शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

व्हॉल्व्ह लीक : हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:42 IST

नांदगावपेठ येथील महामार्गनजीक शासकीय वसाहतीनजीक जीवन प्राधिकरणच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लीक झाल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देनांदगावपेठ येथील घटनामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगावपेठ येथील महामार्गनजीक शासकीय वसाहतीनजीक जीवन प्राधिकरणच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लीक झाल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. मात्र, याकडे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकदिवसाआड नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे करण्यात येत आहे. राजकीय पुढारी पाणी मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नियोजन करण्याची विनंती करीत आहेत. मात्र, जीवन प्राधिकरणच्या पाइप लाइनमध्ये अनेक ठिकाणी लीकेज होत आहेत. नागरिकांनी माहिती दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, या गळतीचा व्हिडीओ तयार करून तो सामाजिक कार्यकर्त्यांनी मजीप्राचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ व कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांना पाठविला. त्यावरून कार्यकारी अभियंता कोपुलवार यांनी उशिरा रात्री घटनास्थळाला भेट दिली. अज्ञात व्यक्तीने व्हॉल्व्ह लीक करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहणीदरम्यान त्यांच्या निदर्शनास आले. व्हॉल्व्हचे लीकेज माणसे पाठवून मंगळवारी दुरुस्त केले जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.विधी महाविद्यालयाच्या मैदानात साचले तळेअधिकाऱ्यांना सापडेना लिकेजअमरावती : गेल्या आठ दिवसांपासून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाजवळ महराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीवर एक लीकेज आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सदर लीकेजमधून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे व ते पाणी विधी महाविद्यालयाच्या मैदानात साचत आहे. मात्र, याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी अधिकाºयांनी भेट दिल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश चारथळ यांनी दिली. मात्र, अधिकाºयांना गेल्या तीन दिवसांपासून नेमका लीकेज कुठे आहे व पाण्याचा अपव्यय कुठून होत आहे, ही बाब कळलेली नाही. त्यामुळे याबाबत विद्यार्थी, प्राध्यापकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.