शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा

By admin | Updated: October 25, 2014 22:32 IST

यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले. दिवाळी सण आला तरी कापसाचा मुहूर्त नाही. अशातच रबी हंगामातील हरभरा पेरणीत शेतकरी जवळील पैसा खर्च करून बसला आहे. त्यामुळे प्रकाश देणाऱ्या दिवाळीत आर्थिकबाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अंधारात गेल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यंदा शेतीच्या हंगामात आजपर्यंतचा पावसाचा लहरीपणा शेती पिकांना प्रभावित करणारा ठरला आहे. कोरडवाहू खारपाणपट्ट्यात सध्या कापसाचा बोंड परिपक्व होत आहेत. त्यामुळे दिवाळीत यावर्षी अशा शेतकऱ्यांच्या घरी जुन्याच कापसाच्या वातीचे दिवे पेटविण्यात आले. अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी यंदाचा कापूस आला नाही. शेतात अद्याप सीतादहीसुद्धा झालेली नाही. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच पिकांसाठी वेगवेगळ्या बाबींवर आर्थिक खर्च करावा लागला. अशातच कपाशीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जाणवत होता. एकीकडे कीटकनाशकाची फवारणी सुरू होती. दुसरीकडे संरक्षित सिंचनाची सोय असलेले शेतकरी कापसाला तुषार सिंचनाद्वारे पाणी देत होते. काही दिवसांनंतर पावसाचा फेर सुरू झाला. त्यामुळे कपाशी पिकाच्या मशागतची कामे ठप्प झाली. शेतीत पाणी साचले होते. डवरे व निंदण न झाल्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला होता. हे पावसाचे वातावरण संपताच कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला होता. आता कपाशीची पाने लाल्यामुळे जळत आहेत. आधीच खरीप हंगामातील पहिल्यांदाच उत्पादन देणाऱ्या मूग पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. यानंतर सोयाबीन सवंगणी व तयार करण्याची कामे सध्या सुरू आहेत. मात्र वातावरणाचा फटका या पिकाला बसला आहे. शेंगातील दाणे साबुदाण्याच्या आकाराची असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनचे घटलेले उत्पादन व त्याला बाजारात मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. (प्रतिनिधी)