शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

वर्धा नदी कोरडी तिवसा तहानले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 01:24 IST

तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे.

तिवसा : तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा धस्कट येथे सरपंचांनी स्वखर्चातून टँकर बोलावून गावकऱ्यांची तहान भागविणे सुरू केले आहे.तिवसा, कुºहा, गुरुदेवनगर या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे. तिन्ही गावांत दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. शेंदोळा धस्कट, शेंदोळा खुर्द, शिरजगाव मोझरी व जावरा या गावांतदेखील आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यात शेंदोळा धस्कट येथे महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपासून कमी पर्जन्यमान झाल्याने ही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात भीषण पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला असताना, एकाही गावात प्रशासनाच्यावतीने टँकर पाठविण्यात आलेला नाही.ड्रमभर पाण्यासाठी ४० ते ६० रुपयेतिवसा शहरातील पाणीपुरवठा दहा ते पंधरा दिवसाआड होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. २० लिटर पाण्यासाठी त्यांना किमान ४० ते ६० रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे, आंघोळीला पाणी नसल्याने एरवी रोज होणारी आंघोळ दिवसाआड गेली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई