शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचे मौखिक आदेश; वरूड येथील पाणीपुरवठ्याची कामे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:48 IST

नागरिकांचा ठिय्या : पाण्यासाठी उद्रेक; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याचे लेखी पत्र

अमरावती : जलजीवन मिशन अंतर्गत वरूड तालुक्यातील पंढरी ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे ही आमदार देवेंद्र भुयार यांच्या मौखिक आदेशानेच बंद करण्यात आल्याचे लेखी पत्र शुक्रवारी दस्तुरखुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

शुक्रवारी वरुड ३५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामे त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात तब्बल चार तास वरुड तालुकावासीयांनी येथील जीवन प्राधिकरण प्रादेशिक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वरुड तालुक्यातील ३५ गावातील पाणीपुरवठ्याकरिता जलजीवन मिशन अंतर्गत पंढरी ३५ गावे पाणीपुरवठा योजना मंजूर असून, या कामाची किंमत १०० कोटी एवढी आहे. यामध्ये ४१.७२ कोटींची कामे खासगी कंपनीला दिली आहेत. ६० कोटींतून जलवाहिनीचा पुरवठा शासनाकडून होणार आहे. या योजनेतील कामे कंत्राटदाराने सुरुवात केली आणि शासनाने जलवाहिनीचा पुरवठा केला. या योजनेचे १०० कोटीपैकी ५० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र या योजनेची कंत्राटदाराने अचानक कामे बंद केली आहेत. या अर्धवट कामांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेकदा ग्रामस्थांनी कंत्राटदारास काम का बंद आहे, याबाबत विचारणा केली असता मजीप्राचे कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता यांनी काम बंद केले असे सांगण्यात आले, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या योजनेचे कामे ५० टक्के पूर्ण झाले आणि आता ही कामे बंद करण्यात आल्याने वरुड तालुक्यातील ३५ गावांचे नागरिक संभ्रमात पडले आहेत. ही योजना लवकर पूर्णत्वास जावी, यासाठी अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी वरुडवासीयांनी शुक्रवारी चार तास ठिय्या आंदोलन केले.

लोकप्रतिनिधीमुळे ३५ गावचे नागरिक पाण्याविना

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय परतणार नाही, अशी भूमिका वरूड येथील त्रस्त नागरिकांनी घेतली. काही काळ मजीप्रा कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण होते. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. मात्र कामे बंद का झालीत, याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी दिलेले लेखी पत्र धक्कादायक ठरणारे आहे.

आठ दिवसात पंढरी ३५ गावे बाधित ३५ गावांतील नागरिकांसोबत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. मजीप्राच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा इशारा देण्यात आला आहे.

- विक्रम ठाकरे, माजी सभापती, वरूड

टॅग्स :GovernmentसरकारAmravatiअमरावती