शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

बेशिस्त वाहतुकीने घेतला चिमुकलीचा बळी

By admin | Updated: January 14, 2015 22:58 IST

स्थानिक पंचवटी चौकात आॅटोरिक्षाखाली चिरडून अवघ्या १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. किमया राजू मानकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती होलीक्रॉस मराठी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी होती.

अमरावती : स्थानिक पंचवटी चौकात आॅटोरिक्षाखाली चिरडून अवघ्या १२ वर्षीय चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. किमया राजू मानकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती होलीक्रॉस मराठी कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी होती. शहरातील बेशिस्त वाहतुकीनेच चिमुकल्या किमयाचा बळी घेतला अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी व्यक्त करीत आहेत. ही घटना बुधवारी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणेच बुधवारची सकाळ उगवली. शाळेत जाण्यासाठी तिची लगबगही नेहमीचीच. कडाक्याच्या थंडीतही शाळेच्या ओढीने पहाटे सातच्या आसपास ती घरातून निघाली. आईनेही तिला नेहमीप्रमाणेच निरोप दिला. पण, तिचा हसरा, टवटवीत चेहरा पुन्हा कधीच बघायला मिळणार नाही, याची पुसटशी कल्पनाही त्या माऊलीला नव्हती. ट्रकचालकाची माणुसकीघरातून उत्साहात बाहेर पडलेल्या किमयाला घरापासून हाकेच्या अंतरावर दबा धरून बसलेल्या मृत्यूने गाठले. पोलीस सूत्रानुसार, गाडगेनगर परिसरातील इंगोले प्लॉट येथील रहिवासी किमया मानकर ही होलीक्रॉस हायस्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिकत होती. बुधवारी सकाळी ७.१५ वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी सायकलने निघाली. पंचवटी चौकातील वळणावरुन शाळेच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातील भरधाव अज्ञात आॅटोरिक्षाने किमयाच्या सायकलला जबर धडक दिली. किमया सायकलसह फरफटत जाऊन नजीकच्या दुभाजकावर आदळली. आॅटोरिक्षा तिच्या अंगावरुन निघून गेली. या भयंकर अपघातात किमयाच्या शरीराच्या खालच्या भागाच्या चिंधड्या झाल्या. अपघातानंतर आॅटोरिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, ट्रक चालकाने रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या किमयाला पाणी पाजले. घटनेची माहिती तत्काळ गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी किमयाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारदरम्यान ७.४५ वाजता किमयाचा मृत्यू झाला.क्षणात थांबली ‘किमया’ची किलबिलघराचे चैतन्य असलेली किमया अतिशय समंजस होती. लहानग्या वयात ती प्रचंड काटकसरी होती. अभ्यासू किमयाचा असा दुर्देवी अंत झालाय यावर तिच्या आई-वडिलांचा विश्वासच बसेना. पंधरा मिनिटांपूर्वी घरातून हसत-खेळत शाळेकडे गेलेल्या किमयाला दिलेला निरोप शेवटचा असेल याची कल्पनाही तिच्या आईला नव्हती. त्यामुळेच किमयाच्या मृत्यूचा आघात तिची आई अर्चनाला सोसवत नव्हता. तिचा आक्रोश बघणाऱ्यांच्या काळजाला पिळ पाडत होता. तर किमयाची लहानगी ११ महिन्यांची बहिण केतकी निरागस परंतु गोंधळलेल्या डोळ्यांनी आई-वडिलांचा आक्रोश बघत होती. किमयाचे वडील राजू मानकर तर अपघातानंतर नि:शब्द झाले होते.