शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आमदारांचे मौखिक आदेश; वरूड येथील पाणीपुरवठ्याची कामे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:48 IST

नागरिकांचा ठिय्या : पाण्यासाठी उद्रेक; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याचे लेखी पत्र

अमरावती : जलजीवन मिशन अंतर्गत वरूड तालुक्यातील पंढरी ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे ही आमदार देवेंद्र भुयार यांच्या मौखिक आदेशानेच बंद करण्यात आल्याचे लेखी पत्र शुक्रवारी दस्तुरखुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शुक्रवारी वरुड ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात तब्बल चार तास वरुड तालुकावासीयांनी येथील जीवन प्राधिकरण प्रादेशिक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वरुड तालुक्यातील ३५ गावातील पाणीपुरवठ्याकरिता जलजीवन मिशन अंतर्गत पंढरी ३५ गावे पाणीपुरवठा योजना मंजूर असून, या कामाची किंमत १०० कोटी एवढी आहे. यामध्ये ४१.७२ कोटींची कामे खासगी कंपनीला दिली आहेत. ६० कोटींतून जलवाहिनीचा पुरवठा शासनाकडून होणार आहे. या योजनेतील कामे कंत्राटदाराने सुरुवात केली आणि शासनाने जलवाहिनीचा पुरवठा केला. या योजनेचे १०० कोटीपैकी ५० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र या योजनेची कंत्राटदाराने अचानक कामे बंद केली आहेत. या अर्धवट कामांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेकदा ग्रामस्थांनी कंत्राटदारास काम का बंद आहे, याबाबत विचारणा केली असता मजीप्राचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता यांनी काम बंद केले असे सांगण्यात आले, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या योजनेचे कामे ५० टक्के पूर्ण झाले आणि आता ही कामे बंद करण्यात आल्याने वरुड तालुक्यातील ३५ गावांचे नागरिक संभ्रमात पडले आहेत. ही योजना लवकर पूर्णत्वास जावी, यासाठी अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी वरुडवासीयांनी शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले.

लोकप्रतिनिधीमुळे ३५ गावचे नागरिक पाण्याविना

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय परतणार नाही, अशी भूमिका वरूड येथील त्रस्त नागरिकांनी घेतली. काही काळ मजीप्रा कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण होते. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. मात्र कामे बंद का झालीत, याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी दिलेले लेखी पत्र धक्कादायक ठरणारे आहे.

आठ दिवसात पंढरी ३५ गावे बाधित ३५ गावांतील नागरिकांसोबत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. मजीप्राच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा इशारा देण्यात आला आहे.

- विक्रम ठाकरे, माजी सभापती, वरूड

टॅग्स :GovernmentसरकारAmravatiअमरावती