शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आमदारांचे मौखिक आदेश; वरूड येथील पाणीपुरवठ्याची कामे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:48 IST

नागरिकांचा ठिय्या : पाण्यासाठी उद्रेक; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याचे लेखी पत्र

अमरावती : जलजीवन मिशन अंतर्गत वरूड तालुक्यातील पंढरी ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे ही आमदार देवेंद्र भुयार यांच्या मौखिक आदेशानेच बंद करण्यात आल्याचे लेखी पत्र शुक्रवारी दस्तुरखुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शुक्रवारी वरुड ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात तब्बल चार तास वरुड तालुकावासीयांनी येथील जीवन प्राधिकरण प्रादेशिक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वरुड तालुक्यातील ३५ गावातील पाणीपुरवठ्याकरिता जलजीवन मिशन अंतर्गत पंढरी ३५ गावे पाणीपुरवठा योजना मंजूर असून, या कामाची किंमत १०० कोटी एवढी आहे. यामध्ये ४१.७२ कोटींची कामे खासगी कंपनीला दिली आहेत. ६० कोटींतून जलवाहिनीचा पुरवठा शासनाकडून होणार आहे. या योजनेतील कामे कंत्राटदाराने सुरुवात केली आणि शासनाने जलवाहिनीचा पुरवठा केला. या योजनेचे १०० कोटीपैकी ५० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र या योजनेची कंत्राटदाराने अचानक कामे बंद केली आहेत. या अर्धवट कामांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेकदा ग्रामस्थांनी कंत्राटदारास काम का बंद आहे, याबाबत विचारणा केली असता मजीप्राचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता यांनी काम बंद केले असे सांगण्यात आले, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या योजनेचे कामे ५० टक्के पूर्ण झाले आणि आता ही कामे बंद करण्यात आल्याने वरुड तालुक्यातील ३५ गावांचे नागरिक संभ्रमात पडले आहेत. ही योजना लवकर पूर्णत्वास जावी, यासाठी अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी वरुडवासीयांनी शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले.

लोकप्रतिनिधीमुळे ३५ गावचे नागरिक पाण्याविना

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय परतणार नाही, अशी भूमिका वरूड येथील त्रस्त नागरिकांनी घेतली. काही काळ मजीप्रा कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण होते. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. मात्र कामे बंद का झालीत, याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी दिलेले लेखी पत्र धक्कादायक ठरणारे आहे.

आठ दिवसात पंढरी ३५ गावे बाधित ३५ गावांतील नागरिकांसोबत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. मजीप्राच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा इशारा देण्यात आला आहे.

- विक्रम ठाकरे, माजी सभापती, वरूड

टॅग्स :GovernmentसरकारAmravatiअमरावती