शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नंदनवनात पाणी पेटले : दिवसाआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन महिन्याच्या कामाला दोन वर्षे लावल्याचा संतापजनक प्रकार नगरवासीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. मागील दहा वर्षापासून विदर्भाचे नंदनवन व पर्यटकांचा ओढा कायम असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा घसा कोरडा आहे. 

नरेंद्र जावरे  लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शहराची तहान भागविणारा इंग्रजकालीन सक्कर तलाव दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कासवगतीच्या कामाने पावसाळा तोंडावर असताना अपूर्ण आहे. जानेवारी महिन्यापासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशात संबंधित विभाग आणि कंत्राटदाराची मनमानी व नियमबाह्य सुरू असलेले काम नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करणारे ठरले आहे.शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन महिन्याच्या कामाला दोन वर्षे लावल्याचा संतापजनक प्रकार नगरवासीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. मागील दहा वर्षापासून विदर्भाचे नंदनवन व पर्यटकांचा ओढा कायम असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा घसा कोरडा आहे. 

नव्याने निविदा, ५० लाखांनी बजेट वाढलेयंदा पुन्हा सक्कर तलावाचे काम अर्ध्यातून पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा बोलावण्यात आल्या. त्यामध्ये संबंधित विभागाने प्रचंड वेळ घेतला. परिणामी मे महिना उजाडला आणि आता कामाला सुरुवात झाली. यादरम्यान वर्ष वाढताच ५० लाखांनी बजेट वाढले.

जानेवारीतच केला तलाव खालीतलावाचे उर्वरित पुढील काम करण्यासाठी जानेवारी महिन्यातच तत्काळ तलाव रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आणि पाणीपुरवठा विभागाने तलाव रिकामासुद्धा केला. शहरवासीयांना तेव्हापासूनच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. प्रत्यक्षात काम सुरू व्हायला मे महिना उजाडला. 

थातूरमातूर काम आणि कंत्राटदाराचे पलायन सक्कर तलाव पाणीपुरवठा करणारा मुख्य तलाव आहे. त्याच्या प्रमुख भिंतीला लीकेज असल्याने १ कोटी ८३ लाखांच्या जवळपास निधी शासनाने मंजूर केला. गतवर्षी संबंधित विभागामार्फत कामाला सुरुवात झाली; परंतु आवश्यक असलेली काळी माती करजगाव आणि मुरुम गंगाधरी व कविठा खदानीमधून (लीड) देण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने जवळपास काळी माती आणि मुरुमाचा शोध घेतला; परंतु इको-सेन्सिटिव्ह झोन असल्याने प्रशासनाने नियमावर बोट ठेवले आणि चिखलदरा तहानलेले राहिले. ५० लाखांपेक्षा अधिक काम करून कंत्राटदाराने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविली व पळ काढला.

प्रक्रिया सुरू झाली आहे. तातडीने काम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. निविदा प्रक्रिया करण्यात विलंब झाला.- चैतन्य खंडारे, उपअभियंता, अचलपूर

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई