शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढला, कॉरिडोरअभावी वन्यपशूंची नागरी वस्त्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:21 IST

जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अमरावती : जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाघाने माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या ९० टक्के घटना जंगलात, तर १० टक्के जंगल आणि गावांच्या सीमेवर झाल्या आहेत.वाघांच्या अधिवासात मानवी समूहाकडून होणा-या अतिक्रमणामुळे त्यांचे अधिवास असुरक्षित झाले आहेत. यंदा पाऊस कमी पडला. जंगलातील नदी-नाल्यांना अपुरे पाणी असल्याने वन्यपशू पाण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये धाव घेत असल्याचे चित्र आहे. जंगलालगतची गावे जंगलावर अवलंबून असल्यामुळे वाघ जंगलाबाहेर पडतात आणि जंगलालगतच्या गावांत प्रवेश करतात. त्याठिकाणी वाघ-मानव संघर्ष उद्भवतो. अधिकांश घटनांमध्ये वयात येणा-या वाघानेच हल्ले केले आहेत. हल्ल्यानंतर हा वाघ मृतदेह खातसुद्धा नाही. हे प्रमाण फार कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जंगलाशेजारच्या रहिवाशांसाठी वनविभागाकडून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. मात्र, या योजनांचा लाभ आदिवासींसह अन्य समूहांना मिळत नसल्याची ओरड आहे. नरभक्षक वाघांच्या हल्ल्यात सोमवार २ आॅक्टोबर २०१७ रोजी वरूड तालुक्यातील शहापूर शेतशिवारात गंगोत्री हिरालाल नवडे (६५) या महिलेचा मृत्यू झाला. तसेच वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या आदिवासीबहुल पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव या तिन्ही गावांत नरभक्षक वाघिणीच्या भीतीने दस-याला सोने देण्याची ४० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.ब्रह्मपुरी (चंद्रपूर) तालुक्यातील गोगाव येथे रविवार १ आॅक्टोबर २०१७ रोजी शेतावरून परतणा-या नामदेव नन्नावरे नामक शेतक-यावर वाघाने हल्ला चढविला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मागील काही महिन्यांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्षात वाढ झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. ही बाब वनविभागासाठी अतिशय चिंतनीय असून ब-याच ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मागील वर्षी १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यूसन २०१६ मध्ये १०२ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात ४७ वाघ, ३२ वाघीण आणि २३ प्रकरणांत वाघ होता की वाघीण, हे कळलेच नाही. यातील ३५ मृत्यू अनैसर्गिक, ४३ नैसर्गिक आणि २४ प्रकरणांत मृत्युची  कारणेच कळली नाहीत. सन २०१५च्या तुलनेत सन २०१६ मध्ये वाघांच्या मृत्यूची टक्केवारी देशात १४५ च्या वर वाढल्याचे ‘क्लॉ’ या संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

वाघांच्या मृत्यूची टक्केवारीजानेवारी ते मार्च २०१६- २८.४३ टक्केएप्रिल ते जून २०१६- २९.४१ टक्केजून ते सप्टेंबर २०१६- २१ टक्केआॅक्टोबर ते डिसेंबर २०१६- २१.५६ टक्के

वाघांचे वय आणि मृत्यूची टक्केवारीएक ते तीन वर्षे- २७.४५ टक्केचार ते नऊ वर्षे- ३०.३९ टक्केदहा वर्षांवरील- १९.६ टक्केवयांची माहिती नाही- २२.५४ टक्के