शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला चार बळींनंतर जाग

By admin | Updated: April 27, 2016 00:02 IST

परतवाडा-अचलपूर शहरात सोमवारी दिवसभर चौकाचौकांत शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांना पोलिसांनी दंड आकारला.

शेकडो वाहनांची तपासणी : ३ अधिकारी, ८० कर्मचाऱ्यांचा ताफा, ६२ हजारांचा दंड, ६०६ केसेस नरेंद्र जावरे  परतवाडा परतवाडा-अचलपूर शहरात सोमवारी दिवसभर चौकाचौकांत शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करून त्यांना पोलिसांनी दंड आकारला. दंगा नियंत्रण पथकात एक दिवसासाठी ८० कर्मचारी व तीन अतिरिक्त अधिकारी पाठवून ही कारवाई करण्यात आली. परतवाडा बसस्थानक, जयस्तंभ चौक, चिखलदरा स्टॉप, बाजार समिती, मिल स्टॉप या आदी महत्त्वपूर्ण वर्दळीच्या रस्त्यावर वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. येथील वाहतूक विभागात नव्यानेच रुजू झालेले वाहतूक उपनिरीक्षक निशांत पुलेर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक तेजस्विनी गिरसावळे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जांभळी, धाकडे आदी अधिकाऱ्यांसह त्यांच्या दिमतीला जवळपास ८० अधिकाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. बेशिस्त वाहतुकीचा सामना परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातून अमरावती, अकोला, बैतूल, इंदूर, धारणी, चांदूरबाजार या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. दिवसभर शेकडो वाहन ये-जा करतात. अशात परतवाडा शहरातील बेशिस्त वाहतुकीचा सामना या तपासणी अधिकारी कर्मचाऱ्यांना करावा लागला. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करतांना अधिकाऱ्यांंनी सोबत फुलके आणली होती. तर सतत बेशिस्तीत भरधाव आणि वेगाने वाहने चालविणाऱ्यांची सोमवारी मात्र पंचाईत झाली. भरधाव दुचाकीसह ट्रकचालकांवर कारवाई होत असताना नियम धाब्यावर बसवून वाटेल तेथे थांबणे, रस्त्याच्या मधातून आॅटो वळविणे व उलट मुजोरी करणाऱ्या आॅटोंना लगाम लावणे गरजेचे झाले आहे. शहरात आवश्यकतेपेक्षा बेरोजगारीतून आॅटोची संख्या वाढली आहे. परिणामी त्यांच्या दादागिरीचा प्रयत्य शहरवासीयांंना दररोज येत आहे. सहाशे केसेस ६२ हजारांचा दंड परतवाडा शहरात सोमवारी पोलीस विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत सायंकाळशी ५ वाजेपर्यंत हजारांवर वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ट्रिपल शीट, विनावाहन परवाना, चालविण्याचा परवाना नसलेले. अवैध वाहतूक अशा एकूण ६०० सहा केस करून त्यांच्याकडून ६२ हजार ६० रुपये दंड वसूल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. नवा गडी नवा राज परतवाडा वाहतूक शाखेची नव्याने निशांत पुळेकर यांनी सूत्रे सांभाळल्या नंतर त्यांच्या दिमतीला नवीन कर्मचाऱ्यांचा ताफा देण्यात आला आहे. तेव्हा कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि सामान्य नागरिकांचा अपघातात नाहक बळी जाणे थांबविण्याची अपेक्षा बळावली आहे. मात्र ही स्थिती काहीच दिवस राहणार असेल तर समस्या पुन्हा उदभवल्याशिवाय राहणार नाही.चार बळींनंतर आली जाग शहरात अवैध आणि भरधाव वाहतुकीमुळे अपघात होत असून त्यात चौघांचा बळी गेला. शहरातील नेत्यांसह, राजकीय पक्षांना जाग आली. सर्वसामान्य नागरिक हातात कायदा घेऊ लागले. ट्रक आठवडी बाजारात दिसताच त्यावर दगडफेकहोऊ लागली आणि मग पोलीस विभागाला जाग आली. पालकमंत्री प्रवीण पोटेंना याबाबत भेटल्याने जिल्हाधिकारी किरण गीत्तेंनी दखल घेतली. इकडे आ.बच्चू कडू यांना बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागला. वाहतूक नियम सांगणे त्यांनाच भोवले. गुन्हा दाखल झाला. आठ वाहतूक कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी आणि सोमवारी शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या शिस्तीचे धडे गिरविण्यात आले.