शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विदर्भात मान्सूनला उशीर; दशकाचा रेकॉर्ड तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 11:49 IST

विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये १९ जून रोजी विदर्भात दाखलचक्रीय वात स्थितीमुळे पावसाचा जोर वाढणार

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात गेल्या दहा वर्षांत १९ जून २०१४ साली मान्सूनच्या आगमनासाठी सर्वाधिक उशीर झाला होता. २०१४ साली मान्सून १९ जून रोजी विदर्भात दाखल झाला होता. यंदा २२ जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाल्यामुळे यंदा गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे.विदर्भात साधारणत: ८ ते ११ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची परंपरा आहे. रोहिणी नक्षत्रात शेती मशागतीची कामे आटपून ७ जूनला आरंभ होणाऱ्या मृग नक्षत्रात कपाशी पिकाची लागवण करण्यास शेती सज्ज ठेवली जाते. मात्र, पर्यावरणीय बदलामुळे गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडत असल्याने पीक उत्पादनासह चारापाण्यावरही विपरीत परिणाम जाणवत आहे. सन २००४ पासून २०१४ पर्यंतचा आढावा घेतला असता, १९ जून २०१४ रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तेव्हा अल्प कालावधीची पिके मूंग, उडीद, ज्वारी, बाजरा यांची पेरणी शेतकऱ्यांना टाळावी लागली होती. केवळ सोयाबीन, तूर व कपाशी पिके घेण्यात आली. यंदा २२ जूनला मान्सून धडकल्याने जमिनीतील उष्णता कमी होण्याची वाट पाहण्यात हा महिना निघणार आहे. त्यामुळे जुलैमध्येच खºया अर्थाने पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.१९५९ मध्ये २९ जूनला झाले होते आगमनसन १९५९ साली २९ जून रोजी मान्सूनचे विदर्भात आगमन झाले होते. आजवरच्या इतिहासातील हे सगळ्यात उशिरा झालेले आगमन ठरले आहे. सन १९७२ मध्ये जरी दुष्काळ पडला असला तरी मान्सूचे आगमन आधीच झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली.४८ तासांत  पाऊसछत्तीसगड आणि जवळच्या क्षेत्रावर असलेल्या चक्रीय वात स्थितीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ४८ तासांमध्ये मान्सून मुंबईसह उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ व्यापणार असल्याची माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली.शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम!काही दिवस पावसाचा आनंद मिळणार आहे. मात्र, पुढल्या आठवड्याच्या मधातच मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याने पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल