शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

व्हायरल फिव्हर, रुग्णालये हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:37 IST

गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकाळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला : शासकीय, खासगी डॉक्टरांकडे रुग्णांची धाव

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ न कळत खाण्यात आल्याने सद्यस्थितीत विविध आजाराची लागण होत असल्याने शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ तसेच पाणी पिताना काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. या दिवसांत व्हायरल डिसीजच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. एकीकडे पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होत आहे.मागील पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण असून, सूर्यदर्शन दुर्लभ झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच ठिकठिकाणी नाल्या तुंबल्याने विविध आजारांची लागण होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ते २१ जुलै दरम्यान १५४ रुग्ण डायरियाचे, तीन न्युमोनियाचे, दोन कावीळ, ११८ रूग्णांनी टायफाईडचे उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सदर रूग्णांनी जिल्हा सामान्य रूग्णालायत यातील काही रूग्णांवर अद्यापही उपचार सुरूच असून, नव्याने दाखल झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत व्हायरल डिसीजचे रूग्ण तपासणीकरिता येत असल्याची महिती खासगी डॉक्टरांनी दिली. दूषित पाण्यामुळे अतिसाराच्या रूग्णांतही वाढत होत आहे. या दिवसांत पाईपलाईनच्या लिकेजसमुळे नागरिकांच्या घरापर्यंत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यातून अनेक जलजन्य आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे सर्वाधिक चांगले, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.अशी घ्या काळजीसर्दी, खोकला व ताप ज्यांना असेल त्यांनी शिंकताना रूमाल वापरावा, ताप असेल तर घरी आराम करावा, डायरियापासून वाचण्यासाठी उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, बाहेरील पाणी पिऊ नये, पाणी उखळून थंड करून प्यावे, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होत असून घरातील पाणी या दिवसांत निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते.सर्दी, ताप व खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. या दिवसांत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आजारी असल्यास ताप अंगावरून न काढता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.- श्यामसुंदर निकम, जिल्हाशल्यचिकित्सक अमरावती

टॅग्स :Healthआरोग्य