शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

गावविकास आराखडा, मंजुरीच्या मुद्यावर घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील जवळपास ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आमसभेत सर्वानुमते ठराव पारित, शासनाकडे पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सदर निधीतन गावविकास आराखड्यात समाविष्ट विकासकामे केली जाणार आहेत. सध्या ग्रामपंचायतींवर ग्रामसेवक आणि प्रशासक नेमले आहेत. त्यामुळे वरील निधीतून विकासकामे करताना कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावा, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून गावपातळीवरील विकास आराखडा मंजुरीचा अधिकार जिल्हा परिषदेला द्यावा, असा प्रस्ताव जयंत देशमुख यांनी मांडला. त्यानुसार सदर ठराव आमसभेत एकमताने पारित करून तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ८० टक्के आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के निधीचा वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील जवळपास ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. परिणामी सर्व ग्रापंचायतींचा कारभार ग्रामसेवक आणि प्रशासक या दोन्ही कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहे. अशातच आता ग्रामविकास विभागाने १५ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्त्याचा निधी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिला आहे.गाव विकासाचे दीडपट नियोजन केले आहे. मात्र, यात गावस्तरावर कुठली कामे निकडीचे आहेत, कुठली नंतर केली जाऊ शकतात. याप्रमाणे कामे होणे अपेक्षित आहे. परंतु एकाच प्रशासकाकडे ५ ते ७ गावांचा कारभार असल्याने गावाविकासाच्या कामात गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावविकास आराखडा मंजुरीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सभागृहाला देण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव माजी सभापती जयंत देशमुख यांनी मांडला. या प्रस्तावास जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंजुरी देत सभागृहात उपस्थित पदाधिकारी व सदस्यांच्या संमतीने हा ठराव एकमताने पारित केला आहे. सदर ठराव अंतिम निर्णयासाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे.शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द कराशेतात फवारणी करताना शेतकरी व शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर फवारणीदरम्यान शेतमजुरांना सुरक्षा किट पुरविण्याची जबाबदारी शेतमालकांवर टाकण्याचा अध्यादेश तत्कालीन सरकारने पारित करू न फवारणी करताना शेतमजुराचा विषबाधेतून मृत्यू झाल्यास संबंधित शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अध्यादेश रद्द करण्याचा ठराव सदस्य प्रकाश साबळे यांनी मांडला.

टॅग्स :zpजिल्हा परिषद