शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

मुख्याधिकाऱ्याविरूध्द उपाध्यक्षांचा एल्गार

By admin | Updated: July 17, 2015 00:21 IST

नगर पालिका प्रशासनाच्या अख्त्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत. वारंवार सूचना देऊनही जिल्हा निवड समितीने

अन्यथा ठिय्या आंदोलन : मानधनावरील शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्याचांदूरबाजार : नगर पालिका प्रशासनाच्या अख्त्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत. वारंवार सूचना देऊनही जिल्हा निवड समितीने या पदावर शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मानधन तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला होता. अद्यापही मानधन तत्त्वावर शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. यासाठी मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून पालिका उपाध्यक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या शाळेतील शिक्षकांची पदे कायमस्वरूपी भरलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता दरवर्षी मानधन तत्त्वावर शिक्षक नियुक्त करणे क्रमप्राप्त होते. परंतु नगरपालिका व्यवस्थापन मंडळाने ठराव घेऊन व वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही या महत्वपूर्ण बाबीकडे मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी गांभीर्याने लक्ष घातले नसल्याचा आरोप पालिका उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी केला आहे. शाळेचे सत्र सुरु होऊन तीन आठवडे पूर्ण होत आले असूनही शिक्षकांच्या नियुक्त्या न झाल्याने मानधनावरील शिक्षक नियुक्ती प्रकरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. आठवडाभराच्या आत मानधनावरील शिक्षकांच्या नियुक्त्या न झाल्यास पालिका उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी विद्यार्थ्यांसह मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत नगरपालिकेच्या अख्त्यारित विज्ञान व कला शाखेची मराठी-उर्दू उच्च माध्यमिक विद्यालये, माध्यमिक विद्यालये, तसेच प्राथमिक शाळा आहेत. यासर्व शाळामधून शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत. यात उच्च माध्यमिक विभागातील विज्ञान व कला शाखेची उर्दूसह आठ पदे रिक्त असून मराठीची ४ व उर्दू विभागाची ४ पदे रिक्त आहेत. तसेच प्राथमिक शाळांमध्ये एकूण ४४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचा विचार करून शिक्षकांच्या रिक्त जागा मानधन तत्त्वावर त्वरीत भरणे गरजेचे आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षक उपलब्ध करुन देऊन दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून गेल्या काही वर्षापासून नगरपालिका प्रशासनाने या रिक्त जागांवर मानधनावर तात्पुरत्या स्वरुपाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या वर्षीही अशा नियुक्त्या होणे क्रमप्राप्त होते. विद्यार्थ्यांच्या हिताकरिता हा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी यात रोडा टाकल्याचा आरोप पालिका उपाध्यक्ष मुजफ्फर हुसैन यांनी केला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने मानधनावर शिक्षकांच्या नियुक्त्या न केल्यास आठवडयानंतर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा हुसैन यांनी दिला असून या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)यात विद्यार्थ्यांचा काय दोष?नवीन शालेय सत्र सुरू होऊन पंधरवडा लोटला आहे. मात्र, येथील पालिकेच्या शाळांमध्ये मानधन तत्त्वावर शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाहीत. दरवर्षीच कंत्राटी शिक्षकांची भरती केली जात असताना यंदा काय अडचण आली? हा प्रश्नच आहे. शिक्षकांची पदे कायमस्वरूपी भरणे तर सोडाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मानधन तत्त्वावरही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात न आल्याने शैक्षणिक नुकसान होण्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांचा या सगळ्या घडामोडींमध्ये काय दोष? असा सवाल पालकवर्गाने उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.