शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

विदर्भात मान्सूनला उशीर; दशकाचा रेकॉर्ड तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 11:49 IST

विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये १९ जून रोजी विदर्भात दाखलचक्रीय वात स्थितीमुळे पावसाचा जोर वाढणार

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.विदर्भात साधारणत: ८ ते ११ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची परंपरा आहे. रोहिणी नक्षत्रात शेती मशागतीची कामे आटपून ७ जूनला आरंभ होणाऱ्या मृग नक्षत्रात कपाशी पिकाची लागवण करण्यास शेती सज्ज ठेवली जाते. मात्र, पर्यावरणीय बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने पीक उत्पादनासह चारापाण्यावरही विपरीत परिणाम जाणवत आहे. सन २००४ पासून २०१४ पर्यंतचा आढावा घेतला असता, १९ जून २०१४ रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तेव्हा अल्प कालावधीची पिके मूंग, उडीद, ज्वारी, बाजरा यांची पेरणी शेतकऱ्यांना टाळावी लागली होती. केवळ सोयाबीन, तूर व कपाशी पिके घेण्यात आली. यंदा २२ जूनला मान्सून धडकल्याने जमिनीतील उष्णता कमी होण्याची वाट पाहण्यात हा महिना निघणार आहे. त्यामुळे जुलैमध्येच खºया अर्थाने पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.१९५९ मध्ये २९ जूनला झाले होते आगमनसन १९५९ साली २९ जून रोजी मान्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. आजवरच्या इतिहासातील हे सगळ्यात उशिरा झालेले आगमन ठरले आहे. सन १९७२ मध्ये जरी दुष्काळ पडला असला तरी मान्सूचे आगमन आधीच झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.४८ तासांत  पाऊसछत्तीसगड आणि जवळच्या क्षेत्रावर असलेल्या चक्रीय वात स्थितीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ४८ तासांमध्ये मान्सून मुंबईसह उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ व्यापणार असल्याची माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली.शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम!काही दिवस पावसाचा आनंद मिळणार आहे. मात्र, पुढल्या आठवड्याच्या मधातच मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याने पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल