शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वरूड तालुक्याला संत्रा प्रकल्पाची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST

अनेकवेळा घोषणा संत्रा उत्पादकांची उपेक्षाचवरूड (अमरावती) : शेंदूरजनाघाट येथे अमरावती फ्रुट ग्रोवर इंडस्ट्रियल को-ऑप सोसायटी लिमिटेड नावाने संत्राचा ज्यूस ...

अनेकवेळा घोषणा संत्रा उत्पादकांची उपेक्षाचवरूड (अमरावती) : शेंदूरजनाघाट येथे अमरावती फ्रुट ग्रोवर इंडस्ट्रियल को-ऑप सोसायटी लिमिटेड नावाने संत्राचा ज्यूस काढणारी फॅक्टरी १९५७ मध्ये स्थापन या प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी २७ नोव्हेंबर १९६० रोजी केले होते. तेव्हा विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधल्याने हा परिसर विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून देशात परिचित झाला. सहकारी तत्त्वावर सुरु असलेला संत्रा प्रकल्पातून देशाच्या कानाकोपऱ्यात बंगळुरू, चेन्नई, कोलकता, मुंबई, कानपूर, अमृतसरसह आदी शहरांत संत्रा ज्यूस पोहचविला १९५८ ते १९६३ सुरळीत चालविल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जावर सुरू केलेल्या प्रकल्पाला राजाश्रय मिळाला नसल्याने आर्थिक घरघर लागली आणि प्रकल्प बंद पडला. यानंतर केवळ मागण्या कायम राहिल्या. परंतु प्रकल्प मिळाला नाही. प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा संत्रा प्रकल्पाचा असायचा, यावर तालुक्याचे राजकारण सुरू आहे. १९९२ साली संत्रावर प्रक्रिया करणारी सोपेक नावाची सहकारी तत्त्वावर संत्रा प्रक्रिया प्रकल्प वरूड लगत रोशनखेडा येथे सुरू केला. परंतु काळाच्या ओघात तो बंद पडला. यानंतर तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या मागणीची दाखल घेऊन मोर्शी, वरूड मतदार संघातील संत्रा उत्पादकांसाठी नोगा शासकीय संत्रा प्रकल्प मंजूर करून मायवाडी एमआयडीसीत उभा केला. थाटात उद्घाटन पार पडले आणि बंद झाला. शेतकऱ्यांचा पुन्हा आशेचा किरण मावळला. प्रत्येक पंचवार्षिकमध्ये याच मुद्द्यावर राजकारणापलीकडे काहीच झाले नाही.

संत्रा प्रकल्पाची मागणी वाढतच राहिली आणि राजकारणी झेलतच राहिले, अशी अवस्था झाली. २०१४ मध्ये भाजपा सरकार आले, अनिल बोंडे भाजपावर निवडून आले आणि राष्ट्रीय कृषी व संत्रा परिषद १ ते ४ ऑक्टोबर २०१५ ला वरूड येथील बाजार समितीच्या प्रांगणात घेतली होती. या परिषदेला उद्घाटन प्रसंगी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी संत्रावर प्रक्रिया करण्यासाठी वरूड येथे संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प तर मोर्शीला संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा डझनभर मंत्र्यासमोर झाली होती. परंतु हे आश्वासनसुद्धा हवेतच विरले.

यानंतर २४ डिसेंबर २०१७ मधे वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन सोहळ्यात केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील मिहानमध्ये पाच हजार कोटींचा संत्रा प्रकल्प स्वामी रामदेव बाबा पतंजलीच्यावतीने उभारणार असल्याने विदर्भातील संत्र्याला सुगीचे दिवस येतील, असे सांगितले होते. परंतु हा प्रकल्पसुद्धा उदयास आला नाही.

पुन्हा कोका कोलाचा प्रकल्प वरूडला होणार अशा घोषणा झाल्या आणि वरूडचा प्रकल्प मोर्शीत हिवरखेड (ठानाठुनी) येथे गेला.

२०१४ मध्या घोषणा झालेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प मोर्शीतून नांदेडला पळविला.

१० मार्च २०१२ च्या अर्थसंकल्प सादरीकरण झाले. त्यात वरूड, मोर्शीतील संत्राला भाव मिळावे म्हणून संत्रा उत्पादकांना दिलासा मिळेल, याकरिता केवळ अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प साकारण्याची दमदार घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु नेमका कुठे आणि किती आर्थिक तरतूद राहणार हे कोडेच आहे.

सर्व घोषणा गेल्या ६० वर्षांपासून हवेतच विरत असल्याची चर्चा असून शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही.