शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 29, 2017 00:07 IST

शहरच नव्हे तर जिल्हाभरात गाजलेल्या स्थानिक चवरेनगरातील बहुचर्चित गिरिश खंडारे हत्याकांडाला पाच वर्षे उलटली असून....

पाच वर्षे पूर्ण : गिरीश खंडारे हत्याकांड सुनावणी ३० मे रोजी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरच नव्हे तर जिल्हाभरात गाजलेल्या स्थानिक चवरेनगरातील बहुचर्चित गिरिश खंडारे हत्याकांडाला पाच वर्षे उलटली असून आता या हत्याकांडाची सुनावणी ३१ मे रोजी होणार असून खंडारे कुटुंबियांच्या न्यायाच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.खंडारे कुटुंबच नव्हे तर सुनावणीकडे अमरावतीकरांचे लक्ष सुद्धा लागले आहे.अवैध व्यावसायिकांविरूद्ध लढा देणाऱ्या गिरिश खंडारेवर २५ जुलै २०१२ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान २९ जुलै २०१२ रोजी त्याचा मृत्यू झाला. २५ जुलै २०१२ च्या रात्री गिरिश खंडारे (२८,रा. चवरेनगर) हा त्याच्या तीन मित्रांसोबत घरी जात होता. गिरीशवर ७९ घावअमरावती : असताना गणेशनगर ते चवरेनगर मार्गावरील ‘परी स्टेशनरी’ प्रतिष्ठानासमोर हा प्राणघातक हल्ला झाला होता. आरोपींंनी गिरिशवर तलवार, चाकू व काठ्यांनी वार केल्यानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडून होता. घटनेची माहिती मिळताच त्याची बहिण समता खंडारे हिने घटनास्थळी धाव घेऊन त्याला तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले. बहिणीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सोन्या चांदूरकर (४०, रा. सरोज कॉलनी), गजेंद्र तिडके (३५,रा. महावीरनगर), गोलू तायडे (२५), प्रकाश तायडे (दोन्ही रा.शिवाजीनगर), प्रवीण मोहोड, सुधीर मोहोड, दीपक मोहोड व रोशन कडूविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३०२, १४३, १४७, १४८ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मृतदेहाच्या शवविच्छेदनावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करून मृतदेह न उचलण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शवविच्छेदनानंतर गिरिशवर शस्त्राचे तब्बल ७९ घाव आढळले होते. त्यामुळे गिरिशची अमानुषपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. नागरिकांचा रोष व तणावाची स्थिती बघता पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेतला आणि त्यांना काही दिवसांतच अटक केली होती. पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. आता या हत्याकांडाला पाच वर्षे पूर्ण झाले असून गिरिश खंडारेची आई, पत्नी व बहिण न्यायाची प्रतीक्षा करीत आहे. ३० मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) ज्ञानेश्वर मोडक यांच्या न्यायालयात हा अंतिम निर्णय होणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे अभियोक्ता सुनील देशमुख यांनी बाजू मांडली असून त्यांना माजी जिल्हा सरकारी वकील विवेक काळे व शोएब खान यांचे सहकार्य मिळाले तर बचाव पक्षातर्फे अभियोक्ता प्रशांत देशपांडे, वसिम मिर्झा, वासुदेव नवलानी व यादव यांनी बाजू मांडली. गिरिशची बहिण समता खंडारे यांची न्यायालयात साक्ष होणार होती. दरम्यान चार अज्ञात इसमांनी खंडारेच्या घरी जाऊन समता खंडारेला साक्ष न देण्यासंदर्भात धमक्या दिल्या होत्या.बहिण, पत्नीचा त्यागगिरिशच्या हत्येनंतर खंडारे कुटुंबियांचा एकुलता एक आधार गेल्यामुळे त्याची आई, बहिण व पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला. गिरिशसाठी त्यांनी आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याच्या बहिणीने लग्न केले नाही तर पत्नीने दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. गिरिशला न्याय मिळवून देण्यासाठीच त्यांनी हा त्याग केला आहे.