शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

पांढऱ्या सोन्याला मुहूर्ताची प्रतीक्षा

By admin | Updated: October 25, 2014 22:32 IST

यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून कापूस, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली होती. मात्र दोन्ही पिकांना फटका बसण्याच्या स्थितीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच मुगापाठोपाठ सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले. दिवाळी सण आला तरी कापसाचा मुहूर्त नाही. अशातच रबी हंगामातील हरभरा पेरणीत शेतकरी जवळील पैसा खर्च करून बसला आहे. त्यामुळे प्रकाश देणाऱ्या दिवाळीत आर्थिकबाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अंधारात गेल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यंदा शेतीच्या हंगामात आजपर्यंतचा पावसाचा लहरीपणा शेती पिकांना प्रभावित करणारा ठरला आहे. कोरडवाहू खारपाणपट्ट्यात सध्या कापसाचा बोंड परिपक्व होत आहेत. त्यामुळे दिवाळीत यावर्षी अशा शेतकऱ्यांच्या घरी जुन्याच कापसाच्या वातीचे दिवे पेटविण्यात आले. अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी यंदाचा कापूस आला नाही. शेतात अद्याप सीतादहीसुद्धा झालेली नाही. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच पिकांसाठी वेगवेगळ्या बाबींवर आर्थिक खर्च करावा लागला. अशातच कपाशीवर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जाणवत होता. एकीकडे कीटकनाशकाची फवारणी सुरू होती. दुसरीकडे संरक्षित सिंचनाची सोय असलेले शेतकरी कापसाला तुषार सिंचनाद्वारे पाणी देत होते. काही दिवसांनंतर पावसाचा फेर सुरू झाला. त्यामुळे कपाशी पिकाच्या मशागतची कामे ठप्प झाली. शेतीत पाणी साचले होते. डवरे व निंदण न झाल्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला होता. हे पावसाचे वातावरण संपताच कपाशीवर फुलकिडे, तुडतुडे, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला होता. आता कपाशीची पाने लाल्यामुळे जळत आहेत. आधीच खरीप हंगामातील पहिल्यांदाच उत्पादन देणाऱ्या मूग पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. यानंतर सोयाबीन सवंगणी व तयार करण्याची कामे सध्या सुरू आहेत. मात्र वातावरणाचा फटका या पिकाला बसला आहे. शेंगातील दाणे साबुदाण्याच्या आकाराची असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनचे घटलेले उत्पादन व त्याला बाजारात मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. (प्रतिनिधी)