शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला चार बळींनंतर जाग

By admin | Updated: April 27, 2016 00:02 IST

परतवाडा-अचलपूर शहरात सोमवारी दिवसभर चौकाचौकांत शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांना पोलिसांनी दंड आकारला.

शेकडो वाहनांची तपासणी : ३ अधिकारी, ८० कर्मचाऱ्यांचा ताफा, ६२ हजारांचा दंड, ६०६ केसेस नरेंद्र जावरे  परतवाडा परतवाडा-अचलपूर शहरात सोमवारी दिवसभर चौकाचौकांत शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांना पोलिसांनी दंड आकारला. दंगा नियंत्रण पथकात एक दिवसासाठी ८० कर्मचारी व तीन अतिरिक्त अधिकारी पाठवून ही कारवाई करण्यात आली. परतवाडा बसस्थानक, जयस्तंभ चौक, चिखलदरा स्टॉप, बाजार समिती, मिल स्टॉप या आदी महत्त्वपूर्ण वर्दळीच्या रस्त्यावर वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. येथील वाहतूक विभागात नव्यानेच रुजू झालेले वाहतूक उपनिरीक्षक निशांत पुलेर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक तेजस्विनी गिरसावळे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जांभळी, धाकडे आदी अधिकाऱ्यांसह त्यांच्या दिमतीला जवळपास ८० अधिकाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. बेशिस्त वाहतुकीचा सामना परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातून अमरावती, अकोला, बैतूल, इंदूर, धारणी, चांदूरबाजार या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. दिवसभर शेकडो वाहन ये-जा करतात. अशात परतवाडा शहरातील बेशिस्त वाहतुकीचा सामना या तपासणी अधिकारी कर्मचाऱ्यांना करावा लागला. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करतांना अधिकाऱ्यांंनी सोबत फुलके आणली होती. तर सतत बेशिस्तीत भरधाव आणि वेगाने वाहने चालविणाऱ्यांची सोमवारी मात्र पंचाईत झाली. भरधाव दुचाकीसह ट्रकचालकांवर कारवाई होत असताना नियम धाब्यावर बसवून वाटेल तेथे थांबणे, रस्त्याच्या मधातून आॅटो वळविणे व उलट मुजोरी करणाऱ्या आॅटोंना लगाम लावणे गरजेचे झाले आहे. शहरात आवश्यकतेपेक्षा बेरोजगारीतून आॅटोची संख्या वाढली आहे. परिणामी त्यांच्या दादागिरीचा प्रयत्य शहरवासीयांंना दररोज येत आहे. सहाशे केसेस ६२ हजारांचा दंड परतवाडा शहरात सोमवारी पोलीस विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत सायंकाळशी ५ वाजेपर्यंत हजारांवर वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ट्रिपल शीट, विनावाहन परवाना, चालविण्याचा परवाना नसलेले. अवैध वाहतूक अशा एकूण ६०० सहा केस करून त्यांच्याकडून ६२ हजार ६० रुपये दंड वसूल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. नवा गडी नवा राज परतवाडा वाहतूक शाखेची नव्याने निशांत पुळेकर यांनी सूत्रे सांभाळल्या नंतर त्यांच्या दिमतीला नवीन कर्मचाऱ्यांचा ताफा देण्यात आला आहे. तेव्हा कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि सामान्य नागरिकांचा अपघातात नाहक बळी जाणे थांबविण्याची अपेक्षा बळावली आहे. मात्र ही स्थिती काहीच दिवस राहणार असेल तर समस्या पुन्हा उदभवल्याशिवाय राहणार नाही.चार बळींनंतर आली जाग शहरात अवैध आणि भरधाव वाहतुकीमुळे अपघात होत असून त्यात चौघांचा बळी गेला. शहरातील नेत्यांसह, राजकीय पक्षांना जाग आली. सर्वसामान्य नागरिक हातात कायदा घेऊ लागले. ट्रक आठवडी बाजारात दिसताच त्यावर दगडफेकहोऊ लागली आणि मग पोलीस विभागाला जाग आली. पालकमंत्री प्रवीण पोटेंना याबाबत भेटल्याने जिल्हाधिकारी किरण गीत्तेंनी दखल घेतली. इकडे आ.बच्चू कडू यांना बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागला. वाहतूक नियम सांगणे त्यांनाच भोवले. गुन्हा दाखल झाला. आठ वाहतूक कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी आणि सोमवारी शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या शिस्तीचे धडे गिरविण्यात आले.