शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

व्हायरल फिव्हर, रुग्णालये हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:37 IST

गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकाळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला : शासकीय, खासगी डॉक्टरांकडे रुग्णांची धाव

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या पाच दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयासह, खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता रूग्ण धाव घेत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ न कळत खाण्यात आल्याने सद्यस्थितीत विविध आजाराची लागण होत असल्याने शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उघड्यावरील अन्नपदार्थ तसेच पाणी पिताना काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. या दिवसांत व्हायरल डिसीजच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. एकीकडे पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होत आहे.मागील पाच दिवसांपासून पावसाचे वातावरण असून, सूर्यदर्शन दुर्लभ झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यातच ठिकठिकाणी नाल्या तुंबल्याने विविध आजारांची लागण होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ते २१ जुलै दरम्यान १५४ रुग्ण डायरियाचे, तीन न्युमोनियाचे, दोन कावीळ, ११८ रूग्णांनी टायफाईडचे उपचार घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सदर रूग्णांनी जिल्हा सामान्य रूग्णालायत यातील काही रूग्णांवर अद्यापही उपचार सुरूच असून, नव्याने दाखल झालेल्या रुग्णांवरही उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत व्हायरल डिसीजचे रूग्ण तपासणीकरिता येत असल्याची महिती खासगी डॉक्टरांनी दिली. दूषित पाण्यामुळे अतिसाराच्या रूग्णांतही वाढत होत आहे. या दिवसांत पाईपलाईनच्या लिकेजसमुळे नागरिकांच्या घरापर्यंत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यातून अनेक जलजन्य आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी शुद्ध करून पिणे सर्वाधिक चांगले, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.अशी घ्या काळजीसर्दी, खोकला व ताप ज्यांना असेल त्यांनी शिंकताना रूमाल वापरावा, ताप असेल तर घरी आराम करावा, डायरियापासून वाचण्यासाठी उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, बाहेरील पाणी पिऊ नये, पाणी उखळून थंड करून प्यावे, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होत असून घरातील पाणी या दिवसांत निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते.सर्दी, ताप व खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. या दिवसांत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आजारी असल्यास ताप अंगावरून न काढता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.- श्यामसुंदर निकम, जिल्हाशल्यचिकित्सक अमरावती

टॅग्स :Healthआरोग्य