शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाऊले चालती शाळेची वाट! विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 15:12 IST

Amravati News मार्च २०२० नंतर मुले थेट फेब्रुवारी २०२१ मध्येच शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांमध्येसुद्धा उत्स्फूर्तपणे शाळेत येण्याचा उत्साह दिसून येत आहे.

ठळक मुद्देआता अधिक प्रभावी अंमलबजावणीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क 

 अमरावती : दहा-अकरा महिने ऑनलाईन शाळा करून थकलेल्या विद्यार्थ्यांना आता नेहमीची शाळा हवीहवीसी वाटू लागली आहे. मार्च २०२० नंतर मुले थेट फेब्रुवारी २०२१ मध्येच शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांमध्येसुद्धा उत्स्फूर्तपणे शाळेत येण्याचा उत्साह दिसून येत असून, आजच्या घडीला मोर्शी शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची आढळून येत आहे. सर्व शाळांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात असले तरी संसर्ग वाढू लागल्याने कोरोना अटकावासाठी त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.

तालुक्यात सर्वांत मोठ्या शिवाजी शाळेत शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गावांवरून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असून, विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रवेशद्वारातील प्रवेशापासून ते शाळा सुटेपर्यंत शासनाच्या संपूर्ण नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची गांभीर्याने काळजी घेत असल्याचे दिसून येते. अनुपस्थित विद्यार्थी व पालकांशी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल प्रशासन, सामाजिक संस्था, विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

------------

टॅग्स :Schoolशाळा