांच्या समन्वय समितींची निर्मिती केली. १० आॅक्टोबरला मुख्य सचिवांच्या पुढाकाराने दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यानुसार निर्माण झालेली सिंचन क्षमता व ओलीताखालील क्षेत्र यातील फरक दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल. बागायती शेती कशी करावी. पिकांचे नियोजन व व्यवस्थापन कसे करावे. बी बियाणे कीटकनाशके कोणती निवडावी, त्यांचे प्रमाण याबाबत शेतकऱ्यांना माहिती पुरविण्यात येईल. हे सर्व प्रयत्न संयुक्तपणे होणार आहेत.