शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या नंदनवनात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:06 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीची पाणीटंचाई पाहता, पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्थानिकांमध्ये पाणीटंचाई व पाणीकपातीबाबत संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देतलाव कोरडे : चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीची पाणीटंचाई पाहता, पर्यटकांनी या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्थानिकांमध्ये पाणीटंचाई व पाणीकपातीबाबत संताप व्यक्त होत आहे.सिडकोच्या स्थापनेनंतर चिखलदऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा कांगावा केला जातो. मात्र, पेयजलाची समस्या चिखलदरावावीयांच्या पाचवीला पुजली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आराखडे आखण्यात आले. मात्र, ते कागदावरच राहिले. चिखलदरा शहर विकास प्राधिकरण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या बागलिंगा प्रकल्पानेही वणवण थांबलेली नाही. स्थानिकांमध्ये नागरिकांमध्ये दिवसा आड होणाºया पाणीपुरवठयाबाबत संताप व्यक्त होत आहे. पाण्याअभावी पर्यटकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतला चिखलदऱ्याचा बेत रद्द केला आहे.घोषणांचाच पाऊसविदर्भाच्या नंदनवनावर कोसळणाऱ्या पावसावर परतवाडा, अचलपूरनजीकची चंद्रभागा, सापन, शहानूर आदी प्रकल्पासह इतर लहान-मोठे तलाव अवलंबून आहेत. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळा येताच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनासह कोणीच गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. चिखलदºयात दरवर्षी घोषणांचा पाऊस होतो. त्या खरोखरीच घोषणा ठरतात.आठशे ग्राहक अन् तलाव कोरडेचिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. चिखलदऱ्यात केवळ ८६९ ग्राहक असून, त्यांच्यासाठी दररोज सहा लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील शक्कर तलाव व कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध असून, तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी १९९३ मध्ये पूर्णत्वास नेलेल्या शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील पाणीपुरवठा योजनेतूनच चिखलदरा शहराची तहान भागविली जात आहे.